शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया बरोबरच्या वादावर कोणतीही खंत नाही - विराट कोहली

By admin | Updated: March 15, 2017 18:31 IST

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले..

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 15 - भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या  ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले मंकीगेट प्रकरण आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहे. दुस-या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डीआरएसच्या वापरावरुन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर केलेल्या गंभीर आरोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. 
दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणाव वाढला आहे. विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथ बरोबरच्या शाब्दीक लढाईबद्दल अजिबात खंत वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्यापासून रांचीमध्ये सुरु होणा-या तिस-या कसोटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना कोहलीने आपण सर्व लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केल्याचे सांगितले. पण स्मिथवर केलेले आरोप मागे घेण्यास नकार दिला. 
 
मी जे बोललो त्याबद्दल अजिबात खंत वाटत नाही पण त्याचवेळी पुन्हा तशीच कृती करण्याचा मूर्खपणा करु नये असे कोहली म्हणाला. दुस-या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथला पंचांनी बाद ठरवल्यानंतर त्याने डीआरएसचा कौल घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे पाहून  विचारणा केली होती. त्यावर सामना संपल्यानंतर कोहलीने जोरदार टीका केली होती. 
 
दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी भारतीय खेळाडूंच्या आक्रमकतेला लगाम घालणार नसल्याचे म्हटले आहे.  जर खेळाडू मैदानात अपेक्षित असलेली कामगिरी करीत असतील, तर त्यांच्या नैसर्गिक खेळाला रोखण्याचा मी प्रयत्न करणार नाही. आपल्याला आक्रमकतेवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची स्वत:ची एक शैली असते असे कुंबळे म्हणाले. 
 
दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएस पर्याय वापरण्यावरून मोठा गोंधळ उडाला होता. ऑसी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय यांनी संयुक्तपणे या प्रकरणावर पडदा टाकला, याविषयी कुंबळे म्हणाले, ‘‘क्रिकेट या महान खेळाचा संरक्षक म्हणून आमची सर्वांची ही जबाबदारी आहे, की अशा प्रकारची प्रकरणे योग्यरीतीने हाताळणे. या खेळाचे मुख्य हितधारक खेळाडू असून त्यांना आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असावी.’’