शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

सांघिक कामगिरीमुळे टीम इंडिया यशस्वी - रवी शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:41 IST

भारतीय संघाने गेल्या तीन वर्षांत मिळविलेले यश हे सांघिक असून त्यामध्ये कोणत्याही एकट्या व्यक्तीचे विशेष योगदान नाही. रवी शास्त्री व अनिल कुंबळे

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भारतीय संघाने गेल्या तीन वर्षांत मिळविलेले यश हे सांघिक असून त्यामध्ये कोणत्याही एकट्या व्यक्तीचे विशेष योगदान नाही. रवी शास्त्री व अनिल कुंबळे येतील आणि जातील; पण आज भारत कसोटीमध्ये अव्वल स्थानावर आहे. याचे सगळे श्रेय खेळाडूंना आहे, असे भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ बुधवारी रवाना झाला. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. या वेळी शास्त्री यांनी सांगितले, ‘‘मी भूतकाळातील गोष्टी घेऊन पुढे आलेलो नाही. आज भारताने सांघिक कामगिरीच्या जोरावर यश मिळविले आहे. श्रीलंकेच्या मागील दौऱ्यापासून आतापर्यंत मी परिपक्व झालो असून, गेल्या दोन आठवड्यांतही खूप परिपक्व झालो आहे.’’यादरम्यान, शास्त्री यांना भरत अरुण यांच्या निवडीबाबतही विचारण्यात आले. त्यांच्यात कोणते गुण विशेष आहेत ज्यामुळे त्यांची निवड करण्यात आली, असे विचारले असता शास्त्री म्हणाले, ‘‘यासाठी त्यांची कामगिरी तपासा म्हणजे मुख्य कारण मिळेल. त्यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी मोठी असून त्यांचा अनुभव मोठा आहे. ते १५ वर्षांपासून प्रशिक्षक आहेत आणि ‘अ’ श्रेणी संघ, १९ वर्षांखालील संघ, ज्युनिअर विश्वचषक संघ यांसोबत काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. ते खेळाडूंना माझ्यापेक्षा जास्त चांगले ओळखतात.’’त्याचप्रमाणे, ‘२०१५ विश्वचषक स्पर्धेत आपल्या गोलंदाजांनी ८० पैकी ७७ बळी घेतले. अरुण यांची पात्रता काय आहे, हे मला सांगण्याची गरज नाही. सर्वांनीच त्यांची कामगिरी पाहिली आहे,’ असेही शास्त्री यांनी या वेळी म्हटले. कोणताही दबाव नाही : विराट कोहली मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या मैदानाबाहेरील घटनांमुळे कामगिरीवर काही फरक पडेल का, या प्रश्नाला उत्तर देताना कोहलीने सांगितले, ‘‘या सर्व घडामोडींमुळे माझ्या कामगिरीवर अतिरिक्त कोणताही दबाव नसेल, असे मला वाटते. माझं काम मी पुरेपूर जाणून आहे. आम्ही एक संघ म्हणून यश मिळविण्याचा प्रयत्न करू. सर्वांनीच खडतर परिस्थितीला तोंड दिले आहे. जोपर्यंत मी कर्णधार आहे, जबाबदारी घेत राही.’’काही दिवसांपूर्वी भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्य सौरभ गांगुली याने कोहलीला प्रशिक्षकाचे कार्य समजून घ्यावे लागेल, असे वक्तव्य केले होते. त्याअनुषंगाने कोहलीला विचारले, की आता प्रशिक्षक तुझ्या पसंतीचे असल्याने तुला प्रशिक्षकाचे काम समजून घेणे सोपे जाईल का? यावर कोहली म्हणाला, ‘‘आम्ही गेल्या तीन वर्षांत एकत्र काम केलेले आहे. मला आणखी काही समजून घेण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही. आम्ही याआधीही एकत्र काम केलेले असून आमच्याकडून काय अपेक्षा आहेत व कशी परिस्थिती आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठी आम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील, असे मला वाटत नाही.’’