शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

सहा महिन्यांपासून संवाद नव्हता

By admin | Updated: June 22, 2017 01:17 IST

सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मुख्य सल्लागार समितीने (सीएसी) कुंबळे यांचा कार्यकाळ वाढविण्यास थेट हिरवा कंदील दाखविला नव्हता.

नवी दिल्ली : संघात सर्व काही ‘आॅल-वेल’ नाही, अशी शंका बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना होती, पण कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांसोबत बोलत नसल्याचे कळल्यावर त्यांना आश्चर्य वाटले. एक महत्त्वाची बाबही समोर आली आहे, की सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मुख्य सल्लागार समितीने (सीएसी) कुंबळे यांचा कार्यकाळ वाढविण्यास थेट हिरवा कंदील दाखविला नव्हता. या प्रकरणादरम्यान लंडनमध्ये उपस्थित असलेले बीसीसीआयचे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले, ‘‘अहवालामध्ये म्हटले, की सीएसीने कुंबळे यांचा कार्यकाळ वाढविण्यास सांगितले आहे. त्यांनी असे म्हटले होते, पण एक अटही होती. सर्व प्रकरणे मिटविल्यानंतर कुंबळे यांना पदावर कायम ठेवण्यात येईल.’’आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीनंतर भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये तीन वेगवेगळ्या बैठका झाल्या. पहिल्या बैठकीमध्ये कुंबळे बीसीसीआयचे आघाडीचे पदाधिकारी व सीएसीच्या सदस्यांसोबत भेटले. त्यानंतर त्यांची कोहलीसोबत बैठक झाली. तिसरी व अखेरची बैठक अधिक घटनाप्रदान ठरली. त्यात कोहली व कुंबळे सोबत होते. चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली. अधिकाऱ्याने सांगितले, ‘‘या दोघांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर एकमेकांसोबत बोलणे सोडले होते. अडचणी होत्या, पण या दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून संवाद नव्हता, ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. रविवारी अंतिम सामन्यानंतर ते एकत्र बसले आणि एकत्र वाटचाल कठीण असल्याच्या मुद्यावर त्यांचे एकमत होते.’’ अडचण काय होती? याबाबत बोलताना सूत्राने सांगितले, ‘ज्या वेळी आम्ही कुंबळेसोबत वेगळी चर्चा केली आणि विचारले, की काही अडचण आहे का, त्यावर त्यांनी सांगितले, की विराटबाबत कुठली अडचण नाही. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्राबाबत चर्चा केली. त्यावर कोहलीला आक्षेप होता. कुंबळेने सांगितले, की ही काही समस्या नाही.’’ अधिकारी म्हणाला, ‘‘दोघांपैकी जर एक व्यक्ती मानत असेल की काही अडचण नाही तर दोघेही चर्चा करून त्यावर तोडगा काढू शकतात. ज्या वेळी दोघांनी एकत्र चर्चा केली त्या वेळी दोघांनाही असे वाटले, की यावर तोडगा निघणे शक्य नाही.’’ सीओएने मागविला अहवालप्रशासकीय समितीचे प्रमुख (सीओए) विनोद रॉय यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोरी यांना भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक कपिल मल्होत्रा यांच्याकडे कुंबळे-कोहली वादाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत. कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर हा आदेश देण्यात आला. २४ जून रोजी मुंबईत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर कुंबळे यांच्या राजीनाम्याबाबत विनोद रॉय चर्चा करणार आहेत.(वृत्तसंस्था)गेल्या वर्षभरात मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, याचा मी पुनरुच्चार करतो. मी नेहमी भारताच्या महान क्रिकेट परंपरेचा शुभचिंतक राहील.कुंबळे यांनी आयसीसीच्या वार्षिक बैठकीसाठी लंडनमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. कारण कुंबळे क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहे. भारतीय संघ बार्बाडोसला रवाना झाला.