शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

पाकविरुद्ध भारतावर दबाव असेल : व्यंकटपती राजू

By admin | Updated: February 5, 2015 01:25 IST

१५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : विश्वचषकात टीम इंडिया पाककडून कधीही पराभूत झालेला नाही. यंदा मात्र अ‍ॅडिलेड येथे १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.आशियाई क्रिकेट परिषदेचे विकास अधिकारी असलेला राजू म्हणाला, की पाकच्या तुलनेत भारताची अलीकडील कामगिरी सरस आहे. पण गत चॅम्पियन या नात्याने आणि पाकविरुद्धचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवायचा असल्याने जिंकण्यासाठी भारतावर दबाव असेल. पाककडे गमावण्यासारखे काहीही नाही. १९९२ साली आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात राजू भारतीय संघाचा सदस्य होता. तो म्हणाला, की विश्वचषकात भारत- पाक सामना पाहणे हा थरार असतो. आमच्यावरही दबाव येतो. भारताला चॅम्पियन बनायचे झाल्यास पाकला पराभूत करावे लागेल. फिल्डिंगमध्ये आलेल्या मर्यादा आणि पॉवरप्लेबाबतचे नवे नियम यामुळे भारतीय उपखंडातील सेमीफायनल गाठणे कठीण होईल. १९९२ आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्या वेळी क्षेत्ररक्षणावर मर्यादा नव्हत्या. आता ३० यार्डमध्ये पाच खेळाडू अनिवार्य असतात आणि पॉवरप्लेदेखील असतो. भारताने अंतिम चार संघांत स्थान मिळवावे, अशी इच्छा व्यक्त करीत चारमध्ये भारत येईलच, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे राजूचे मत आहे. आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे दोन बलाढ्य संघ असल्याचे तो म्हणाला. न्यूझीलंड, भारत आणि लंका हे अखेरच्या सहा संघांत स्थान मिळवू शकतात, पण भारतीय उपखंडात मेहनत घ्यावी लागेल. भारतीय गोलंदाज आॅस्ट्रेलियात निष्प्रभावी ठरत आहेत. गोलंदाजीतील ही उणीव दूर करण्यासाठी फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. जडेजा व अक्षर पटेल नवे असल्याने फलंदाजीवर अधिक विसंबून राहावे लागणार आहे. अश्विनकडून काही अपेक्षा असतील, पण पॉवरप्लेमध्ये ईशांतने धावा रोखायला हव्या, असे मत राजूने व्यक्त केले.(वृत्तसंस्था)