कानपूर : रणजी संघात चांगली कामगिरी केल्यानंतर भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्याची आशा व्यक्त करताना उत्तर प्रदेश रणजी संघाचा कर्णधार सुरेश रैना याने चांगली कामगिरी केली तर निश्चितच कसोटी संघात आपली दावेदारी बनेल, असे सांगितले.बीसीसीआयच्या एक कोटी रुपयांच्या करारातून बाहेर पडण्याविषयी त्याने जो खेळाडू कसोटी, वन डे आणि टी-२० मध्ये खेळतो अशालाच हा करार मिळतो. तथापि, आपल्यासाठी पैसा नव्हे, तर खेळ महत्त्वाचा आहे. एक कोटी क्लबमधून बाहेर झालो असलो तरी कामगिरीच्या बळावर पुन्हा त्यात स्थान मिळवू. तथापि, आपले लक्ष सध्या रणजी सामन्यात उत्तर प्रदेश संघाला विजयी करण्याकडे असल्याचे रैनाने सांगितले.रैना म्हणाला, ‘‘संघात खूप युवा खेळाडू आहेत आणि चांगले क्रिकेट खेळत आहेत आणि चांगल्या कामगिरीच्या बळावर त्यांना राष्ट्रीय संघात येण्याची संधी मिळेल. त्यासाठी ते आपली सर्वोत्तम कामगिरी करतील. (वृत्तसंस्था)
तर... कसोटी संघातही पुनरागमन करीन : रैना
By admin | Updated: November 14, 2015 22:56 IST