शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

टीम इंडियाला जखमांनी ग्रासले : वेंगसरकर

By admin | Updated: February 7, 2015 01:38 IST

जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : टीम इंडियाने विश्वचषकासाठी संघ निवडताना अनेक जखमी खेळाडूंना स्थान दिले. यामुळे जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.विशेष मुलाखतीत वेंगसरकर म्हणाले,‘‘खेळाडू फिट होतील या आशेपोटी संघात जखमी खेळाडूंचा भरणा करणे अंगलट येऊ शकते.’’ गेल्या विश्वचषकात ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’ बनलेला युवराजसिंग आणि फॉर्ममध्ये असलेला सलामीचा फलंदाज मुरलीविजय याला बाहेर ठेवण्याचा निर्णय ‘आश्चर्यकारक’ असल्याचे वेंगसरकरचे मत आहे. पाकविरुद्ध भारताला पहिलाच सामना खेळायचा आहे. वेंगसरकर यांच्या मते हा सामना भारताला संधीसारखा असेल. यात विजय मिळवून संघाचे मनोबल उंचावू शकतो, असे ते म्हणाले.या मुलाखतीचे मुख्य अंश असे...प्रश्न : आॅस्ट्रेलियातील दारुण पराभवाचा परिणाम विश्वचषकात होईल?वेंगसरकर : असे व्हायला नको. विश्वचषक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आहे. भारताविरुद्ध पाकचे रेकॉर्ड शून्य आहे, शिवाय त्यांचा संघ दुबळा आहे. संघाचे संयोजन फिट असेल तर पाकला नमवून विजयी वाटचाल करू शकतो.प्रश्न : काही जखमी खेळाडूंचा भरणा असल्याने संघाच्या संयोजनावर समाधानी आहात का?वेंगसरकर : संघाकडे पर्याय नसल्याने जखमी खेळाडूंना ठेवावे लागत आहे. खेळाडू फिट होतील या आशेवर राहू नका. त्यापेक्षा यशासाठी उत्साही असलेल्या नव्या दमाच्या खेळाडूंना स्थान द्यावे. ईशांत फिट नसेल तर धवल कुलकर्णीला संधी द्या.प्रश्न : युवराजसिंगला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळायला हवे होते?वेंगसरकर : युवराजला संधी नाकारणे आश्चर्यचकित करणारे आहे. स्थानिक सामन्यात शानदार खेळत असून, ‘मॅचविनर’ आहे. गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही कामात येतो. याशिवाय मुरली विजयला स्थान नाकारणे अधिक निराशाजनक आहे.प्रश्न : आॅस्ट्रेलियात गोलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. गडी बाद करणारे आणि धावा रोखणारे गोलंदाज नाहीत, यावर काय मत आहे?वेंगसरकर : आमच्याकडे दुर्दैवाने असे गोलंदाज नाहीत. गेल्या काही वर्षांत आम्ही दूरदृष्टी दाखविलेली नाही. खेळाच्या सर्व प्रकारात त्याच त्या गोलंदाजांच्या सेवा घेऊन त्यांचा फॉर्म खराब केला. आता महत्त्वाच्या स्पर्धेत हे गोलंदाज फिटनेस आणि फॉर्मशी झुंज देत आहेत.प्रश्न : भारताशिवाय विश्वचषकाचे प्रबळ दावेदार कोण?वेंगसरकर : आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांना भक्कम संधी असेल.(वृत्तसंस्था)