शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

DRS लाभ उठवण्यात विराटसेना ठरतेय फेल

By admin | Updated: February 27, 2017 18:56 IST

पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघामधील एक उणीव प्रकर्षाने समोर आली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 -  विराट कोहलीने अल्पावधीतच  आपल्या नेतृत्वाची छाप पाडली आहे. पण पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघामधील एक उणीव प्रकर्षाने समोर आली आहे. ती उणीव म्हणजे क्षेत्ररक्षण करत असताना डीआरएसचा पुरेपूर फायदा उठवण्यात संघाला येत असलेले अपयश.  
गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपासूम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ही बाब प्रकर्षाने जाणवते. भारताने डीआरएसचा स्वीकार केल्यापासून फलंदाजीदरम्यान, 13 वेळा पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली. त्यापैकी केवळ चार वेळा पंचांचा निर्णय बदलण्यात भारताला यश मिळाले.  तर गोलंदाजीदरम्यान भारताने 42 वेळा मैदानी पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले, पण त्यातील केवळ दहा वेळाच भारताचे अपील यशस्वी ठरले. 
बराच काळ डीआरएसपासून दूर राहिलेल्या भारतीय संघामध्ये या प्रणालीबाबत अननुभवीपणा प्रकर्षाने जाणवतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुणे कसोटीतही भारतीय संघाने क्षेत्ररक्षण करताना चार वेळा डीआरएस वापरला, पण चारही वेळा भारताच्या पदरी निराशा पडली. दुसरीकडे फलंदाजीमध्ये भारताने तीन वेळी डीआरएसच वापर केला, पण त्यातील केवळ एक वेळच भारताला यश मिळाले.