शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
4
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
5
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
6
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
7
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
8
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
9
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
10
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
11
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
12
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
13
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
14
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
15
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
16
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
17
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
18
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
19
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
20
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरमध्ये २८ वर्षांनंतर होणार कसोटी सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2016 05:52 IST

भारत आणि न्यूझीलंड ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान आपल्या जमान्यातील सुरेख फलंदाज सय्यद मुश्ताक अली यांच्या जन्मभूमीत प्रथमच आयोजित होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळण्यास उतरतील

इंदूर : भारत आणि न्यूझीलंड ८ ते १२ आॅक्टोबरदरम्यान आपल्या जमान्यातील सुरेख फलंदाज सय्यद मुश्ताक अली यांच्या जन्मभूमीत प्रथमच आयोजित होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळण्यास उतरतील, तेव्हा मध्य प्रदेशच्या या शहरात दोन्ही संघांदरम्यान २८ वर्षांच्या कालखंडानंतर ही दुसरी लढत असेल. तथापि, या वेळेस खेळाचे स्वरूप बदलले असेल आणि स्टेडियमदेखील वेगळे असेल.याआधी १५ डिसेंबर १९८८ मध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ एकदिवसीय सामन्यात इंदूर येथे नेहरू स्टेडियमवर आमने-सामने उभे ठाकले होते. त्या वेळेस दिलीप वेंगसरकरच्या नेतृत्वाखालील यजमान संघाने जॉन राइटच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघावर ५३ धावांनी मात केली होती. कृष्णमाचारी श्रीकांतने या सामन्यात गोलंदाजीत विशेष चमक दाखवताना ३२ धावांत ५ गडी बाद केले होते आणि तेव्हा तो भारताचा दोन वनडे सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा जास्ती बळी घेणारा गोलंदाज बनला होता.नेहरू स्टेडियमची स्थिती खराब झाल्यानंतर येथे २00१ नंतर आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन होणे बंद झाले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सामने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या (एमपीसीए) होळकर स्टेडियममध्ये होत होते.जवळपास २७ हजार प्रेक्षकांची क्षमता असणारे होळकर स्टेडियम भारतासाठी खूपच लकी ठरले आहे. गेल्या एक दशकात या स्टेडियमवर भारताने चार एकदिवसीय सामने खेळले आणि हे सर्व सामने जिंकले आहेत. या स्टेडियमवर याआधी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना १४ आॅक्टोबर २0१५ ला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला होता. या लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला २२ धावांनी पराभूत केले होते. याच मैदानावर वीरेंद्र सेहवागने ८ डिसेंबर २0११ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे सामन्यात २१९ धावांची खेळी करून सचिन तेंडुलकरचा वनडेतील एक डावात सर्वाधिक धावांचा त्या वेळेसचा विक्रम मोडला होता. भारत-न्यूझीलंड सामन्याचे आयोजन येथे होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर संघटनेने आधीच या लढतीची तयारी सुरू केली होती; परंतु सामन्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता तयारीचा वेग वाढविण्यात आला आहे. आम्हाला होळकर स्टेडियममध्ये भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यासाठी आता छोटे बदल करायचे आहेत आणि पाचदिवसीय लढत लक्षात घेऊन प्रेक्षकांसाठी काही सुविधा वाढवायच्या आहेत.- मिलिंद कनमडीकर, सचिव एमपीसीए