शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"विराट" बंगळुरूचा 49 धावांत खुर्दा, कोलकाताचा "रॉयल" विजय

By admin | Updated: April 24, 2017 07:10 IST

कोलकाता नाइट रायडर्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा अवघ्या ४९ धावांत खुर्दा पाडून ८२ धावांनी बाजी मारली

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 -  फलंदाज अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम माऱ्याच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चँलेंजर्स बँगलोरचा अवघ्या ४९ धावांत खुर्दा पाडून ८२ धावांनी बाजी मारली. या शानदार विजयासह कोलकाताने १० गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान भक्कम केले. 

इडन गार्डनवर झालेल्या या सामन्याला कमालीची कलाटणी मिळाली. आधी आरसीबीच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवताना केकेआरला घरच्या मैदानावर १३१ धावांवर रोखले. यावेळी आरसीबी सहज बाजी मारणार अशीच शक्यता होती. कर्णधार विराट कोहली, धोकादायक ख्रिस गेल आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स अशी जबरदस्त फलंदाजी असलेल्या आरसीबीला हे आव्हान अजिबात कठिण नव्हते. शिवाय केदार जाधव, मनदीप सिंग, स्टुअर्ट बिन्नी असे शिलेदारही केकेआरला चोपण्यास सज्ज होते. परंतु, केकेआरने जबरदस्त मारा करताना सामनाच पलटवला. 

ख्रिस वोक्सने पहिल्याच षटकात कोहलीला बाद करुन बँगलोरला मोठा धक्का दिला. या पहिल्याच मजबूत धक्क्याने जणूकाही बँँगलोरच्या आत्मविश्वासालाच तडा गेला आणि एकामागून एक फलंदाज बाद व्हायला लागले. बघता बघता अवघ्या ४९ धावांमध्ये संपुर्ण संघ तंबूत परतला आणि एकवेळ पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या केकेआरने अनपेक्षित बाजी मारली. नॅथन कुल्टर-नाइल, वोक्स आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी ३ बळी घेत आरसीबीचे कंबरडे मोडले. उमेश यादवने एक बळी घेतला. विशेष म्हणजे बँगलोरच्या एकाही फलंदाजा दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. केदार जाधवने सर्वाधिक ९ धावा काढल्या. तत्पूर्वी, सुनील नरेनने पुन्हा एकदा सलामीला येत अपेक्षित आक्रमक सुरुवात करताना बँगलोरच्या गोलंदाजीची पिसे काढण्यास सुरुवात केली. त्याने सॅम्युअल बद्री टाकत असलेल्या पहिल्या षटकात १८ धावा चोपताना कोलकाताला जबरदस्त सुरुवात करुन दिली. परंतु, टायमल मिल्सने गंभीरला बाद करुन कोलकाताला पहिला धक्का दिला. तरीही नरेनमुळे कोलकाताची धावसंख्या वेगाने वाढत होती. स्टुअर्ट बिन्नीने नरेनला बाद करुन बँगलोरची धुलाई थांबवली. नरेनने १७ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ३४ धावा कुटल्या. यानंतर रॉबिन उथप्पा (११) व युसुफ पठाण (८) स्वस्तात परतल्याने कोलकाताच्या धावांचा वेग मंदावला. यजुवेंद्र चहलने ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)

आरसीबीने यावेळी आयपीएल इतिहासातील सर्वात नीचांकी ४९ धावसंख्येची नोंद केली. यापूर्वी २०१४ मध्ये अबूधाबी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबीच्या ७० धावा झाल्या होत्या.आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये एकाच सामन्यात २० फलंदाज बाद होण्याची ही दुसरी वेळी आहे.एकूण १० आयपीएलमध्ये विराट कोहली शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे आणि दोन्ही सामने आरसीबीने गमावले होते.बंगळुरू येथे १८ एप्रिल २००८ रोजी केकेआरने आरसीबी संघाचा ८२ धावांत खुर्दा केला होता.सुनील नरेनने ३४ धावांची केलेली महत्त्वपूर्ण खेळी निर्णायक ठरली.आरसीबीचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही.यापूर्वीची नीचांकी धावसंख्या राजस्थान रॉयल्सची आरसीबीविरुद्ध ५८ धावांची होती.

योगायोगआरसीबीने आयपीएलच्या इतिहासात २३ एप्रिल २०१३ रोजी ५ बाद २६३ अशी सर्वाेच्च धावसंख्या केली होती. 23 एप्रिल २०१७ ला आरसीबीची ४९ नीचांकी धावसंख्या नोंदवली गेली. संक्षिप्त धावफलककोलकाता नाइट रायडर्स : १९.३ षटकात सर्वबाद १३१ धावा (सुनील नरेन ३४, ख्रिस वोक्स १८; यजुवेंद्र चहल ३/१६) वि.वि. रॉयल चँलेंजर्स बँगलोर : ९.४ षटकात सर्वबाद ४९ धावा (केदार जाधव ९; कॉलिन डी ग्रँडहोम ३/४, ख्रिस वोक्स ३/६, नॅथन कुल्टर-नाइल ३/२१)