शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हिणी घाटातील ट्रेकमुळे विराटसेनेची गाडी ट्रॅकवर

By admin | Updated: March 7, 2017 18:05 IST

भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाच झाला, असे म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला

 नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमतबेंगळुरु, दि. 7 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी गेल्या दहा महिन्यात भारतीय संघाने विरोधी संघावर हुकूमत गाजवताना निर्विवाद वर्चस्व राखले होते. पण ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ रोखण्यासाठी खेळपट्टी आणि खेळाडूंचा महिनाभर अभ्यास करून तगडे आव्हान दिले आहे. 19 कसोटी सामन्यानंतर पुण्यात झालेल्या पहिल्या सामन्यात 333 धावांच्या माणहानीकारक पराभवाला भारताला सामोर जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीतील कात्रजचा घाट दाखवल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी विराट सेनेला घेऊन थेट ताम्हिणी घाट गाठला होता. विजय मिळवण्यासाठी दडपण न घेता नॅचरल खेळ करण्यावर जम्बो उर्फ कुंबळेचा भर आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी ताजेतवाने होण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जंगलात सर्व संघासह मनसोक्त ट्रेकिंग केले. गेल्या 18 महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय संघाने यानिमित्तानं सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आपला शिणवटा घालवला. खऱ्या अर्थाने भारतीय संघाला ताम्हिणी घाटात ट्रेकिंग केल्याचा एकप्रकारे फायदाट झाला म्हणावे लागेल. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत पिछाडीवर असतानाही ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. बंगळुरू कसोटीत विजयी पुनरागमन करण्यासाठी भारतीय संघाने सर्व प्रकारे तयारी केली होती. संयम कधी बाळगावा आणि आक्रमकपणा कधी आणावा तसेच मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भारताने ताम्हिणी घाटात ट्रेकही केला होता.पुण्यातील विजयानंतर बंगळुरू कसोटीमध्ये पाहुण्या संघ मनोधैर्यासह मैदानात उतरला होता. पहिल्या डावात त्यांनी आघाडी घेत दुसरी कसोटी खिशात घालणार,असे वाटत होते. पण सांघिक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने विजयश्री खेचून आणला. ताम्हिणी घाटातील ट्रेकिंग नंतर कोहली अँड कंपनीने पुण्यातील कामगिरीबाबत अधिक विचार न करता बेंगळुरू कसोटीत चमकदार कामगिरी करत कसोटीतील आपली बादशाहत कायम ठेवली आहे. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 बरोबरी करत बॉर्डर-गावस्कर चषकात रोमांचकता वाढवली आहे. या विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे मनोधैर्य नक्कीच वाढले असेल. यानंतर भारतीय संघाने खेळावर आणि आपल्या कामगिरीवर अधिक चांगली करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. ते करण्यासाठी मनात कुठेही किंतु परंतु नको. निराशा व राग यामुळे भारतीय संघाची कामगिरी भरकटू शकते. ताम्हिणी घाटातील ट्रेकनंतर भारतीय संघाचे मनोबल, आत्मविश्वास उंचावलेला आहे, पुढच्या दोन कसोटी सामन्यात भारताने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य राखायला हवे. पाहुण्या संघाविरुद्ध आगामी दोन्ही कसोटी सामन्यत भारताने निर्विवाद वर्चस्व राखल्यास ताम्हिणी घाटाच्या ट्रेकमुळे संघातील खेळाडू ट्रॅकवर आले, असेच म्हणावे लागेल. दोन कसोटीमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियन संघानी केलेल्या तयारीकडे डोळेझाक करू शकत नाही. ऑस्ट्रेलियन संघाने दुबईमध्ये सराव केला. त्यांना येथील परिस्थितीची चांगली कल्पना आहे. पुणे आणि बंगळुरू कसोटी सामन्यात त्याची प्रचिती आली. पाहुण्या संघाची फलंदाजी मजबूत भासत आहे. रांची कसोटीमध्ये भारतीय संघाला पहिल्या चेंडूपासून विजयाचा निर्धार दाखवावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक खेळाडूवर हल्लाबोल करावा लागणार आहे. पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाची देहबोली निराशाजनक होती. ओकिफ आणि लायनविरुद्ध परंपरागत दृष्टिकोन राखून खेळण्याचा लाभ मिळणार नाही. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. त्यांच्याविरोधात आक्रमकपणे खेळण्यावर भर द्यावा लागेल. जोपर्यंत भारतीय संघ नंबर वन प्रमाणे क्रिकेट खेळत नाही तोपर्यंत पाहुणा संघ भरतावर वर्चस्व गाजवू शकतो.