शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासाठी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियात फरक नाही - विराट कोहली

By admin | Updated: February 22, 2017 13:43 IST

कसोटी मालिकेआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला संघ ऑस्ट्रेलियाकडे कोणताही विशेष संघ म्हणून पाहत नसल्याचं म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - गुरुवारपासून सुरु होणा-या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपला संघ ऑस्ट्रेलियाकडे कोणताही विशेष संघ म्हणून पाहत नसल्याचं म्हटलं आहे. 'ज्याप्रकारे आपण दुस-या संघाविरोधातील सामन्यांच्या आधी तयारी करतो, त्याचप्रमाणे आम्ही या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहोत. आम्ही नेहमी विरोधी संघाच्या भक्कम आणि कमकुवत बाजूंवर चर्चा करुन त्याप्रमाणे प्लान आखतो. यावेळीदेखील आम्ही असंच करत असून यामध्ये काही नवीन नाही', असं विराट कोहली बोलला आहे. 
 
गुरुवारी सुरु होणा-या कसोटी मालिकेआधी आज आयोजित पत्रकार परिषदेत विराट कोहलीने सांगितलं की, 'आपल्यासाठी प्रत्येक सामना एक आव्हान असून, प्रत्येक मालिका आव्हानात्मक असते. ऑस्ट्रेलियासंबंधी आम्ही काही विशेष चिंता नाही करत आहोत. आम्ही विरोधी संघाचा आदर करतो, पण आम्ही आमच्या खेळण्याच्या क्षमतेवर आणि खेळावर लक्ष केंद्रित करतो. आमचं लक्ष ऑस्टेलिया संघावर नाही ही आमची सर्वात मोठी ताकद आहे. ज्याप्रमाणे दुस-या संघांविरोधात खेळण्याआधी आम्ही तयारी करतो तशीच तयारी आत्ता करत आहोत'.
 
आपल्या खेळावर आणि कर्णधारपदाशी संबंधित प्रश्नांवर बोलताना विराटने सांगितलं की, 'मी प्रत्येक मालिकेनंतर स्वत:ला पारखत बसत नाही. देशासाठी खेळणं आणि जिंकणं माझी प्राथमिकत आहे. मी दरवेळी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये प्रशिक्षक अनिल कुंबळे महत्वाची भूमिका निभावतात. कर्णधाराचा प्रश्न येतो तेव्हा ती संघावर अवलंबून असते. संघाच्या कामगिरीवर कर्णधाराची यशस्वी कारकिर्द ठरते'.
 
प्रसारमाध्यमांशी संबंधित प्रश्नावर बोलताना विराटने ,'माझं लक्ष फक्त खेळावर आहे. लोक लिहितात आणि बोलतात, लोक स्तुतीही करतात आणि नंतर टीकाही करतात. यावर माझं नियंत्रण असू शकत नाही', असं म्हटलं आहे. 'मी जेव्हा 22 वर्षांचा होतो तेव्हा मी 35 वर्षांच्या खेळाडूप्रमाणे खेळावं अशी लोकांची अपेक्षा होती. पण आता माझा माझ्या खेळावर विश्वास आहे', असं विराट बोलला आहे.