शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

उमेशने चांगली सुरुवात केली : गंभीर

By admin | Updated: May 6, 2015 02:54 IST

गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली.

कोलकाता : गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली. पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा वेगवान गोलंदाज उमेश यादवची गंभीरने विशेष प्रशंसा केली. गंभीर म्हणाला, ‘‘सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारता आला. या खेळपट्टीवर १६०-१६५ धावा पुरेशा होत्या; पण त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकवले. गोलंदाजांनी अचूक मारा केला. आंद्रे रसेल जर लवकर बाद झाला नसता, तर आम्हाला १८०पर्यंत मजल मारता आली असती. फिरकीपटूंची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.’’गंभीरने वेगवान गोलंदाज उमेश यादवची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘उमेशने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने सनरायझर्स संघाच्या पहिल्या दोन विकेट सुरुवातीच्या षटकात माघारी परतवल्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली आला. त्यानंतर अन्य गोलंदाजांनी अचूक मारा करून दडपण कायम राखले.’’ गंभीर पुढे म्हणाला, ‘‘आम्ही सुरुवातीला फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. तीन फिरकीपटूंचा समावेश असलेला आमचा संघ लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी ठरेल, असा आम्हाला विश्वास होता.’’पहिल्याच षटकात दोन बळी घेऊन ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरलेला उमेश यादव म्हणाला, ‘‘डेव्हिड वॉर्नरचा बळी आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. प्रतिस्पर्धी संघावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजविणे आवश्यक होते. वॉर्नरला रोखण्यासाठी आम्ही विशेष योजना आखली होती व त्यात यशस्वी ठरलो.’’उमेश पुढे म्हणाला, ‘‘मी सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले असून, गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगवान गोलंदाज असल्यामुळे योजनाबद्ध मारा करणे आवश्यक असते आणि चेंडूची दिशा स्वत:च निश्चित करावी लागते.’’ उमेशने ४ षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)