शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केरळमधील कोल्लम येथे जगातील सर्वात मोठी जलक्रीडा स्पर्धा

By विशाल सोनटक्के | Updated: November 25, 2022 21:10 IST

उद्या अंतिम सामना, आयपीएलच्या धर्तीवर रंगतेय सीबीएल 

त्रिवेंद्रम (केरळ) : भारतातील पहिली बोट रेस आणि जगातील सर्वात मोठी जल क्रीडा स्पर्धा अशी ओळख असलेल्या केरळ चॅम्पीयन बोट लिग स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी केरळमधील कोल्लम येथील प्रसिद्ध प्रेसिडेन्ट ट्राॅफी बोट रेसवर रंगणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण केरळमध्ये मोठी उत्सुकता असून बोट रेसच्या देश-विदेशातील चाहत्यांनीही कोल्लम येथे गर्दी केली आहे. 

पावसाळ्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दरवर्षी केरळचा शांत बॅक वाॅटर बदललेला असतो, कारण येथे ही स्पर्धा इंडियन प्रिमिअर लिगच्या धर्तीवर रंगलेली असते. यंदा या स्पर्धेसाठी अभूतपूर्व उत्साह आहे. कारण कोविडमुळे दोन वर्षाच्या कालावधीनंतर ही स्पर्धा रंगते आहे. या स्पर्धेच्या १२ पैकी ११ विकेन्ड शर्यती संपल्या असून अंतिम सामना उद्या शनिवारी नेहरु बोट रेस येथे सुरू होत आहे. एकूण सात कोटींचे बक्षीस असलेल्या या स्पर्धेमध्ये ट्राॅपिक टायटल ८८ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर मायटी बाेर्स दुसऱ्या, रॅंगिग रोवर्स तिसऱ्या स्थानावरुन असून विविध भागातील नऊ संघ ही  २०२२ बोट लिग जिंकण्यासाठी झुंज देणार आहेत. 

स्पर्धेचा ट्रॅक साधारण एक किलोमीटर लांबीचा असून ही बोट स्पर्धा केरळच्या शेती संस्कृतीचा अभिवाज्य भाग समजला जाते. या स्पर्धेमुळे केरळच्या पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात चालना मिळाली असून नागरिकांत स्पर्धेमुळे सामाजिक एकोप्याची भावना निर्माण झाली आहे. या सीबीएल स्पर्धेमुळे एखाद्या पारंपारिक सणासारखे वातावरण बॅक वाॅटरच्या काठावर निर्माण झाले असून रोव्हींगचे कौशल्य आणि अचूक समन्वय याची अनुभूती घेण्यासाठी केरळकर नागरिक सज्ज झाले आहेत. 

नऊ चॅम्पीयन स्नेक बाेटींगकडे लक्ष चॅम्पीयन बोट लिग २०२२ या स्पर्धेला ४ सप्टेंबरला प्रारंभ झाला असून उद्या शनिवारी अंतिम सामना होत आहे. साधारण २८०० रोअर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते. साधारणपणे एका बोटीमध्ये ९५ रोअर्स असतात. तर ७ ते १० स्टॅन्डी असतात. स्पर्धेचा एक किमीचा ट्रॅक कोणती बोट सर्वात कमी वेळेत पूर्ण करते, यावर विजेता ठरतो.