शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

पाच वर्षे तरी दबदबा असावा!

By admin | Updated: June 3, 2015 00:43 IST

अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत,

नवी दिल्ली : अशी टीम बनायला हवी, जी विश्व क्रिकेटवर किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवेल. असा संघ पाहण्यास आपण उत्सुक आहोत, असे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी सांगितले. महेंद्रसिंग धोनीने जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ केला होता. त्यानंतर विराट कोहलीकडे कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोपविण्यात आले. कर्णधार म्हणून आज तो प्रथमच बोलला. एका मुलाखतीत तो म्हणाला, आपण संघात मैत्रिपूर्ण वातावरणाची अपेक्षा करीत आहे. विश्व क्रिकेटवर भारतीय संघाने किमान पाच वर्षे तरी अधिराज्य गाजवावे, असे मला वाटते. तशा संघाची मी अपेक्षा करतो. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता नाही. क्षमताही भरपूर आहे. प्रश्न फक्त योग्य ताळमेळाचा आहे. एवढेच नव्हे, तर आम्ही वर्षातून २५०-२८० दिवस सोबत राहतो. त्यामुळे संघात मैत्रिपूर्ण वातावरण असणे गरजेचे आहे आणि तसेच वातावरण तयार करण्याचा माझा प्रयत्न असेल. संघ हा शंका आणि असुरक्षिततेपासून मुक्त राहायला हवा. आॅस्ट्रेलिया संघ जेव्हा आपण खेळताना पाहतो तेव्हा तो संघ सर्व क्षेत्रात एकजुटीने खेळताना दिसतो आणि त्यामुळे या संघाविरुद्ध सर्वाेत्कृष्ट प्रदर्शनाची गरज असते. भारतीय संघाने सुद्धा अशीच कामगिरी करावी, असे मला वाटते. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात विराटने ४ कसोटी सामन्यांत ६९२ धावा केल्या होत्या. या मालिकेबाबत तो म्हणाला, मला आठवतेय की, या मालिकेसाठी मी दोन महिन्यांपूर्वीच मानसिक तयारी केली होती. मला आक्रमक क्रिकेट खेळायचे आहे. आॅस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुटून पडायचे आहे आणि तेच झाले.सकारात्मक दृष्टिकोन असेल तर सर्वच शक्य आहे.(वृत्तसंस्था)