शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

टीम इंडियाचे ‘मिशन फायनल’, बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज उपांत्य सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:47 IST

आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

डर्बी : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. सहा वेळेच्या विजेत्या संघाला नमवून अंतिम फेरीत धडक देण्याचे कडवे आव्हान भारतापुढे असेल. भारताचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड चांगला नाही. ४२ पैकी ३४ सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ मागील पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळेल. भारत विजयी झाल्यास स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक देईल. २००५मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिल्यानंतर भारताचा आॅस्ट्रेलियाकडूनच पराभव झाला होता. भारताने कौंटी मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासह चार सामने खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने येथे एकही सामना खेळलेला नाही. मिताली म्हणाली, ‘‘येथे चार सामने खेळण्याचा अनुभव असल्याने आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धारानेच खेळणार आहोत. हे काम सोपे नाही. प्रतिस्पर्धी संघाला नमविण्यासाठी प्रत्येक विभागात सरस कामगिरी करण्याचे आव्हान असेल.’’ राऊंड रॉबिन सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध मितालीने कूर्मगती फलंदाजी केली होती. ही चूक तिला सुधारावी लागेल. पूनम राऊतलादेखील शतकी खेळीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध दडपण होते; पण मितालीने शतक ठोकले, तर वेदा कृष्णमूर्तीने ४० चेंडूंत ७० धावा फटकावल्या. नंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला केवळ ७९ धावांत गुंडाळले. न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे भारतीय संघ उत्साहात आहे. आमची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगलीच असून आॅस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात धडाका गाजविण्याचे प्रयत्न राहतील, असे मितालीने सांगितले.(वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया अपराजित नाही : एडल्जीविश्वचषक महिला क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया अपराजित नाही. उपांत्य सामन्यात त्यांच्यावर विजय नोंदविण्यासाठी भारताला सर्वोत्कृष्ट कामगिरी मात्र करावी लागेल, असे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडल्जी यांचे मत आहे. सीओए सदस्य असलेल्या एडल्जी म्हणाल्या, ‘महिला क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया सर्वाधिक यशस्वी संघ आहे; पण त्यांना हरवू शकत नाही, असे मुळीच नाही. डावपेच आखून खेळल्यास भारतीय संघ विजय मिळवू शकतो. भारताने नाणेफेक जिंकताच फलंदाजी घेत मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मितालीसोबतच स्मृती मानधना हिलादेखील मोठी खेळी करण्याची गरज राहील.’उभय संघ यांतून निवडणारभारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नुजहत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा व सुषमा वर्मा.आॅस्ट्रेलिया : मेग लेनिग (कर्णधार), सारा अ‍ॅले, ख्रिस्टीन बीम्स, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, निकोल बोल्टन, अ‍ॅश्ले गार्डनर, रशेल हेन्स, एलिसा हिली, जेस जोनासेन, बेथ मूनी, अ‍ॅलिस पेरी, मेगान शट, बेलिडा वेकारेवा, अ‍ॅलिस विलानी व अमांडा जेड वेलिंग्टन.स्थळ : कांैटी स्टेडियम, डर्बीसामना : दुपारी ३ पासून