शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

टीम इंडियाची कामगिरी विश्वविजेत्याला साजेशी

By admin | Updated: February 23, 2015 23:58 IST

भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन संघाला साजेशी कामगिरी करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकण्यापासून खेळाच्या प्रत्येक

भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन संघाला साजेशी कामगिरी करीत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत नाणेफेक जिंकण्यापासून खेळाच्या प्रत्येक विभागात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. शिखर धवनला सूर गवसला आणि दक्षिण आफ्रिकेसाठी सर्व मार्ग बंद झाले. दक्षिण आफ्रिका संघाला मी दावेदार म्हणून बघत होतो; पण भारताविरुद्धच्या लढतीत त्यांची कामगिरी पाहिल्यानंतर माझ्या मनात शंका निर्माण झाली. त्यांच्याही मनात असाच विचार आला असेल. भारतीय संघाचा विचार करता टीम इंडियाला आॅस्ट्रेलियात जवळजवळ दोन महिने घालविण्याचा लाभ मिळत आहे. भारतीय संघाला येथील परिस्थितीची चांगली माहिती झाली आहे. भारतीय संघाची फलंदाजी सकारात्मक भासत आहे. माझ्या मते अजिंक्य रहाणे परिपूर्ण फलंदाज आहे. मला त्याची फलंदाजी बघताना आनंद मिळतो. ज्या वेळी भारतीय संघ फलंदाजी करीत होता, त्या वेळी एकही कमकुवत बाब निदर्शनास आली नाही. २०१२ नंतर महेंद्रसिंह धोनी ‘स्लॉग ओव्हर्स’साठी उपयुक्त खेळाडू ठरत आहे. माझ्या मते या कालावधीत त्याने दमदार स्ट्राइक रेट राखताना किमान ७७ षटकार ठोकले आहेत. त्यानंतरही त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करताना फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सर्कलमध्ये ठेवण्यात येत आहे. धोनी आखूड टप्प्याच्या चेंडूवर पुल व हुकचे फटके सहज खेळतो; तरी गोलंदाज त्यापासून धडा घेत नाहीत, हे विशेष. धोनी सहजपणे प्रतिस्पर्धी संघासाठी कुठलीच संधी ठेवत नाही. भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला त्या वेळी फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली. मला उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहीत शर्मा यांचा स्पेल विशेष आवडला. त्यांना त्यांची जबाबदारी चांगली ठाऊक आहे. त्यांनी तळाच्या फलंदाजांविरुद्ध बाऊन्सरचा चांगला वापर केला. दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीमुळे निराश झालो. भारतीय संघ प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करतो, कारण खेळाडूंना स्वत:वर विश्वास आहे. खेळाडूंना माहीत आहे, की आपण चॅम्पियन आहोत. मेलबर्न मैदानावर सामना असला तरी ही लढत मुंबई, दिल्ली किंवा कोलकाता येथे होत असल्याचा भास होत होता. एक खेळाडू म्हणून अशा वातावरणात प्रेरणा मिळते. भारताने पहिल्या लढतीत अ‍ॅडलेडमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर जेतेपदाचा दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिका संघावर १३० धावांनी विजय मिळविला. या दोन विजयांमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य निश्चितच उंचावले असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. याच मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकून यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावरून त्यांची नकारात्मक वृत्ती दिसून आली. खेळपट्टी ‘ग्रीन टॉप’ नसेल तर कर्णधाराने नेहमीच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यावा, असा मित्रत्वाचा सल्ला मी सर्व कर्णधारांना देतो. (टीसीएम)