शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

विराटचा वेग ‘फॉर्म्युला वन’च्या तोडीचा

By admin | Updated: April 27, 2016 05:33 IST

विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे.

नवी दिल्ली : नवा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख निर्माण करणारा विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात ज्या वेगाने तो धावा फटकावत आहे ते बघता या स्पर्धेत तो नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पाच सामन्यांत ९१.७५ च्या सरासरीने आणि १४३.९२ च्या स्ट्राईक रेटने ३६७ धावा फटकावल्या आहेत. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर असून सध्या त्याच्याकडे ‘आॅरेंज कॅप’आहे.बांगलादेशच्या यजमानपदाखाली ढाकामध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत विराटने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावांच्या खेळी केल्या. भारताने आशिया कप स्पर्धेत जेतेपद पटकावले. विराटला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेदरम्यान विश्रांती देण्यात आली होती. पण त्यानंतर झालेल्या विश्वकप स्पर्धेत त्याने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ धावांच्या खेळी केल्या. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. या कामगिरीमुळे विराट विश्वकप स्पर्धेत ‘प्लेअर आॅफ द टुर्नामेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरला. विश्वकप स्पर्धेत फॉर्म विराटने आयपीएल स्पर्धेतही कायम राखला. २४ एप्रिल रोजी राजकोटमध्ये गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीत त्याने नाबाद १०० धावांची खेळी करताना टी-२० कारकिर्दीत प्रथमच शतक झळकावले. विराटचा फॉर्म बघता आयपीएलमध्ये एका सत्रात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम तो नोंदवेल, अशी आशा आहे. विराटला या वेळी त्याचा संघसहकारी ख्रिस गेल व चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करणारा मायकल हसी यांचा आयपीएलच्या एका मोसमात ७३३ धावा फटकावण्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेलने २०१२ मध्ये एका मोसमात १५ सामन्यांत ७३३ धावा फटकावल्या होत्या, तर हसीने २०१३ मध्ये १७ सामन्यांत ७३३ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये विराटची वैयक्तिक कामगिरी १६ सामन्यांत ६३४ धावा फटकावण्याची आहे. त्याने ही कामगिरी २०१३ मध्ये केली होती. >विराटने आयपीएलच्या पाच सामन्यांत ७५, ७९, ३३ आणि १०० अशा धावा फटकावल्या आहेत. विराटने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तीन टी-२० सामन्यांत सलग अर्धशतके झळकावली. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने प्रथमच आॅस्ट्रेलियात ३-० ने क्लीन स्वीप दिला. आॅस्ट्रेलियात त्याने नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० अशा धावा फटकावल्या. >२०१६ च्या सुरुवातीच्या चार महिन्यांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा फटकावल्या आहेत. त्यात ७ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. ३६७ आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याने पाच सामन्यांत ३६७ धावा फटकावल्या आहेत. यंदा टी-२० मध्ये त्याने एकूण १८ सामन्यांत ९९२ धावा फटकावल्या आहेत.