शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

विराटसेना 'बंगळुरू टेस्ट'मध्ये पास! पण...

By admin | Updated: March 7, 2017 18:36 IST

अखेर कोहलीच्या विराट सेनेने बंगळुरू कसोटी जिंकली. दणदणीत म्हणता येणार नाही, पण ऑस्ट्रेलिन संघाच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल, अशा सनसनाटी

 बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
अखेर कोहलीच्या विराट सेनेने बंगळुरू कसोटी जिंकली. दणदणीत म्हणता येणार नाही, पण ऑस्ट्रेलिन संघाच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचेल, अशा सनसनाटी पद्धतीने भारतीय संघाने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीवर विजयाचा झेंडा रोवला. प्रतिस्पर्धी संघाच्या जबड्यातून आम्ही विजयश्री खेचून आणू शकतो, हेही भारतीय संघाने दाखवून दिले. तशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी सनसनाटी कामगिरी करण्याची भारतीय संघाची परंपराच आहे म्हणा. मग 2001 ची ऐतिहासिक कोलकाता कसोटी, 2003 मधली अॅडलेड कसोटी आणि 2010 मधली मोहाली कसोटी कोण विसरणार!
  हा झाला इतिहास,  पण पुण्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने ज्या प्रकारे मालिकेत पुनरागमन केले त्याला दाद द्यावीच लागेल. पहिल्या डावात माफक धावाच जमवता आल्यानंतर गोलंदाजांनी केलेला तिखट मारा. लोकेश राहुलची दोन्ही डावातील अर्धशतके,  दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाज वरचढ ठरत असताना चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने केलेली जबरदस्त भागीदारी आणि शेवटी ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्या गुर्मीसह जमिनदोस्त करणारी अश्विनची गोलंदाजी. हे सर्व गोष्टी पुढील सामन्यापूर्वी संघाचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या आहेत. पुण्यातील पराभवामुळे निर्माण झालेला दबाव आता विरघळून गेलाय. समान्यातील शेवटच्या काही षटकांमध्ये भारतीय संघाने ज्या आक्रमकतेने ऑस्ट्रेलिन फलंदाजांवर हुकूमत गाजवली त्यावरून त्याचे स्पष्टच संकेत मिळू लागले आहेत.
आता बंगळूरूतून सुटलेला विजयाचा वारू रांची आणि धरमशाळेत चौफेर उधळून बॉर्डर-गावस्कर करंडक पुन्हा एकदा भारताच्या ताब्यात यावा, अशी भारतीय क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल. सध्या ही मालिका बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी रांची  येथे होणारी तिसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे. या कसोटीतील विजय विजेत्या संघाला मालिकाविजयाच्या जवळ घेऊन जाईल. त्यामुळे भारतीय संघासमोर रांचीमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवावी लागणार आहे.  
 भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे घर असलेले रांची शहर 16 ते 20 मार्चदरम्यान होणाऱ्या कसोटी सामन्यातून प्रथमच कसोटी क्रिकेटच्या नकाशावर येणार आहे. त्या दृष्टीने ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. पण ती कसोटी आपल्या खेळाने ऐतिहासिक ठरवण्याची जबाबदारी भारतीय संघावर असेल. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातील खेळपट्टया पाहता तिथेही फिरकीला अनुकूल अशी आखाडा खेळपट्टीच असण्याची शक्यता आहे. पण हा फिरकीचा आखाडा गळ्याचा फास ठरणार नाही,  याची खबरदारी भारतीय संघाला घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने गेल्या दोन सामन्यातील अनुभव भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्या अनुभवाचे चिंतन करून विराटसेनेला आत्मचिंतन करावे लागणार आहे. 
बंगळुरूत विजय मिळवला असला तरी त्या विजयाने हुरळून जावे अशी परिस्थिती भारतीय संघासाठी नक्कीच नाही.  मालिकेआधी काहीही दावे केले गेले असले तरी भारताला भारतात हरवण्याइतपत क्षमता ऑस्ट्रेलियामध्ये आहे, हेही आता सिद्ध झाले आहे. जर फिरकीच्या आखाड्यात अश्विन आणि जडेजा प्रतिस्पर्ध्यांना हैराण करू शकतात. तर ऑस्ट्रेलियाचे नॅथन लायन आणि स्टीव्ह ओकिफे हेही त्याच फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना अडकवू शकतात. सध्या भारताची फलंदाजीही म्हणावी तशी फॉर्ममध्ये नाही. मुकुंदच्या अपयशाने सलामीच्या चिंता वाढवल्या आहेत. तर कर्णधार विराट कोहलीला गेल्या दोन कसोटीत आलेले अपयशही भारतीय फलंदाजीसाठी अडचणीचे ठरले आहे. पण बंगळुरूत मिळवलेल्या विजयामुळे पुढच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात फारसे फेरबदल होण्याची शक्यता नाही. 
 त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आज अश्विन, जडेजा आणि उमेशने केलेली गोलंदाजी आणि भारतीय संघाची मैदानावर दिसलेली  आक्रमक आणि सकारात्मक देहबोली. ही आक्रमकता आणि सकारात्मकताच भारतीय संघाला मालिकेती उर्वरित कसोटींमध्ये फायदेशीर ठरणार आहे. रांचीत होणाऱ्या तिसऱ्या कसोटीस अजून दहा दिवसांचा अवधी आहे.  तूर्तास टीम इंडियाला या विजयाचे आणि होळीचे सेलिब्रेशन करू दे.  बाकी ऑस्ट्रेलियन संघाला गृहित धरून चालणार नाही आणि अनुकूल खेळपट्ट्या बनवून, आक्रमक शेरेबाजी करून ऑस्ट्रेलियाला रोखता येणार नाही याची जाणीव विराट कोहली आणि भारतीय संघाला वेळ निघून जाण्याआधी झाली, हेही नसे थोडके.