शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

२०१४च्या इंग्लंड दौऱ्यानंतर तंत्रात सुधारणा : कोहली

By admin | Updated: January 17, 2017 07:41 IST

इंग्लंडमध्ये यश मिळविण्याचा निर्धार यामुळे २०१४ चा इंग्लंड दौरा माझ्यासाठी निराशाजनक ठरला

नवी दिल्ली : तंत्रातील उणिवा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये इंग्लंडमध्ये यश मिळविण्याचा निर्धार यामुळे २०१४ चा इंग्लंड दौरा माझ्यासाठी निराशाजनक ठरला, अशी कबुली भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली. त्यानंतर मी केवळ मानसिकतेतच बदल केला नाही, तर फलंदाजीमध्येही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने सांगितले.इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनसोबत बीसीसीआय डॉट टीव्हीवर चर्चा करताना कोहलीने तंत्राबाबत चर्चा केली. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये विराट एक अर्धशतक झळकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने चार शतके झळकावली. यावेळी कोहली म्हणाला, ‘२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात मला अधिक दडपण जाणवत होते. मी तेथे कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा फटकावण्यास उत्सुक होतो. काही विशेष देशांमध्ये धावा फटकावल्या तरच तुम्हाला चांगला खेळाडू मानण्यात येईल, असे निकष उपखंडातील खेळाडूंबाबत लावण्यात येतात. मी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करण्यास उत्सुक होतो. चांगली सुरुवात झाली नाही, तर त्याचे दडपण येते.’याबाबत सविस्तरपणे बोलताना कोहली म्हणाला, ‘तंत्र महत्त्वाचे आहे; पण ज्यांचे तंत्र चांगले नसते, ते खेळाडूही सकारात्मक मानसिकतेच्या आधारावर तेथे धावा फटकावण्यात यशस्वी ठरतात. मला कुठली अडचण नव्हती. मी इनस्विंग गोलंदाजीची आशा बाळगत होतो. त्यामुळे मी स्वत:चा ‘स्टान्स’ बदलला होता. मी सतत इनस्विंगचा विचार करीत असल्यामुळे आऊटस्विंग खेळण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यानंतर मी माझ्या तंत्रात बदल केला.’ (वृत्तसंस्था)>‘जीवनात जास्त लोक असल्याने लक्ष विचलित’भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याच्या अफाट यशाचे रहस्य त्याच्या जीवनात ‘जास्त जवळचे लोक नसणे’ हे सांगितले. जास्त लोक असल्याने अडथळा निर्माण होतो असे त्याचे म्हणणे आहे.कोहली म्हणाला, ‘‘मी नशीबावान आहे. कारण माझ्या जीवनात असे लोक नाहीत, की ज्यांच्या मी जास्त जवळ आहे. मला त्यामुळे मदत मिळते. जर तुमच्या जीवनात जास्त लोक असल्यास तुम्ही खूप मित्रांशी चर्चा करतात आणि तुमचे लक्ष विचलित होते आणि तुमच्या वेळेचे नियोजनही बिघडते.’’