शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विजयपाठोपाठ विराटचेही शतक, पहिल्या दिवसअखेर भारत 3 बाद 356

By admin | Updated: February 9, 2017 17:04 IST

हैदराबाद कसोटीत मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही शतक फटकावले आहे. पहिल्या दिवसअखेर भारताच्या

 ऑनलाइन लोकमत 

हैदराबाद, दि. 9 - एकमेव कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर हुकुमत राखली. सलामीवीर मुरली विजयपाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनेही केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 356 धावा कुटल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट 111 तर अजिंक्य रहाणे 45 धावांवर खेळत होते.  
मुरली विजय शतक फटकावून बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीची सुत्रे आपल्या हाती घेत खेळाच्या तिसऱ्या सत्रात पाहुण्या गोलंदाजांना झोडपून काढले. कोहलीची फटकेबाजी पाहून रहाणेनेही फलंदाजीचा गिअर बदलला. दरम्यान,  आक्रमक पवित्रा  घेणाऱ्या विराटने आपले कसोटी कारकीर्दीतील 16वे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या 130 चेंडूतच शतकी मजल मारली. दरम्यान त्याने अजिंक्य रहाणेसोबत अभेद्य 122 धावांची भागीदारी करत भारताला पहिल्या दिवसअखेर 3 बाद 356 धावांपर्यंत मजल मारून दिली. 
त्याआधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकेश राहुलच्या रुपात भारताला पहिल्याच षटकात धक्का बसला. मात्र लोकेश राहुल (2) स्वस्तात बाद झाल्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि मुरली विजयने डाव सावरत उपाहारापर्यंत भारताला 1 बाद 86 धावांपर्यंत मजल मारून दिली. विजय आणि पुजाराच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची भागीदारी करत भारताला सुस्थितीत पोहोचवले. दरम्यान, पुजार 83 धावांवर बाद झाला. पण विजयने मात्र आपले शतक पूर्ण केले. विजयचे हे कसोटी क्रिकेमधील नववे शतक ठरले. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर विजय फारवेळ खेळपट्टीवर उभा राहू शकला नाही आणि 108 धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (111) आणि अजिंक्य रहाणे (45) यांनी शतकी भागीदारी कर भारताला  साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. बांगलादेशकडून तस्किन अहमद, मेहदी हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.