शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

विराटसेना 'बंगळुरू टेस्ट'मध्ये पास! पण...

By admin | Updated: March 7, 2017 18:36 IST

अखेर कोहलीच्या विराट सेनेने बंगळुरू कसोटी जिंकली. दणदणीत म्हणता येणार नाही, पण ऑस्ट्रेलिन संघाच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल, अशा सनसनाटी

 बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
अखेर कोहलीच्या विराट सेनेने बंगळुरू कसोटी जिंकली. दणदणीत म्हणता येणार नाही, पण ऑस्ट्रेलिन संघाच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल, अशा सनसनाटी पद्धतीने भारतीय संघाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर विजयाचा झेंडा रोवला. प्रतिस्पर्धी संघाच्या जबड्यातून आम्ही विजयश्री खेचून आणू शकतो, हेही भारतीय संघाने दाखवून दिले. तशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी सनसनाटी कामगिरी करण्याची भारतीय संघाची परंपराच आहे म्हणा. मग 2001 ची ऐतिहासिक कोलकाता कसोटी, 2003 मधली अॅडलेड कसोटी आणि 2010 मधली मोहाली कसोटी कोण विसरणार!
  हा झाला इतिहास,  पण पुण्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने ज्या प्रकारे मालिकेत पुनरागमन केले त्याला दाद द्यावीच लागेल. पहिल्या डावात माफक धावाच जमवता आल्यानंतर गोलंदाजांनी केलेला तिखट मारा. लोकेश राहुलची दोन्ही डावातील अर्धशतके,  दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाज वरचढ ठरत असताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेली जबरदस्त भागीदारी आणि शेवटी ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्या गुर्मीसह जमिनदोस्त करणारी अश्विनची गोलंदाजी. हे सर्व गोष्टी पुढील सामन्यापूर्वी संघाचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या आहेत. पुण्यातील पराभवामुळे निर्माण झालेला दबाव आता विरघळून गेलाय. समान्यातील शेवटच्या काही षटकांमध्ये भारतीय संघाने ज्या आक्रमकतेने ऑस्ट्रेलिन फलंदाजांवर हुकूमत गाजवली त्यावरून त्याचे स्पष्टच संकेत मिळू लागले आहेत.
आता बंगळूरूतून सुटलेला विजयाचा वारू रांची आणि धरमशाळेत चौफेर उधळून बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा एकदा भारताच्या ताब्यात यावा, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल. सध्या ही मालिका बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी रांची  येथे होणारी तिसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे. या कसोटीतील विजय विजेत्या संघाला मालिकाविजयाच्या जवळ घेऊन जाईल. त्यामुळे भारतीय संघासमोर रांचीमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवावी लागणार आहे.  
 भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे घर असलेले रांची शहर 16 ते 20 मार्चदरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यातून प्रथमच कसोटी क्रिकेटच्या नकाशावर येणार आहे. त्या दृष्टीने ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. पण ती कसोटी आपल्या खेळाने ऐतिहासिक ठरवण्याची जबाबदारी भारतीय संघावर असेल. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातील खेळपट्टया पाहता तिथेही फिरकीला अनुकूल अशी आखाडा खेळपट्टीच असण्याची शक्यता आहे. पण हा फिरकीचा आखाडा गळ्याचा फास ठरणार नाही,  याची खबरदारी भारतीय संघाला घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने गेल्या दोन सामन्यातील अनुभव भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्या अनुभवाचे चिंतन करून विराटसेनेला आत्मचिंतन करावे लागणार आहे. 
बंगळुरूत विजय मिळवला असला तरी त्या विजयाने हुरळून जावे अशी परिस्थिती भारतीय संघासाठी नक्कीच नाही.  मालिकेआधी काहीही दावे केले गेले असले तरी भारताला भारतात हरवण्याइतपत क्षमता ऑस्ट्रेलियामध्ये आहे, हेही आता सिद्ध झाले आहे. जर फिरकीच्या आखाड्यात अश्विन आणि जडेजा प्रतिस्पर्ध्यांना हैराण करू शकतात. तर ऑस्ट्रेलियाचे नॅथन लायन आणि स्टीव्ह ओकिफे हेही त्याच फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना अडकवू शकतात. सध्या भारताची फलंदाजीही म्हणावी तशी फॉर्ममध्ये नाही. मुकुंदच्या अपयशाने सलामीच्या चिंता वाढवल्या आहेत. तर कर्णधार विराट कोहलीला गेल्या दोन कसोटीत आलेले अपयशही भारतीय फलंदाजीसाठी अडचणीचे ठरले आहे. पण बंगळुरूत मिळवलेल्या विजयामुळे पुढच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात फारसे फेरबदल होण्याची शक्यता नाही. 
 त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आज अश्विन, जडेजा आणि उमेशने केलेली गोलंदाजी आणि भारतीय संघाची मैदानावर दिसलेली  आक्रमक आणि सकारात्मक देहबोली. ही आक्रमकता आणि सकारात्मकताच भारतीय संघाला मालिकेती उर्वरित कसोटींमध्ये फायदेशीर ठरणार आहे. रांचीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीस अजून दहा दिवसांचा अवधी आहे.  तूर्तास टीम इंडियाला या विजयाचे आणि होळीचे सेलिब्रेशन करू दे.  बाकी ऑस्ट्रेलियन संघाला गृहित धरून चालणार नाही आणि अनुकूल खेळपट्ट्या बनवून, आक्रमक शेरेबाजी करून ऑस्ट्रेलियाला रोखता येणार नाही याची जाणीव विराट कोहली आणि भारतीय संघाला वेळ निघून जाण्याआधी झाली, हेही नसे थोडके.