शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...तर माझ्या घरावर दगड पडतील - आर.अश्विन

By admin | Updated: April 8, 2017 13:15 IST

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 8 - फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ बनणारा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे. आपल्या देशात कुठल्याही विषयावर मुक्तपणे बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही, त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने म्हटले आहे. 
 
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अश्विनने विविध विषयांवर भाष्य केले. मी मोकळेपणाने, स्पष्टपणे बोलतो पण त्यामुळे कधीतरी अडचणीत येईन अशी भिती वाटते. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने सांगितले. ज्या क्षणाला मी काही राजकीय भाष्य करेन त्यावेळी माझ्या घरावर दगड फेकले जातील. 
 
मला आणि माझ्या कुटुंबाला जमावाची भिती वाटते. मी आतापर्यंत चेन्नईत शांततेत, समाधानात राहिलो आहे आणि यापुढेही तसेच रहायचे आहे. ज्या देशाने मला सर्व काही दिले. ज्या देशावर माझे प्रेम आहे तो देश सोडून मला पळून जायचे नाही असे अश्विनने सांगितले.  काही विषयांवर मी भूमिका घेतो म्हणून अनेक लोकांना मी आवडत नाही. 
 
माझा चांगला उद्देश असतो पण काही लोक त्याचे राजकारण करतात. मी कमेंट करु नये असे आतापर्यंत हजारो लोकांनी मला सांगितले आहे. दुस-याने गप्प रहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि असेच जगणे आपल्या आयुष्यात भाग बनले आहे. हे असेच सुरु राहिले तर आपण देश म्हणून पुढे जाणार आहोत का ?, मी दुस-यांना असच करा हे सांगू शकत नाही पण माझ्या मनाला जे पटते, योग्य वाटते ते मी करतो असे अश्विनने सांगितले. 
 
अश्विननने सोशल मीडियाच्या माध्यमातून जलिकट्टू पासून ते तामिळनाडूतल्या राजकारणावर आपली भूमिका मांडली आहे. माझ्या राज्यात भरपूर काही घडत आहे त्यावर कोणीतरी भूमिका घेतली पाहिजे . माझे राज्य दुस-यांसाठी हसण्याचा विषय बनू नये असे अश्विनने सांगितले. लहानपणीची वर्तमानपत्र वाचण्याची आठवणही अश्विनने यावेळी सांगितली. असत्य, सनसनाटी वगळून नेमकी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी प्रिंट मीडियावर असल्याचे अश्विनने सांगितले.