शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

विश्वचषकासाठी संघनिवड आज

By admin | Updated: January 6, 2015 01:35 IST

भारताने २८ वर्षांनंतर २०११मध्ये विश्वचषकावर नाव कोरले होते आणि हे जेतेपद राखण्यासाठी संघाच्या अंतिम १५ योद्ध्यांची निवड मंगळवारी होणार आहे.

मुंबई : भारताने २८ वर्षांनंतर २०११मध्ये विश्वचषकावर नाव कोरले होते आणि हे जेतेपद राखण्यासाठी संघाच्या अंतिम १५ योद्ध्यांची निवड मंगळवारी होणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. अष्टपैलूच्या शर्यतीत अक्षर पटेल याचा विचार होऊ शकतो. राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवड समितीने विश्वचषकासाठीच्या संभाव्य ३० जणांची निवड याआधीच केली असून, यातील अंतिम १५ खेळाडू मंगळवारी निवडण्यात येणार आहेत. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषकाची चुरस रंगणार आहे. विश्वचषकात खेळणारा संघ निवड समितीने आधीच ठरवला असेल. त्यात एकादा बदल झाल्यास आश्चर्य वाटायला नको. सध्यातरी सर्वांच्या नजरा रवींद्र जडेजा याच्या फिटनेसवर असेल. सलामीसाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जागा निश्चित समजली जात आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कामगिरीत सातत्य राखणाऱ्या मुरली विजय याचा तिसरा सलामीवीर म्हणून विचार होऊ शकतो. मधल्याफळीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि अंबाती रायडूसह धोनी हे तगडे फलंदाज आहेत. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा याची निवड पक्की असून, तो विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या भलत्याच फॉर्मात असलेला युवराज सिंग याचेही नशीब उजळू शकते. फिरकीची मदार आर. अश्विनवर आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्याकडे जलद माऱ्याची धुरा असेल. भुवनेश्वरला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती; परंतु तिरंगी मालिका आणि विश्वचषकापूर्वी तो फिट होईल. (वृत्तसंस्था)