शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाच वर्षे तरी दबदबा असावा!

By admin | Updated: June 3, 2015 00:43 IST

अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत,

नवी दिल्ली : अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत, असे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सांगितले. महेंद्रसिंग धोनीने जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ केला होता. त्यानंतर विराट कोहलीकडे कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोपविण्यात आले. कर्णधार म्हणून आज तो प्रथमच बोलला. एका मुलाखतीत तो म्हणाला, आपण संघात मैत्रिपूर्ण वातावरणाची अपेक्षा करीत आहे. विश्व क्रिकेटवर भारतीय संघाने किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवावे, असे मला वाटते. तशा संघाची मी अपेक्षा करतो. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. क्षमताही भरपूर आहे. प्रश्न फक्त योग्य ताळमेळाचा आहे. एवढेच नव्हे, तर आम्ही वर्षातून २५०-२८० दिवस सोबत राहतो. त्यामुळे संघात मैत्रिपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे आणि तसेच वातावरण तयार करण्याचा माझा प्रयत्न असेल. संघ हा शंका आणि असुरक्षिततेपासून मुक्त राहायला हवा. आॅस्ट्रेलिया संघ जेव्हा आपण खेळताना पाहतो तेव्हा तो संघ सर्व क्षेत्रात एकजुटीने खेळताना दिसतो आणि त्यामुळे या संघाविरुद्ध सर्वाेत्कृष्ट प्रदर्शनाची गरज असते. भारतीय संघाने सुद्धा अशीच कामगिरी करावी, असे मला वाटते. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने ४ कसोटी सामन्यांत ६९२ धावा केल्या होत्या. या मालिकेबाबत तो म्हणाला, मला आठवतेय की, या मालिकेसाठी मी दोन महिन्यांपूर्वीच मानसिक तयारी केली होती. मला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे. आॅस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडायचे आहे आणि तेच झाले.सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सर्वच शक्य आहे.(वृत्तसंस्था)