शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

पावसामुळे रखडला तिसऱ्या दिवसाचा खेळ

By admin | Updated: August 12, 2016 03:57 IST

दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही.

ग्रास इसलेट : दुसऱ्या कसोटीप्रमाणे पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने भारत विरुध्द वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवशी एकही चेंडूचा खेळ झाला नाही. भारतीयांना पहिल्या डावात ३५३ धावांत रोखल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर यजमानांनी मजबूत सुरुवात करत ४७ षटकात १ बाद १०७ धावांची मजल मारली होती.सेंट ल्यूसियामध्ये ढगाळ वातावरण कायम असून हवामान विभागाने वर्तविलेल्या शक्यतेनुसार संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल. शिवाय मैदानातील काही भागामध्ये पाणी साचले असल्याने मैदान सुकविण्याचे मोठे आव्हान ग्राऊंड्समनपुढे असेल. तत्पूर्वी, आघाडीची फळी स्वस्तात ढेपाळल्यानंतर भारताची ५ बाद १२६ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (११८) आणि यष्टीरक्षक वृध्दिमान साह (१०७) यांनी दमदार शतक झळकावताना सहाव्या विकेटसाठी २१३ धावांची निर्णायक द्विशतकी भागीदारी करुन भारताला समाधानकार मजल मारुन दिली. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजने सावध सुरुवात करताना अर्धशतकी सलामी दिली. दिवसभर भारताला यश मिळणार नाही याची पुरेपुर काळजी क्रेग ब्रेथवेट आणि लिआॅन जॉन्सन यांनी घेतली होती. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जॉन्सनला धावबाद करताना लोकेश राहुलने भारताला पहिले यश मिळवून दिले. जॉन्सनन ७५ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. त्याने ब्रेथवेटसह शानदार ५९ धावांची भागीदारी केली. यानंतर दिवसअखेर ब्रेथवेट - डॅरेन ब्रावो यांनी टिकून राहताना नाबाद ४८ धावांची भागीदारी करुन भारतीय गोलंदाजांना रोखले. ब्रेथवेटने १४३ चेंडूत ६ चौकरांसह नाबाद ५३ धावा काढल्या असून त्याला उपयुक्त साथ देणारा ब्रावो ६६ चेंडूत १८ धावांवर नाबाद आहे.