शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विजयपाठोपाठ विराटचेही शतक, पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 356

By admin | Updated: February 9, 2017 17:04 IST

हैदराबाद कसोटीत मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही शतक फटकावले आहे. पहिल्या दिवसअखेर भारताच्या

 ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 9 - एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर हुकुमत राखली. सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 356 धावा कुटल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट 111 तर अजिंक्य रहाणे 45 धावांवर खेळत होते.  
मुरली विजय शतक फटकावून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेत खेळाच्या तिसऱ्या सत्रात पाहुण्या गोलंदाजांना झोडपून काढले. कोहलीची फटकेबाजी पाहून रहाणेनेही फलंदाजीचा गिअर बदलला. दरम्यान,  आक्रमक पवित्रा  घेणाऱ्या विराटने आपले कसोटी कारकीर्दीतील 16वे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या 130 चेंडूतच शतकी मजल मारली. दरम्यान त्याने अजिंक्य रहाणेसोबत अभेद्य 122 धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 356 धावांपर्यंत मजल मारून दिली. 
त्याआधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. मात्र लोकेश राहुल (2) स्वस्तात बाद झाल्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि मुरली विजयने डाव सावरत उपाहारापर्यंत भारताला 1 बाद 86 धावांपर्यंत मजल मारून दिली. विजय आणि पुजाराच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची भागीदारी करत भारताला सुस्थितीत पोहोचवले. दरम्यान, पुजार 83 धावांवर बाद झाला. पण विजयने मात्र आपले शतक पूर्ण केले. विजयचे हे कसोटी क्रिकेमधील नववे शतक ठरले. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर विजय फारवेळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही आणि 108 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (111) आणि अजिंक्य रहाणे (45) यांनी शतकी भागीदारी कर भारताला  साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. बांगलादेशकडून तस्किन अहमद, मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.