शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

टीम इंडियाला जखमांनी ग्रासले : वेंगसरकर

By admin | Updated: February 7, 2015 01:38 IST

जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : टीम इंडियाने विश्वचषकासाठी संघ निवडताना अनेक जखमी खेळाडूंना स्थान दिले. यामुळे जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.विशेष मुलाखतीत वेंगसरकर म्हणाले,‘‘खेळाडू फिट होतील या आशेपोटी संघात जखमी खेळाडूंचा भरणा करणे अंगलट येऊ शकते.’’ गेल्या विश्वचषकात ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’ बनलेला युवराजसिंग आणि फॉर्ममध्ये असलेला सलामीचा फलंदाज मुरलीविजय याला बाहेर ठेवण्याचा निर्णय ‘आश्चर्यकारक’ असल्याचे वेंगसरकरचे मत आहे. पाकविरुद्ध भारताला पहिलाच सामना खेळायचा आहे. वेंगसरकर यांच्या मते हा सामना भारताला संधीसारखा असेल. यात विजय मिळवून संघाचे मनोबल उंचावू शकतो, असे ते म्हणाले.या मुलाखतीचे मुख्य अंश असे...प्रश्न : आॅस्ट्रेलियातील दारुण पराभवाचा परिणाम विश्वचषकात होईल?वेंगसरकर : असे व्हायला नको. विश्वचषक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आहे. भारताविरुद्ध पाकचे रेकॉर्ड शून्य आहे, शिवाय त्यांचा संघ दुबळा आहे. संघाचे संयोजन फिट असेल तर पाकला नमवून विजयी वाटचाल करू शकतो.प्रश्न : काही जखमी खेळाडूंचा भरणा असल्याने संघाच्या संयोजनावर समाधानी आहात का?वेंगसरकर : संघाकडे पर्याय नसल्याने जखमी खेळाडूंना ठेवावे लागत आहे. खेळाडू फिट होतील या आशेवर राहू नका. त्यापेक्षा यशासाठी उत्साही असलेल्या नव्या दमाच्या खेळाडूंना स्थान द्यावे. ईशांत फिट नसेल तर धवल कुलकर्णीला संधी द्या.प्रश्न : युवराजसिंगला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळायला हवे होते?वेंगसरकर : युवराजला संधी नाकारणे आश्चर्यचकित करणारे आहे. स्थानिक सामन्यात शानदार खेळत असून, ‘मॅचविनर’ आहे. गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही कामात येतो. याशिवाय मुरली विजयला स्थान नाकारणे अधिक निराशाजनक आहे.प्रश्न : आॅस्ट्रेलियात गोलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. गडी बाद करणारे आणि धावा रोखणारे गोलंदाज नाहीत, यावर काय मत आहे?वेंगसरकर : आमच्याकडे दुर्दैवाने असे गोलंदाज नाहीत. गेल्या काही वर्षांत आम्ही दूरदृष्टी दाखविलेली नाही. खेळाच्या सर्व प्रकारात त्याच त्या गोलंदाजांच्या सेवा घेऊन त्यांचा फॉर्म खराब केला. आता महत्त्वाच्या स्पर्धेत हे गोलंदाज फिटनेस आणि फॉर्मशी झुंज देत आहेत.प्रश्न : भारताशिवाय विश्वचषकाचे प्रबळ दावेदार कोण?वेंगसरकर : आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांना भक्कम संधी असेल.(वृत्तसंस्था)