शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

पावसामुळे रखडला तिसऱ्या दिवसाचा खेळ

By admin | Updated: August 12, 2016 03:57 IST

दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही.

ग्रास इसलेट : दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही. भारतीयांना पहिल्या डावात ३५३ धावांत रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर यजमानांनी मजबूत सुरुवात करत ४७ षटकात १ बाद १०७ धावांची मजल मारली होती.सेंट ल्यूसियामध्ये ढगाळ वातावरण कायम असून हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल. शिवाय मैदानातील काही भागामध्ये पाणी साचले असल्याने मैदान सुकविण्याचे मोठे आव्हान ग्राऊंड्समनपुढे असेल. तत्पूर्वी, आघाडीची फळी स्वस्तात ढेपाळल्यानंतर भारताची ५ बाद १२६ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साह (१०७) यांनी दमदार शतक झळकावताना सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक द्विशतकी भागीदारी करुन भारताला समाधानकार मजल मारुन दिली. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजने सावध सुरुवात करताना अर्धशतकी सलामी दिली. दिवसभर भारताला यश मिळणार नाही याची पुरेपुर काळजी क्रेग ब्रेथवेट आणि लिआॅन जॉन्सन यांनी घेतली होती. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जॉन्सनला धावबाद करताना लोकेश राहुलने भारताला पहिले यश मिळवून दिले. जॉन्सनन ७५ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. त्याने ब्रेथवेटसह शानदार ५९ धावांची भागीदारी केली. यानंतर दिवसअखेर ब्रेथवेट - डॅरेन ब्रावो यांनी टिकून राहताना नाबाद ४८ धावांची भागीदारी करुन भारतीय गोलंदाजांना रोखले. ब्रेथवेटने १४३ चेंडूत ६ चौकरांसह नाबाद ५३ धावा काढल्या असून त्याला उपयुक्त साथ देणारा ब्रावो ६६ चेंडूत १८ धावांवर नाबाद आहे.