शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

नागपूरच्या खेळपट्टीत दोष नाही

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

भारत-द. आफ्रिका यांच्यात नुकत्याच आटोपलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी नागपुरात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियमवर आयोजिण्यात आली.

मुंबई : भारत-द. आफ्रिका यांच्यात नुकत्याच आटोपलेल्या चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी नागपुरात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियमवर आयोजिण्यात आली. या सामन्यातील खेळपट्टी खराब असल्याचा अहवाल मॅच रेफ्रीने आयसीसीला पाठविला असून बीसीसीआयला उत्तर देण्यास सांगण्यात आले. बीसीसीआयला मात्र या खेळपट्टीत कुठलीही खोट आढळलेली नाही.खेळपट्टीच्या गुणवत्तेवर जे आरोप लावण्यात आले त्याचा सामना करण्यास आम्ही सज्ज असल्याचे बीसीसीआयने आयसीसीला कळविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मीडियात आलेल्या वृत्तानुसार आयसीसी मॅच रेफ्री जेफ क्रो यांनी दिलेल्या अहवालाशी बीसीसीआय सहमत नाही. खेळपट्टीवरून निर्माण झालेल्या वादळानंतर आयसीसीला उत्तर देण्याची बोर्डाने तयारीदेखील केली आहे. २९ नोव्हेंबरपासून येथे झालेला हा सामना भारताने तीन दिवसांत संपविला होता. या खेळपट्टीवर तिन्ही दिवस फलंदाजांना अक्षरश: नाचावे लागल्याने जगभरातून टीका झाली होती. आयसीसीने १ डिसेंबर रोजी जामठाच्या खेळपट्टीचा अहवाल पाठविण्यासाठी नोटीस बजावली होती. नागपूर खेळपट्टीची गुणवत्ता उच्च दर्जाची असून आपल्याला त्यात कुठलाही दोष अथवा उणीव आढळत नाही. आयसीसीला जे उत्तर अपेक्षित आहे ते देण्याची आमची तयारी असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. बोर्डाला १५ डिसेंबरपर्यंत आयसीसीकडे अहवाल पाठवायचा आहे. भारताने द. आफ्रिकेला मालिकेत ३-० ने पराभूत केले. मोहाली आणि नागपूर कसोटी भारताने तीन दिवसांत जिंकली हे विशेष.(वृत्तसंस्था)नागपूर खेळपट्टीत कुठलाही दोष नव्हता. या खेळपट्टीवर अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने चेंडू वळतो हा आरोपही खोटा आहे. चेंडू वळण्याची प्रक्रिया ही गोलंदाजांच्या क्षमतेवर अवलंबून असते. गोलंदाज विकेटवर चेंडू किती टर्न करू शकतो, हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा भाग आहे.- बीसीसीआयहा सामना भारतीय संघाने तीन दिवसांत १२४ धावांनी जिंकला होता. पहिल्या डावात भारताच्या ७८.२ षटकांत सर्वबाद २१५ धावा झाल्या होत्या. मुरली विजयने ४० धावा केल्या होत्या. द. आफ्रिका संघाकडून मॉर्केलने ३ व हर्मेरने ४ विकेट घेतल्या होत्या.द. आफ्रिकेचा डाव ३३.१ षटकांत १२७ मिनिटांत ७९ धावांत संपुष्टात आला होता. त्यांचे ८ खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. जेपी ड्युमिनीने ३५ धावा केल्या होत्या. भारताकडून आर. आश्विनने ५, तर रवींद्र जडेजाने ४ विकेट घेतल्या होत्या.भारताचा दुसरा ४६.३ षटकांत १७३ धावांत संपुष्टात आला होता. यावेळी शिखर धवने ३९ धावा केल्या होत्या. मॉर्केलने ३, तर ताहिरने ५ विकेट घेतल्या होत्या.तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा डाव ८९.५ षटकांत १८५ धावांत संपुष्टात आला होता. भारताकडून आर. आश्विनने ७, तर अमित मिश्राने ३ विकेट घेतल्या होत्या.