शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

...तर माझ्या घरावर दगड पडतील - आर.अश्विन

By admin | Updated: April 8, 2017 13:15 IST

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

चेन्नई, दि. 8 - फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघाचा कर्दनकाळ बनणारा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज रविचंद्रन अश्विनने क्रिकेट, राजकारणापासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर भाष्य केले आहे. आपल्या देशात कुठल्याही विषयावर मुक्तपणे बोलण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळत नाही, त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने म्हटले आहे. 
 
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अश्विनने विविध विषयांवर भाष्य केले. मी मोकळेपणाने, स्पष्टपणे बोलतो पण त्यामुळे कधीतरी अडचणीत येईन अशी भिती वाटते. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. त्यावर मर्यादा आहेत असे अश्विनने सांगितले. ज्या क्षणाला मी काही राजकीय भाष्य करेन त्यावेळी माझ्या घरावर दगड फेकले जातील. 
 
मला आणि माझ्या कुटुंबाला जमावाची भिती वाटते. मी आतापर्यंत चेन्नईत शांततेत, समाधानात राहिलो आहे आणि यापुढेही तसेच रहायचे आहे. ज्या देशाने मला सर्व काही दिले. ज्या देशावर माझे प्रेम आहे तो देश सोडून मला पळून जायचे नाही असे अश्विनने सांगितले.  काही विषयांवर मी भूमिका घेतो म्हणून अनेक लोकांना मी आवडत नाही. 
 
माझा चांगला उद्देश असतो पण काही लोक त्याचे राजकारण करतात. मी कमेंट करु नये असे आतापर्यंत हजारो लोकांनी मला सांगितले आहे. दुस-याने गप्प रहावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि असेच जगणे आपल्या आयुष्यात भाग बनले आहे. हे असेच सुरु राहिले तर आपण देश म्हणून पुढे जाणार आहोत का ?, मी दुस-यांना असच करा हे सांगू शकत नाही पण माझ्या मनाला जे पटते, योग्य वाटते ते मी करतो असे अश्विनने सांगितले. 
 
अश्विननने सोशल मीडियाच्या माध्यमातून जलिकट्टू पासून ते तामिळनाडूतल्या राजकारणावर आपली भूमिका मांडली आहे. माझ्या राज्यात भरपूर काही घडत आहे त्यावर कोणीतरी भूमिका घेतली पाहिजे . माझे राज्य दुस-यांसाठी हसण्याचा विषय बनू नये असे अश्विनने सांगितले. लहानपणीची वर्तमानपत्र वाचण्याची आठवणही अश्विनने यावेळी सांगितली. असत्य, सनसनाटी वगळून नेमकी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याची जबाबदारी प्रिंट मीडियावर असल्याचे अश्विनने सांगितले.