शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

टीम इंडियाचे ‘मिशन फायनल’, बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध आज उपांत्य सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:47 IST

आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

डर्बी : आत्मविश्वास उंचावलेला भारतीय महिला संघ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गुरुवारी बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल. सहा वेळेच्या विजेत्या संघाला नमवून अंतिम फेरीत धडक देण्याचे कडवे आव्हान भारतापुढे असेल. भारताचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध रेकॉर्ड चांगला नाही. ४२ पैकी ३४ सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताचा संघ मागील पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने खेळेल. भारत विजयी झाल्यास स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक देईल. २००५मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिल्यानंतर भारताचा आॅस्ट्रेलियाकडूनच पराभव झाला होता. भारताने कौंटी मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासह चार सामने खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने येथे एकही सामना खेळलेला नाही. मिताली म्हणाली, ‘‘येथे चार सामने खेळण्याचा अनुभव असल्याने आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याच्या निर्धारानेच खेळणार आहोत. हे काम सोपे नाही. प्रतिस्पर्धी संघाला नमविण्यासाठी प्रत्येक विभागात सरस कामगिरी करण्याचे आव्हान असेल.’’ राऊंड रॉबिन सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध मितालीने कूर्मगती फलंदाजी केली होती. ही चूक तिला सुधारावी लागेल. पूनम राऊतलादेखील शतकी खेळीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध दडपण होते; पण मितालीने शतक ठोकले, तर वेदा कृष्णमूर्तीने ४० चेंडूंत ७० धावा फटकावल्या. नंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला केवळ ७९ धावांत गुंडाळले. न्यूझीलंडविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे भारतीय संघ उत्साहात आहे. आमची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगलीच असून आॅस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात धडाका गाजविण्याचे प्रयत्न राहतील, असे मितालीने सांगितले.(वृत्तसंस्था)आॅस्ट्रेलिया अपराजित नाही : एडल्जीविश्वचषक महिला क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया अपराजित नाही. उपांत्य सामन्यात त्यांच्यावर विजय नोंदविण्यासाठी भारताला सर्वोत्कृष्ट कामगिरी मात्र करावी लागेल, असे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडल्जी यांचे मत आहे. सीओए सदस्य असलेल्या एडल्जी म्हणाल्या, ‘महिला क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया सर्वाधिक यशस्वी संघ आहे; पण त्यांना हरवू शकत नाही, असे मुळीच नाही. डावपेच आखून खेळल्यास भारतीय संघ विजय मिळवू शकतो. भारताने नाणेफेक जिंकताच फलंदाजी घेत मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मितालीसोबतच स्मृती मानधना हिलादेखील मोठी खेळी करण्याची गरज राहील.’उभय संघ यांतून निवडणारभारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, झूलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मानधना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नुजहत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा व सुषमा वर्मा.आॅस्ट्रेलिया : मेग लेनिग (कर्णधार), सारा अ‍ॅले, ख्रिस्टीन बीम्स, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, निकोल बोल्टन, अ‍ॅश्ले गार्डनर, रशेल हेन्स, एलिसा हिली, जेस जोनासेन, बेथ मूनी, अ‍ॅलिस पेरी, मेगान शट, बेलिडा वेकारेवा, अ‍ॅलिस विलानी व अमांडा जेड वेलिंग्टन.स्थळ : कांैटी स्टेडियम, डर्बीसामना : दुपारी ३ पासून