शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

...तर माझ्या घरावर दगड पडतील - आर.अश्विन

By admin | Updated: April 8, 2017 13:15 IST

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 8 - फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ बनणारा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे. आपल्या देशात कुठल्याही विषयावर मुक्तपणे बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही, त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने म्हटले आहे. 
 
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अश्विनने विविध विषयांवर भाष्य केले. मी मोकळेपणाने, स्पष्टपणे बोलतो पण त्यामुळे कधीतरी अडचणीत येईन अशी भिती वाटते. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने सांगितले. ज्या क्षणाला मी काही राजकीय भाष्य करेन त्यावेळी माझ्या घरावर दगड फेकले जातील. 
 
मला आणि माझ्या कुटुंबाला जमावाची भिती वाटते. मी आतापर्यंत चेन्नईत शांततेत, समाधानात राहिलो आहे आणि यापुढेही तसेच रहायचे आहे. ज्या देशाने मला सर्व काही दिले. ज्या देशावर माझे प्रेम आहे तो देश सोडून मला पळून जायचे नाही असे अश्विनने सांगितले.  काही विषयांवर मी भूमिका घेतो म्हणून अनेक लोकांना मी आवडत नाही. 
 
माझा चांगला उद्देश असतो पण काही लोक त्याचे राजकारण करतात. मी कमेंट करु नये असे आतापर्यंत हजारो लोकांनी मला सांगितले आहे. दुस-याने गप्प रहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि असेच जगणे आपल्या आयुष्यात भाग बनले आहे. हे असेच सुरु राहिले तर आपण देश म्हणून पुढे जाणार आहोत का ?, मी दुस-यांना असच करा हे सांगू शकत नाही पण माझ्या मनाला जे पटते, योग्य वाटते ते मी करतो असे अश्विनने सांगितले. 
 
अश्विननने सोशल मीडियाच्या माध्यमातून जलिकट्टू पासून ते तामिळनाडूतल्या राजकारणावर आपली भूमिका मांडली आहे. माझ्या राज्यात भरपूर काही घडत आहे त्यावर कोणीतरी भूमिका घेतली पाहिजे . माझे राज्य दुस-यांसाठी हसण्याचा विषय बनू नये असे अश्विनने सांगितले. लहानपणीची वर्तमानपत्र वाचण्याची आठवणही अश्विनने यावेळी सांगितली. असत्य, सनसनाटी वगळून नेमकी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी प्रिंट मीडियावर असल्याचे अश्विनने सांगितले.