शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

पाकविरुद्ध भारतावर दबाव असेल : व्यंकटपती राजू

By admin | Updated: February 5, 2015 01:25 IST

१५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : विश्वचषकात टीम इंडिया पाककडून कधीही पराभूत झालेला नाही. यंदा मात्र अ‍ॅडिलेड येथे १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.आशियाई क्रिकेट परिषदेचे विकास अधिकारी असलेला राजू म्हणाला, की पाकच्या तुलनेत भारताची अलीकडील कामगिरी सरस आहे. पण गत चॅम्पियन या नात्याने आणि पाकविरुद्धचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवायचा असल्याने जिंकण्यासाठी भारतावर दबाव असेल. पाककडे गमावण्यासारखे काहीही नाही. १९९२ साली आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात राजू भारतीय संघाचा सदस्य होता. तो म्हणाला, की विश्वचषकात भारत- पाक सामना पाहणे हा थरार असतो. आमच्यावरही दबाव येतो. भारताला चॅम्पियन बनायचे झाल्यास पाकला पराभूत करावे लागेल. फिल्डिंगमध्ये आलेल्या मर्यादा आणि पॉवरप्लेबाबतचे नवे नियम यामुळे भारतीय उपखंडातील सेमीफायनल गाठणे कठीण होईल. १९९२ आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्या वेळी क्षेत्ररक्षणावर मर्यादा नव्हत्या. आता ३० यार्डमध्ये पाच खेळाडू अनिवार्य असतात आणि पॉवरप्लेदेखील असतो. भारताने अंतिम चार संघांत स्थान मिळवावे, अशी इच्छा व्यक्त करीत चारमध्ये भारत येईलच, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे राजूचे मत आहे. आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे दोन बलाढ्य संघ असल्याचे तो म्हणाला. न्यूझीलंड, भारत आणि लंका हे अखेरच्या सहा संघांत स्थान मिळवू शकतात, पण भारतीय उपखंडात मेहनत घ्यावी लागेल. भारतीय गोलंदाज आॅस्ट्रेलियात निष्प्रभावी ठरत आहेत. गोलंदाजीतील ही उणीव दूर करण्यासाठी फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. जडेजा व अक्षर पटेल नवे असल्याने फलंदाजीवर अधिक विसंबून राहावे लागणार आहे. अश्विनकडून काही अपेक्षा असतील, पण पॉवरप्लेमध्ये ईशांतने धावा रोखायला हव्या, असे मत राजूने व्यक्त केले.(वृत्तसंस्था)