शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

...त्या तिरंदाजांवर तीन वर्षांची बंदी

By admin | Updated: July 23, 2015 00:47 IST

जागतिक आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीसाठी वेळेवर न पोहोचणाऱ्या तीन तिरंदाज आणि त्यांच्या कोचवर एआययूने

नवी दिल्ली : जागतिक आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीसाठी वेळेवर न पोहोचणाऱ्या तीन तिरंदाज आणि त्यांच्या कोचवर एआययूने (भारतीय विद्यापीठ संघ) तीन वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. शिवाय या दौऱ्यातील खर्च त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे.तिरंदाज गुरविंदरसिंग, कंवलप्रितसिंग आणि अमन हे तीन खेळाडू व त्यांचे कोच जीवनज्योत सिंग यांच्यावर बेपर्वा वृत्ती, नियमांचे उल्लंघन तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाची प्रतिमा खराब करणे, बदनामी व नामुष्की होईल असे कृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला.कंपाउंड प्रकारात सहभागी झालेले तिरंदाजांचे हे त्रिकूट ३ ते १४ जुलै या कालावधीत ग्वांगझूमध्ये झालेल्या विश्व आंतरविद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदकाच्या लढतीत इटलीविरुद्ध खेळले नव्हते. एआययूने संबंधित सचिवांना लिहिलेल्या पत्रात लिहिले की, ‘हे खेळाडू स्पर्धेच्या कांस्यपदकाच्या लढतीत वेळेवर पोहोचले नाहीत. त्यांनी बेपर्वाई करीत देशाची बदनामी केली. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला बदनामी सहन करावी लागली.’ या तिघांवर २०१५ ते २०१८ या काळात आंतर विद्यापीठ तसेच विश्व आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी बंदी लागू राहील. या तिरंदाजांना त्यांची निवड, सराव आणि प्रतिनिधित्व यावर झालेला खर्च आणि विमान प्रवासाचा खर्च परत करावा लागेल. हा खर्च प्रतिखेळाडू पाच लाख इतका आहे. (वृत्तसंस्था)