शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

टीम इंडियासोबत दीड वर्षांची सोबत अविस्मरणीय : शास्त्री

By admin | Updated: May 27, 2016 04:01 IST

भारतीय क्रिकेट संघासोबत संचालक या नात्याने दीड वर्ष काम करणे आयुष्यातील अविस्मरणीय काळ ठरल्याचे मत रवी शास्त्री यांनी नोंदविले आहे. कराराचे नूतनीकरण करणार का, यावर

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघासोबत संचालक या नात्याने दीड वर्ष काम करणे आयुष्यातील अविस्मरणीय काळ ठरल्याचे मत रवी शास्त्री यांनी नोंदविले आहे. कराराचे नूतनीकरण करणार का, यावर मात्र त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. भारतीय संघासोबतच्या त्यांच्या कार्यकाळाबद्दल विचारताच शास्त्री म्हणाले, ‘मी आधी ज्या संघाचा खेळाडू राहिलो त्याच संघाचा संचालक म्हणून १८ महिने काम सांभाळणे संस्मरणीय ठरले. या दरम्यान जे काही निष्पन्न झाले ते आयुष्यात सर्वांत अविस्मरणीय म्हणावे लागेल. याचे श्रेय खेळाडूंना जाते.’बीसीसीआयने जाहिरात दिल्यास मुख्य कोच पदासाठी अर्ज करणार का, असा सवाल करताच शास्त्री यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, ‘मी केवळ आयपीएल फायनलच्या अ‍ॅक्रिडेशनसाठी अर्ज करणार आहे.’आॅगस्ट २०१४ मध्ये इंग्लंडला १-३ ने मालिका गमविल्यानंतर शास्त्री यांनी संचालकपद सांभाळले. ते यंदा टी-२० विश्वचषकापर्यंत पदावर होते. जुन्या स्मृतींना उजाळा देत ते म्हणाले,‘१९८३ चा विश्वकप आणि १९८५ची विश्व क्रिकेट चॅम्पियनशिप स्मरणात आहेत. पण, संघासोबत घालविलेले १८ महिने त्याहून विशेष ठरले. इंग्लंडला वन-डेत त्यांच्याच भूमीत नमविले. टी-२० तही इंग्लंडचा व्हाईटवॉश दिला. श्रीलंकेत २२ वर्षानंतर मालिका जिंकली. द. आफ्रिकेला एका दशकानंतर कसोटी मालिकेत पराभूत केले.’ या मालिकांमध्ये विशेष अशी कुठली मालिका होती, या प्रश्नाच्या उत्तरात शास्त्री यांनी ‘मी तुलना करणार नाही. निर्णय चाहत्यांना घ्यायचा आहे.’ असे सांगितले. (वृत्तसंस्था)कोहलीला वन-डे संघाचे कर्णधारपद देखील सोपवायला हवे का, या पश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळून शास्त्री म्हणाले, ‘मी काय सांगावे. कोहली केवळ २७ वर्षांचा आहे. त्याचे करिअर बराच काळ चालणार आहे.’ आपल्या कार्यकाळात अजिंक्य रहाणे, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांनी विशेष मेहनत घेत वेगवान सुधारणा केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.