शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांतील सायबर गुन्ह्यांमध्ये ३०० टक्के वाढ; ३६ हजार ग्राहकांना ३०,००० कोटींचा आर्थिक फटका
2
सर्वसामान्यांची लाल परी झाली ७६ वर्षांची! वर्धापन दिनानिमित्त एसटी स्थानके रांगोळीने सजणार
3
२० मेडिकल कॉलेजांना आयोगाने ठोठावला दंड; त्रुटी दूर करण्यासाठी दिला २ महिन्यांचा अवधी
4
प्रसारमाध्यमांकडे तक्रार केल्याने विद्यार्थ्यांवर कारवाई; विद्यापीठाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका
5
कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका
6
मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र सहाचा निकाल ४९ टक्के; यंदा ४८०६ विद्यार्थी झाले अनुत्तीर्ण
7
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
8
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
9
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
10
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
11
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
12
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
13
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
14
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
15
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
16
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
17
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
18
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
19
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
20
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा

२०१४च्या इंग्लंड दौऱ्यानंतर तंत्रात सुधारणा : कोहली

By admin | Published: January 17, 2017 7:41 AM

इंग्लंडमध्ये यश मिळविण्याचा निर्धार यामुळे २०१४ चा इंग्लंड दौरा माझ्यासाठी निराशाजनक ठरला

नवी दिल्ली : तंत्रातील उणिवा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्लंडमध्ये यश मिळविण्याचा निर्धार यामुळे २०१४ चा इंग्लंड दौरा माझ्यासाठी निराशाजनक ठरला, अशी कबुली भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. त्यानंतर मी केवळ मानसिकतेतच बदल केला नाही, तर फलंदाजीमध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले.इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनसोबत बीसीसीआय डॉट टीव्हीवर चर्चा करताना कोहलीने तंत्राबाबत चर्चा केली. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये विराट एक अर्धशतक झळकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने चार शतके झळकावली. यावेळी कोहली म्हणाला, ‘२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात मला अधिक दडपण जाणवत होते. मी तेथे कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा फटकावण्यास उत्सुक होतो. काही विशेष देशांमध्ये धावा फटकावल्या तरच तुम्हाला चांगला खेळाडू मानण्यात येईल, असे निकष उपखंडातील खेळाडूंबाबत लावण्यात येतात. मी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक होतो. चांगली सुरुवात झाली नाही, तर त्याचे दडपण येते.’याबाबत सविस्तरपणे बोलताना कोहली म्हणाला, ‘तंत्र महत्त्वाचे आहे; पण ज्यांचे तंत्र चांगले नसते, ते खेळाडूही सकारात्मक मानसिकतेच्या आधारावर तेथे धावा फटकावण्यात यशस्वी ठरतात. मला कुठली अडचण नव्हती. मी इनस्विंग गोलंदाजीची आशा बाळगत होतो. त्यामुळे मी स्वत:चा ‘स्टान्स’ बदलला होता. मी सतत इनस्विंगचा विचार करीत असल्यामुळे आऊटस्विंग खेळण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यानंतर मी माझ्या तंत्रात बदल केला.’ (वृत्तसंस्था)>‘जीवनात जास्त लोक असल्याने लक्ष विचलित’भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या अफाट यशाचे रहस्य त्याच्या जीवनात ‘जास्त जवळचे लोक नसणे’ हे सांगितले. जास्त लोक असल्याने अडथळा निर्माण होतो असे त्याचे म्हणणे आहे.कोहली म्हणाला, ‘‘मी नशीबावान आहे. कारण माझ्या जीवनात असे लोक नाहीत, की ज्यांच्या मी जास्त जवळ आहे. मला त्यामुळे मदत मिळते. जर तुमच्या जीवनात जास्त लोक असल्यास तुम्ही खूप मित्रांशी चर्चा करतात आणि तुमचे लक्ष विचलित होते आणि तुमच्या वेळेचे नियोजनही बिघडते.’’