शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

विदर्भ

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

तामिळनाडूचे वर्चस्व

तामिळनाडूचे वर्चस्व
रणजी करंडक क्रिकेट : विदर्भाविरुद्ध दुसऱ्या डावात ३३७ धावांची आघाडी
नागपूर : तामिळनाडूने रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत आज चौथ्या दिवशी विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत गुंडाळल्यानंतर एकूण ३३७ धावांची आहे. दुसऱ्या डावात त्यांच्या ४ विकेट अद्याप शिल्लक आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद २०६ धावांची मजल मारली होती. गुरुवारी त्यापुढे खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. रवी जांगिडला (२६) आज वैयक्तिक धावसंख्येत भर घालता आली नाही. पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या तामिळनाडूने दुसऱ्या डावात ६ बाद १९३ धावांची मजल मारली.
दुसऱ्या डावात तामिळनाडू संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांची सुरुवातीला ३ बाद २६ अशी अवस्था झाली होती. पहिल्या डावात ९६ धावांची खेळी करणारा सलामीवीर मुरली विजय केवळ १६ धावा काढून बाद झाला. दिनेश कार्तिक (६४) व विजय शंकर (८२) यांनी चौथ्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. कार्तिकने १०७ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार ठोकले तर शंकरने १४६ चेंडूंमध्ये ९ चौकार व ३ षटकार ठोकले. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर तामिळनाडूची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंद्रजित (६) आणि एम. रंगराजन (३) खेळपट्टीवर आहे. विदर्भातर्फे दुसऱ्या डावात स्वप्नील बंडीवारने ३ बळी घेतले. (क्रीडा प्रतिनिधी)