शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

ऑस्ट्रेलिया बरोबरच्या वादावर कोणतीही खंत नाही - विराट कोहली

By admin | Updated: March 15, 2017 18:31 IST

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले..

 ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 15 - भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दीक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. 2008 सालच्या  ऑस्ट्रेलिया दौ-यात हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंडसमध्ये घडलेले मंकीगेट प्रकरण आजही अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहे. दुस-या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने डीआरएसच्या वापरावरुन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथवर केलेल्या गंभीर आरोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. 
दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणाव वाढला आहे. विराट कोहलीने स्टीव्ह स्मिथ बरोबरच्या शाब्दीक लढाईबद्दल अजिबात खंत वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्यापासून रांचीमध्ये सुरु होणा-या तिस-या कसोटीपूर्वी पत्रकारांशी बोलताना कोहलीने आपण सर्व लक्ष क्रिकेटवर केंद्रीत केल्याचे सांगितले. पण स्मिथवर केलेले आरोप मागे घेण्यास नकार दिला. 
 
मी जे बोललो त्याबद्दल अजिबात खंत वाटत नाही पण त्याचवेळी पुन्हा तशीच कृती करण्याचा मूर्खपणा करु नये असे कोहली म्हणाला. दुस-या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथला पंचांनी बाद ठरवल्यानंतर त्याने डीआरएसचा कौल घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे पाहून  विचारणा केली होती. त्यावर सामना संपल्यानंतर कोहलीने जोरदार टीका केली होती. 
 
दरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी भारतीय खेळाडूंच्या आक्रमकतेला लगाम घालणार नसल्याचे म्हटले आहे.  जर खेळाडू मैदानात अपेक्षित असलेली कामगिरी करीत असतील, तर त्यांच्या नैसर्गिक खेळाला रोखण्याचा मी प्रयत्न करणार नाही. आपल्याला आक्रमकतेवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची स्वत:ची एक शैली असते असे कुंबळे म्हणाले. 
 
दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएस पर्याय वापरण्यावरून मोठा गोंधळ उडाला होता. ऑसी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि बीसीसीआय यांनी संयुक्तपणे या प्रकरणावर पडदा टाकला, याविषयी कुंबळे म्हणाले, ‘‘क्रिकेट या महान खेळाचा संरक्षक म्हणून आमची सर्वांची ही जबाबदारी आहे, की अशा प्रकारची प्रकरणे योग्यरीतीने हाताळणे. या खेळाचे मुख्य हितधारक खेळाडू असून त्यांना आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असावी.’’