शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
2
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
3
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
4
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
5
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
6
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
7
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
8
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
9
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
10
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
11
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
12
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
13
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
14
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
15
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
16
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
17
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
18
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
19
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
20
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)

रहाणेला वगळण्याचा प्रश्नच नाही : अनिल कुंबळे

By admin | Updated: March 3, 2017 00:15 IST

अजिंक्य रहाणेच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर वरचढ ठरण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

बंगळुरू : करुण नायरची एक त्रिशतकी खेळी अजिंक्य रहाणेच्या दोन वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर वरचढ ठरण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मधल्या फळीतील या अनुभवी फलंदाजाला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्यात येणार नसल्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी स्पष्ट केले. रहाणेला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. अखेर त्याचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला केवळ १३ व १८ धावा फटकावता आल्या. भारताला या लढतीत ३३३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रहाणेने गेल्या ५ सामन्यांत २०४ धावा फटकावल्या आहेत.शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कुंबळे म्हणाला, ‘‘रहाणेला वगळण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. गेल्या दोन वर्षांत तो कमालीचा यशस्वी ठरला आहे. संघाच्या संयोजनाचा विचार करता, त्याबाबत आम्ही अद्याप चर्चा केलेली नाही. सर्व १६ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत. दुर्दैवाने नायरला बाहेर बसावे लागत आहे. नायरने त्रिशतकी खेळी केल्यानंतर त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैव आहे. पण, आमच्या संघाचे संयोजन त्याच प्रकारचे आहे. आम्ही नेहमी ५ गोलंदाजांसह खेळण्यास उत्सुक असतो. दुर्दैवाने नायर दुखापतग्रस्त खेळाडूच्या स्थानी संघात आला होता. संघांत आमच्याकडे अनेक पर्याय आहेत, ही चांगली बाब आहे. करुण चांगला खेळाडू असून त्याने मिळालेल्या संधीचे सोने करून प्रतिभा सिद्ध केली आहे.’’आगामी कसोटी सामन्यात भारत ५ गोलंदाजांसह खेळेल का, याबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘संघाचे संयोजन योग्य राहील, याची खबरदारी घेण्यात येईल. विजय मिळविण्यासाठी कुठले संयोजन योग्य आहे, याबाबत विचार करण्यात येईल. चार गोलंदाज पुरेसे आहेत की पाच गोलंदाजांची गरज आहे? कुठल्या चार गोलंदाजांना संधी द्यायची? हे सर्व रणनीतीवर अवलंबून आहे. विजय मिळविणे आमचे लक्ष्य आहे.’’चिन्नास्वामी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास येथील खेळपट्टीबाबत अधिक माहिती नाही. मी येथे खेळून लहानाचा मोठा झालो; पण येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असते. येथील खेळपट्टी निकाल देणारी राहील, अशी आशा आहे. कसोटी सामन्यासाठी यापेक्षा वेगळे काय अपेक्षित आहे.’’ (वृत्तसंस्था) कुंबळे यांनी पुढे सांगितले, की ज्या वेळी खेळत होतो, त्या वेळी खेळपट्टी व परिस्थिती यांबाबत कधी विचार केला नाही. त्या वेळी माझी गोलंदाजी व खेळपट्टी याबाबत बरेच लिहिले जात होते; पण एक गोलंदाज, कर्णधार व प्रशिक्षक म्हणून मी खेळपट्टीबाबत कधीच विचार करीत नाही. खेळपट्टी बघण्यासाठी निश्चित जातो; पण रणनीती ठरविण्यासाठी.’’भारताने डीआरएसचा योग्य वापर केला नाही, याबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘आम्ही याबाबत चर्चा करीत आहोत; पण त्यात आम्ही चूक केल्याचे आम्हाला वाटत नाही. इंग्लंड व बांगलादेशाविरुद्धच्या मालिकांचा विचार केला, तर प्रतिस्पर्धी संघांच्या तुलनेत भारतीय संघाने त्याचा योग्य वापर केला. त्यामुळे याबाबत आत्ताच मत व्यक्त करणे घाईचे ठरेल. आॅस्ट्रेलियाचा संघ चांगला असून आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी केली, असे वाटत नाही. आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्यास उत्सुक असून, लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत.’’>खेळाडूंना ताळमेळ साधण्यात अपयश आलेखेळाडूंना ताळमेळ साधण्यात अपयश आले. मी भूतकाळाचा विचार करीत नाही, भविष्याबाबत विचार करतो. एक प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे. त्या लढतीत आमच्यासाठी काहीच अनुकूल घडले नाही. मालिकेत अद्याप तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. पुण्यातील खेळपट्टी आव्हानात्मक होती. आॅस्ट्रेलियाने चांगला खेळ केला. भारतीय संघाला या खेळपट्टीवर ताळमेळ साधण्यात अपयश आले.