शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

ताम्हिणी घाटातील ट्रेकमुळे विराटसेनेची गाडी ट्रॅकवर

By admin | Updated: March 7, 2017 18:05 IST

भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाच झाला, असे म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला

 नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमतबेंगळुरु, दि. 7 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गेल्या दहा महिन्यात भारतीय संघाने विरोधी संघावर हुकूमत गाजवताना निर्विवाद वर्चस्व राखले होते. पण ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ रोखण्यासाठी खेळपट्टी आणि खेळाडूंचा महिनाभर अभ्यास करून तगडे आव्हान दिले आहे. 19 कसोटी सामन्यानंतर पुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात 333 धावांच्या माणहानीकारक पराभवाला भारताला सामोर जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीतील कात्रजचा घाट दाखवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी विराट सेनेला घेऊन थेट ताम्हिणी घाट गाठला होता. विजय मिळवण्यासाठी दडपण न घेता नॅचरल खेळ करण्यावर जम्बो उर्फ कुंबळेचा भर आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात सर्व संघासह मनसोक्त ट्रेकिंग केले. गेल्या 18 महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने यानिमित्तानं सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आपला शिणवटा घालवला. खऱ्या अर्थाने भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाट झाला म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. बंगळुरू कसोटीत विजयी पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाने सर्व प्रकारे तयारी केली होती. संयम कधी बाळगावा आणि आक्रमकपणा कधी आणावा तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भारताने ताम्हिणी घाटात ट्रेकही केला होता.पुण्यातील विजयानंतर बंगळुरू कसोटीमध्ये पाहुण्या संघ मनोधैर्यासह मैदानात उतरला होता. पहिल्या डावात त्यांनी आघाडी घेत दुसरी कसोटी खिशात घालणार,असे वाटत होते. पण सांघिक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने विजयश्री खेचून आणला. ताम्हिणी घाटातील ट्रेकिंग नंतर कोहली अँड कंपनीने पुण्यातील कामगिरीबाबत अधिक विचार न करता बेंगळुरू कसोटीत चमकदार कामगिरी करत कसोटीतील आपली बादशाहत कायम ठेवली आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 बरोबरी करत बॉर्डर-गावस्कर चषकात रोमांचकता वाढवली आहे. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे मनोधैर्य नक्कीच वाढले असेल. यानंतर भारतीय संघाने खेळावर आणि आपल्या कामगिरीवर अधिक चांगली करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ते करण्यासाठी मनात कुठेही किंतु परंतु नको. निराशा व राग यामुळे भारतीय संघाची कामगिरी भरकटू शकते. ताम्हिणी घाटातील ट्रेकनंतर भारतीय संघाचे मनोबल, आत्मविश्वास उंचावलेला आहे, पुढच्या दोन कसोटी सामन्यात भारताने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखायला हवे. पाहुण्या संघाविरुद्ध आगामी दोन्ही कसोटी सामन्यत भारताने निर्विवाद वर्चस्व राखल्यास ताम्हिणी घाटाच्या ट्रेकमुळे संघातील खेळाडू ट्रॅकवर आले, असेच म्हणावे लागेल. दोन कसोटीमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन संघानी केलेल्या तयारीकडे डोळेझाक करू शकत नाही. ऑस्ट्रेलियन संघाने दुबईमध्ये सराव केला. त्यांना येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. पुणे आणि बंगळुरू कसोटी सामन्यात त्याची प्रचिती आली. पाहुण्या संघाची फलंदाजी मजबूत भासत आहे. रांची कसोटीमध्ये भारतीय संघाला पहिल्या चेंडूपासून विजयाचा निर्धार दाखवावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूवर हल्लाबोल करावा लागणार आहे. पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाची देहबोली निराशाजनक होती. ओकिफ आणि लायनविरुद्ध परंपरागत दृष्टिकोन राखून खेळण्याचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. त्यांच्याविरोधात आक्रमकपणे खेळण्यावर भर द्यावा लागेल. जोपर्यंत भारतीय संघ नंबर वन प्रमाणे क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत पाहुणा संघ भरतावर वर्चस्व गाजवू शकतो.