शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

विराटची आक्रमकता जपणार, पण... : कुंबळे

By admin | Updated: July 4, 2016 17:57 IST

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता नियंत्रित करणारा मी शेवटचा व्यक्ती असेल, असे मत भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले

ऑनलाइन लोकमतबेंगळुरू, दि. ४  : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता नियंत्रित करणारा मी शेवटचा व्यक्ती असेल, असे मत भारतीय संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी व्यक्त केले. पण, भारतीय दूत म्हणून खेळाडूंनी मर्यादेचे उल्लंघन करू नये, असेही ते म्हणाले.

विंडीज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कुंबळे म्हणाले,मला विराटची आक्रमकता आवडते. मी काही त्यापेक्षा वेगळा नव्हतो. मैदानावर मीसुद्धा आक्रमक होतो. पण, मैदानावरील कामगिरी कशी होते, याला अधिक महत्त्व असते. ह्णकुंबळे यांनी कोहलीसह सर्व आक्रमक खेळाडूंना इशारा देताना सांगितले की, भारतीय दूत व भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य असणे किती महत्त्वाचे आहे, याची सर्वांना कल्पना आहे. मर्यादा न ओलांडता आक्रमकता दाखविणे महत्त्वाचे ठरते. मी कुणाच्या स्वभावाला निश्चितच मुरड घालणार नाही.ह्ण

विंडीज दौऱ्यातील आगामी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेबाबत बोलताना भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणाला,ह्यसर्वच खेळाडू विजयासाठीच प्रयत्नशील असतात. प्रशिक्षक म्हणून संघ विजय झालेला बघण्यास उत्सुक असतो. खेळाच्या प्रत्येक विभागावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असते. आगामी सत्रात बरेच कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे उणिवा असतील तर दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहील. आम्ही १७ कसोटी सामने खेळणार आहोत. विंडीज दौऱ्यापासून याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड आणि त्यानंतर आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका होतील.ह्णकुंबळे यांनी पुढे सांगितले की,ह्यकामगिरीत सातत्य राखण्याचे आमचे लक्ष्य आहे. प्रत्येक लढतीत विजयाच्या निर्धारानेच सहभागी होणार आहे. अश्विनच्या हाताला झालेली दुखापत जबर नाही, पण फिजिओची त्याच्यावर नजर आहे.