शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

युवी म्हणजे टीम इंडियाचा ‘एक्स फॅक्टर’

By admin | Updated: June 6, 2017 05:05 IST

भारताचा पाकवरील विजय अनपेक्षित नव्हे, तर वर्चस्वपूर्ण तसेच श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ठरला

व्हीव्हीएस लक्ष्मण लिहितात...भारताचा पाकवरील विजय अनपेक्षित नव्हे, तर वर्चस्वपूर्ण तसेच श्रेष्ठत्व सिद्ध करणारा ठरला. सुरुवातीला फलंदाजांनी धडाका दाखविल्यानंतर गोलंदाजांनी स्वत:चे कर्तव्य चोखपणे बजावित काम सोपे केले. पावसाने हजेरी लावल्यानंतरही भारतीय खेळाडूंची लय मात्र कायमच होती. ही आत्मविश्वासाची नांदी आहे. या स्पर्धेत आम्ही जेतेपद राखण्यासाठीच आलो आहोत, हे दाखवून देण्याचे संकेत असावेत.आघाडीच्या चारही फलंदाजांनी धावा काढल्या. मी मात्र युवराज सिंगच्या खेळीने प्रभावित झालो. तीन आठवड्यांनंतर युवीची बॅट तळपली असावी; पण या खेळीदरम्यान आपण मध्ये ‘फ्लॉप’ ठरल्याची कसर युवीने शिल्लक राखली नाही. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत युवीसारख्या खेळाडूकडून अशीच अपेक्षा आहे. त्याने मोठी फटकेबाजी करीत चाहत्यांना सुखावणारी कामगिरी केली आहे. युवी फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघ सुस्थितीत होताच, पण त्याने खेळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संघाला ज्याची गरज होती ती गरज पूर्ण केली. युवीने पाकच्या माऱ्याची नाडी ओळखून जो खेळ केला, त्यामुळे मला त्याच्यातील जुना युवी पुन्हा पाहायला मिळाला. दुसरीकडे कोहलीला बॅट आणि चेंडू यामध्ये समन्वय साधण्यात थोडा त्रास जाणवत असताना युवीने दडपण झुगारून स्वमर्जीने फटकेबाजी केली. त्याने मारलेले फटके, कुठल्या क्षेत्रात फटकेबाजी करायची याचा घेतलेला वेध तसेच कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचे याचा ताळमेळ साधून युवीने धावा काढल्या. यासाठी तासन्तास नेटमध्ये घाम गाळावा लागतो. त्यानंतरच मनसोक्त फटकेबाजी करण्याचा आत्मविश्वास बळावतो आणि अधिकार प्राप्त होतो.युवराज सिंग जेव्हा स्वत:चा नैसर्गिक खेळ करतो, तेव्हा तो शिखरावर असतो. गोलंदाजांना कसे चोपायचे याबद्दल सूर गवसला की, मग तो कुठलीही हयगय न करता किंवा दयामाया न दाखविता मोठे फटके मारतो. यातून युवीचा अनुभव आणि फलंदाजीतील मुरब्बीपणा नजरेस पडतो. आयपीएलदरम्यान आम्ही दोघांनी सनरायजर्स हैदराबादसाठी बरेच डावपेच आखले. यादरम्यान मला एक बाब पाहायला मिळाली, ती म्हणजे, युवीचा सकारात्मक दृष्टिकोन! हीच मोकळीक त्याच्या स्वत:च्या खेळीत पाहायला मिळणे हे भारतीय संघाच्या यशस्वी वाटचालीचे सुंदर संकेत ठरावेत. प्रत्येक संघाला कुठल्यातरी ‘एक्स फॅक्टर’ची गरज असते. भारतीय संघाची ही गरज युवी पूर्ण करतो. भूतकाळातही आम्हाला हे जाणवले. युवीने ज्या स्पर्धेत सुरुवातीपासून धडाकेबाज कामगिरी केली, ती स्पर्धा भारतासाठी उत्कृष्ट ठरली हे देखील अनुभवले आहे. याशिवाय माझ्या दृष्टीने नेत्रदीपक ठरलेली बाब म्हणजे अर्थात संघातील लवचिकपणा. धोनीला थांबवून हार्दिक पांड्याला अग्रक्रम देणे हा ‘मास्टर स्ट्रोक’ ठरला. हार्दिकने झटपट धावा काढायच्या कशा, हे उत्तुंग फटकेबाजीतून सिद्ध केले.भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये चांगले क्षेत्ररक्षण करणारा संघ अशी ओळख निर्माण करीत आहे. तरीही सुधारणेस वाव आहे, असे जाणवले. पुढील सामना श्रीलंकेविरुद्ध होईल तेव्हा क्षेत्ररक्षणात कुठलाही गाफीलपणा परवडणारा नसेल. त्यादृष्टीने कंबर कसायला हवी. (गेमप्लान)