शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

तिरंदाजांना मीडियापासून दूर राहण्याचे संघाचे फर्मान

By admin | Updated: October 8, 2015 04:21 IST

येत्या वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या रियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या चांगल्या प्रदर्शनाचे भारतीय तिरंदाज संघावरील दडपण इतके जास्त वाढले, की त्यांनी तिरंदाजांना प्रसारमाध्यमांपासून

- वैशाली मलेवार,  नवी दिल्लीयेत्या वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या रियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या चांगल्या प्रदर्शनाचे भारतीय तिरंदाज संघावरील दडपण इतके जास्त वाढले, की त्यांनी तिरंदाजांना प्रसारमाध्यमांपासून लांब राहण्याचे तुघलकी फर्मान सुनावले आहे. यामुळे या स्पर्धेची तयारी कशा प्रकारे सुरू आहे, याची सगळी माहिती चार भितींच्या आतच आहे. याची कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू दिली जाणार नसल्याची माहिती महासंघाचे सचिव अनिल कामिनेनी यांनी ‘लोकमत’ला दिली. ब्राझीलच्या रियो दि जानिरो शहरात २०१६मध्ये ५ आॅगस्ट ते २५ आॅगस्टपर्यंत ही स्पर्धा होईल. त्यात महिला गटात दीपिकाकुमारी, लक्ष्मीराणी मांझी आणि रीमील बुरुली यांना तिकीट टू रियो मिळालेले आहे. तसेच, पुरुष एकेरी स्पर्धेत मंगलसिंग चम्पाई यांची निवड झाली आहे. आॅलिम्पिककरिता पूर्णिमा महातो महिला तिरंदाजांना प्रशिक्षण देत आहेत. याही वेळी भारतीय तिरंदाजांनी पदक जिंकून आणावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे आणि याच दडपणापोटी संघाने तिरंदाजांना प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्याचा आदेश दिलेला आहे. रियो आॅलिम्पिकआधी बँकॉक आणि मेक्सिको येथे तिरंदाजीची स्पर्धा होईल. त्यात आॅलिम्पिकच्या तयारीचा देखील अंदाज येईल. दीपिका या वेळी विश्व रँकिंगच्या ६व्या क्रमांकावर आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसारमाध्यमांपासून तिरंदाजांना दूर ठेवणे, हा त्यांच्या योजनेचा भाग आहे. यामुळे तिरंदाजांना दडपणापासून वाचविण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी सांगितले, की गेल्या आॅलिम्पिकआधी मीडियाच्या प्रचारामुळे दडपण वाढत गेले. त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर झाला होता. तिरंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तिरंदाजी हा पूर्णपणे एकाग्रतेचा खेळ आहे आणि या वेळी पदक मिळेल, यांची पूर्ण आशा आहे.- अनिल के. कामिनेनी, सचिव, भारतीय तिरंदाज संघ