शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकासाठी संघनिवड आज

By admin | Updated: January 6, 2015 01:35 IST

भारताने २८ वर्षांनंतर २०११मध्ये विश्वचषकावर नाव कोरले होते आणि हे जेतेपद राखण्यासाठी संघाच्या अंतिम १५ योद्ध्यांची निवड मंगळवारी होणार आहे.

मुंबई : भारताने २८ वर्षांनंतर २०११मध्ये विश्वचषकावर नाव कोरले होते आणि हे जेतेपद राखण्यासाठी संघाच्या अंतिम १५ योद्ध्यांची निवड मंगळवारी होणार आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. अष्टपैलूच्या शर्यतीत अक्षर पटेल याचा विचार होऊ शकतो. राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवड समितीने विश्वचषकासाठीच्या संभाव्य ३० जणांची निवड याआधीच केली असून, यातील अंतिम १५ खेळाडू मंगळवारी निवडण्यात येणार आहेत. १४ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत विश्वचषकाची चुरस रंगणार आहे. विश्वचषकात खेळणारा संघ निवड समितीने आधीच ठरवला असेल. त्यात एकादा बदल झाल्यास आश्चर्य वाटायला नको. सध्यातरी सर्वांच्या नजरा रवींद्र जडेजा याच्या फिटनेसवर असेल. सलामीसाठी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांची जागा निश्चित समजली जात आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात कामगिरीत सातत्य राखणाऱ्या मुरली विजय याचा तिसरा सलामीवीर म्हणून विचार होऊ शकतो. मधल्याफळीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि अंबाती रायडूसह धोनी हे तगडे फलंदाज आहेत. अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा याची निवड पक्की असून, तो विश्वचषकापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या भलत्याच फॉर्मात असलेला युवराज सिंग याचेही नशीब उजळू शकते. फिरकीची मदार आर. अश्विनवर आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्याकडे जलद माऱ्याची धुरा असेल. भुवनेश्वरला दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती; परंतु तिरंगी मालिका आणि विश्वचषकापूर्वी तो फिट होईल. (वृत्तसंस्था)