शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

विराटचा वेग ‘फॉर्म्युला वन’च्या तोडीचा

By admin | Updated: April 27, 2016 05:33 IST

विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे.

नवी दिल्ली : नवा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख निर्माण करणारा विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात ज्या वेगाने तो धावा फटकावत आहे ते बघता या स्पर्धेत तो नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पाच सामन्यांत ९१.७५ च्या सरासरीने आणि १४३.९२ च्या स्ट्राईक रेटने ३६७ धावा फटकावल्या आहेत. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर असून सध्या त्याच्याकडे ‘आॅरेंज कॅप’आहे.बांगलादेशच्या यजमानपदाखाली ढाकामध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत विराटने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावांच्या खेळी केल्या. भारताने आशिया कप स्पर्धेत जेतेपद पटकावले. विराटला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेदरम्यान विश्रांती देण्यात आली होती. पण त्यानंतर झालेल्या विश्वकप स्पर्धेत त्याने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ धावांच्या खेळी केल्या. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. या कामगिरीमुळे विराट विश्वकप स्पर्धेत ‘प्लेअर आॅफ द टुर्नामेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरला. विश्वकप स्पर्धेत फॉर्म विराटने आयपीएल स्पर्धेतही कायम राखला. २४ एप्रिल रोजी राजकोटमध्ये गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीत त्याने नाबाद १०० धावांची खेळी करताना टी-२० कारकिर्दीत प्रथमच शतक झळकावले. विराटचा फॉर्म बघता आयपीएलमध्ये एका सत्रात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम तो नोंदवेल, अशी आशा आहे. विराटला या वेळी त्याचा संघसहकारी ख्रिस गेल व चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करणारा मायकल हसी यांचा आयपीएलच्या एका मोसमात ७३३ धावा फटकावण्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेलने २०१२ मध्ये एका मोसमात १५ सामन्यांत ७३३ धावा फटकावल्या होत्या, तर हसीने २०१३ मध्ये १७ सामन्यांत ७३३ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये विराटची वैयक्तिक कामगिरी १६ सामन्यांत ६३४ धावा फटकावण्याची आहे. त्याने ही कामगिरी २०१३ मध्ये केली होती. >विराटने आयपीएलच्या पाच सामन्यांत ७५, ७९, ३३ आणि १०० अशा धावा फटकावल्या आहेत. विराटने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तीन टी-२० सामन्यांत सलग अर्धशतके झळकावली. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने प्रथमच आॅस्ट्रेलियात ३-० ने क्लीन स्वीप दिला. आॅस्ट्रेलियात त्याने नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० अशा धावा फटकावल्या. >२०१६ च्या सुरुवातीच्या चार महिन्यांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा फटकावल्या आहेत. त्यात ७ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. ३६७ आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याने पाच सामन्यांत ३६७ धावा फटकावल्या आहेत. यंदा टी-२० मध्ये त्याने एकूण १८ सामन्यांत ९९२ धावा फटकावल्या आहेत.