शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उमेशने चांगली सुरुवात केली : गंभीर

By admin | Updated: May 6, 2015 02:54 IST

गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली.

कोलकाता : गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर सोमवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध ३५ धावांनी विजय मिळविता आला, अशी प्रतिक्रिया कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीरने व्यक्त केली. पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा वेगवान गोलंदाज उमेश यादवची गंभीरने विशेष प्रशंसा केली. गंभीर म्हणाला, ‘‘सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकारता आला. या खेळपट्टीवर १६०-१६५ धावा पुरेशा होत्या; पण त्यानंतर गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करून सामन्याचे पारडे आमच्या बाजूने झुकवले. गोलंदाजांनी अचूक मारा केला. आंद्रे रसेल जर लवकर बाद झाला नसता, तर आम्हाला १८०पर्यंत मजल मारता आली असती. फिरकीपटूंची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.’’गंभीरने वेगवान गोलंदाज उमेश यादवची प्रशंसा करताना म्हटले, ‘‘उमेशने आम्हाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने सनरायझर्स संघाच्या पहिल्या दोन विकेट सुरुवातीच्या षटकात माघारी परतवल्या. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली आला. त्यानंतर अन्य गोलंदाजांनी अचूक मारा करून दडपण कायम राखले.’’ गंभीर पुढे म्हणाला, ‘‘आम्ही सुरुवातीला फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. तीन फिरकीपटूंचा समावेश असलेला आमचा संघ लक्ष्याचा बचाव करण्यात यशस्वी ठरेल, असा आम्हाला विश्वास होता.’’पहिल्याच षटकात दोन बळी घेऊन ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरलेला उमेश यादव म्हणाला, ‘‘डेव्हिड वॉर्नरचा बळी आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा होता. प्रतिस्पर्धी संघावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजविणे आवश्यक होते. वॉर्नरला रोखण्यासाठी आम्ही विशेष योजना आखली होती व त्यात यशस्वी ठरलो.’’उमेश पुढे म्हणाला, ‘‘मी सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले असून, गोलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहे. वेगवान गोलंदाज असल्यामुळे योजनाबद्ध मारा करणे आवश्यक असते आणि चेंडूची दिशा स्वत:च निश्चित करावी लागते.’’ उमेशने ४ षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)