शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

विराटचा वेग ‘फॉर्म्युला वन’च्या तोडीचा

By admin | Updated: April 27, 2016 05:33 IST

विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे.

नवी दिल्ली : नवा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख निर्माण करणारा विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये ‘फॉर्म्युला वन’च्या वेगाने धावा फटकावत आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात ज्या वेगाने तो धावा फटकावत आहे ते बघता या स्पर्धेत तो नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पाच सामन्यांत ९१.७५ च्या सरासरीने आणि १४३.९२ च्या स्ट्राईक रेटने ३६७ धावा फटकावल्या आहेत. त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या नवव्या पर्वात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांमध्ये तो अव्वल स्थानावर असून सध्या त्याच्याकडे ‘आॅरेंज कॅप’आहे.बांगलादेशच्या यजमानपदाखाली ढाकामध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत विराटने ७, ४९, नाबाद ५६ आणि नाबाद ४१ धावांच्या खेळी केल्या. भारताने आशिया कप स्पर्धेत जेतेपद पटकावले. विराटला श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेदरम्यान विश्रांती देण्यात आली होती. पण त्यानंतर झालेल्या विश्वकप स्पर्धेत त्याने २३, नाबाद ५५, २४, नाबाद ८२ आणि नाबाद ८९ धावांच्या खेळी केल्या. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. या कामगिरीमुळे विराट विश्वकप स्पर्धेत ‘प्लेअर आॅफ द टुर्नामेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरला. विश्वकप स्पर्धेत फॉर्म विराटने आयपीएल स्पर्धेतही कायम राखला. २४ एप्रिल रोजी राजकोटमध्ये गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीत त्याने नाबाद १०० धावांची खेळी करताना टी-२० कारकिर्दीत प्रथमच शतक झळकावले. विराटचा फॉर्म बघता आयपीएलमध्ये एका सत्रात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम तो नोंदवेल, अशी आशा आहे. विराटला या वेळी त्याचा संघसहकारी ख्रिस गेल व चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करणारा मायकल हसी यांचा आयपीएलच्या एका मोसमात ७३३ धावा फटकावण्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे. गेलने २०१२ मध्ये एका मोसमात १५ सामन्यांत ७३३ धावा फटकावल्या होत्या, तर हसीने २०१३ मध्ये १७ सामन्यांत ७३३ धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये विराटची वैयक्तिक कामगिरी १६ सामन्यांत ६३४ धावा फटकावण्याची आहे. त्याने ही कामगिरी २०१३ मध्ये केली होती. >विराटने आयपीएलच्या पाच सामन्यांत ७५, ७९, ३३ आणि १०० अशा धावा फटकावल्या आहेत. विराटने वर्षाच्या सुरुवातीला आॅस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या तीन टी-२० सामन्यांत सलग अर्धशतके झळकावली. विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने प्रथमच आॅस्ट्रेलियात ३-० ने क्लीन स्वीप दिला. आॅस्ट्रेलियात त्याने नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० अशा धावा फटकावल्या. >२०१६ च्या सुरुवातीच्या चार महिन्यांमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये विराटची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२५ च्या सरासरीने ६२५ धावा फटकावल्या आहेत. त्यात ७ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. ३६७ आयपीएलच्या नवव्या पर्वात त्याने पाच सामन्यांत ३६७ धावा फटकावल्या आहेत. यंदा टी-२० मध्ये त्याने एकूण १८ सामन्यांत ९९२ धावा फटकावल्या आहेत.