शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अंडर१९ वर्ल्डकप - भारताचा श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय, भारताची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: February 9, 2016 17:45 IST

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते

ऑनलाइन लोकमत 
मिरपूर, दि. ९ - भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९७ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. जबरदस्त फॉर्मात असलेला ऋषभ पंतला अवघ्या १४ धावांवर बाद झाला. तसेच कर्णधार ईशान किसनही लवकर बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद २७ अशी बिकट झाली होती. पण सर्फराज खान आणि अनमोलप्रीत सिंग यांच्या अर्धशतकांनी भारताचा डाव सावरला. त्यामुळे भारताला अडीचशे धावांचा टप्पा पार करता आला.
 
भारताकडून अनमोलप्रीत सिंगने सर्वाधिक (७२), सर्फराज खान (५९) आणि वॉशिंगटन सुंदरने (४३) धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले होते. पन्नास षटकांच्या अखेरीस भारताला ९ विकेट्सच्या मोबदल्यात २६७ धावा करता आल्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला केवळ १७० धावांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेकडून पी.मेंडिस(३९), शामू अशान(३८) यांना वगळता इतर कोणत्याही फलंदाजाचा खेळपट्टीवर निभाव लागला नाही. भारताकडून मयांक डागर याने भेदक गोलंदाजी करत ५.४ षटकांत २१ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या, तर आवेश खान याने ९ षटकांत ४१ धावा देऊन २ विकेट्स मिळवल्या. के.अहमद, राहुल बाथम आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान, दुसऱया उपांत्य फेरीत बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात विजयी ठरणाऱया संघाची अंतिम फेरीत भारताशी लढत होईल.

भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे. भारताने साखळी फेरीत आयर्लंड, न्यूझीलंड आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर नामिबियाचा १९७ धावांच्या फरकाने पराभव करीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते. ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी या स्पर्धेत आतापर्यंत अनुक्रमे २६६ व ३०४ धावा फटकावल्या आहेत. भारतीय संघाचे हे दोन प्रमुख फलंदाज आहेत.