शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

टीम इंडियाच लय भारी

By admin | Updated: February 16, 2015 03:03 IST

विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व यावेळीही कायम राखले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या

अ‍ॅडिलेड : विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व यावेळीही कायम राखले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव करीत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. आजपर्यंत जे घडले नाही ते यावेळी घडणार, अशी आस ठेवून असणाऱ्या पाकिस्तानी चाहत्यांच्या पदरी या निकालामुळे पुन्हा एकदा निराशा पडली. भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विजयाचा षट्कार ठोकला. १९९२ मध्ये आॅस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेपासून पाकिस्तानविरुद्ध प्रारंभ झालेली विजयाची मालिका यावेळीही भारताने कायम राखली. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने १२६ चेंडूंना सामोरे जाताना १०७ धावांची खेळी केली. शतकवीर कोहली व्यतिरिक्त सुरेश रैना (७४) आणि शिखर धवन (७३) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने ७ बाद ३०० धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानचा डाव ४७ षटकांत २२४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे मोहम्मद शमी (३५ धावांत ४ बळी), मोहित शर्मा (३५ धावांत २ बळी) आणि उमेश यादव (५० धावांत २ बळी) यांनी अचूक मारा करीत पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानतर्फे मिसबाह उल-हकने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. चौथ्या षटकांत अनुभवी युनूस खान (६) याला मोहम्मद शमीने तंबूचा मार्ग दाखविला. शहजाद व हॅरिस सोहेल (३६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हॅरिस सुरुवातीपासून फॉर्मात असल्याचे दिसून येत होते; पण शहजाद मात्र संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. हॅरिसने यादवच्या एका षटकात तीन चौकार वसूल करीत आपला निर्धार स्पष्ट केला; पण फिरकीपटू अश्विनने हॅरिसचा अडथळा दूर करीत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. पाकिस्तानने २३ व्या षटकात धावसंख्येचे शतक पूर्ण केले. त्यानंतर धोनीने यादवला पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण केले. यादवने दुसऱ्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात शहजाद व शोएब मकसूद (०) यांना तीन चेंडूंच्या अंतरात माघारी परतवीत भारताला वर्चस्व मिळवून दिले. शहजादने यादवच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जडेजाला झेल दिला, तर मकसूदचा झेल स्लिपमध्ये तैनात रैनाने टिपला. जडेजाने त्यानंतरच्या षटकात उमर अकमलला (०) धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे पाकिस्तानची ५ बाद १०३ अशी अवस्था झाली. अकमलला मैदानावरील पंच रिचर्ड कॅटलब्रा यांनी नाबाद ठरविले होते; पण धोनीने रेफरलची मागणी केली आणि तिसऱ्या पंचांचा कौल भारतीय संघाच्या बाजूने मिळाला. पाकची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. शमीच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उडालेला झेल कोहलीने टिपला. आफ्रिदीने २२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. शमीने त्याच षटकात वहाब रियाज (४) याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर पाकिस्तानने ३३ व्या षटकात ह्यपॉवर प्लेह्ण घेण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पाच षटकांत पाकिस्तानने आफ्रिदी व रियाज यांच्या विकेट गमावीत ४४ धावा फटकाविल्या. दरम्यान, मिसबाहने कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक पूर्ण केले. मिसबाहने यासिर शाहच्या (१३) साथीने आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मोहितने यासिरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पाकला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी १०७ धावांची गरज होती. शमीने त्यानंतर मिसबाहला रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडत पाकला नववा धक्का दिला. मिसबाहने ८४ चेंडूंत नऊ चौकार व एक षट्कार ठोकला. मोहितने सोहेल खानला बाद करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघातर्फे कोहलीने आपल्या आवडीच्या अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावर शतक झळकावीत सूर गवसल्याचे सिद्ध केले. पाकिस्तानतर्फे युवा वेगवान गोलंदाज सोहेलने (५५ धावांत ५ बळी) डेथ ओव्हरमध्ये अचूक मारा केल्यामुळे भारताला अखेरच्या पाच षटकांत केवळ २७ धावा फटकाविता आल्या. कोहलीने २२ वे शतक झळकाविताना सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली. (वृत्तसंस्था)

 

> हा माझ्या करिअरमधील स्पेशल दिवसांपैकी एक आहे. पाकिस्तानसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याला नमवून विश्वचषकात ‘विनिंग स्टार्ट’ करणे अविस्मरणीय आहे. आमच्याप्रमाणेच पाकसाठीही ही लढत महत्वाची होती. या संघाने चांगली झुंज दिली. मागील काही सामन्यांतील कामगिरी बघता एक-दोन दिवसांपासून मी थोडा नर्व्हस होतो. विपरित परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडून आम्ही विश्वचषक मोहिमेचा प्रारंभ जोरात केला, याचे विशेष समाधान आहे. दुसºया बाजूने फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपे जावे यासाठी एक बाजू लावून धरणे, माझ्याकडून अपेक्षित होते. यात मी यशस्वी ठरलो. शिखर आणि रैना यांनी मोलाची साथ दिल्यामुळेच आम्ही तीनशेची मजल मारू शकलो. हे विजयी अभियान संपूर्ण स्पर्धेत कायम राहील, अशी अपेक्षा आहे. - विराट कोहली, सामनावीर

 

> कॅ प्टन खुश हुआ ! या संस्मरणीय विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला जाते. पाकविरुद्धचा हा मोठा विजय म्हणजे ‘परफेक्ट टीम वर्क’चे उत्तम उदाहरण आहे. फलंदाजांच्या कामगिरीबाबत मी विशेष आनंदी आहे. अ‍ॅडलेड ओव्हलच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे सोपे नसते. सामन्याच्या प्रारंभी चेंडू नीट बॅटवर येत नव्हता. शिवाय चेंडूचा टप्पा पडल्यावर वेगाचा अंदाज येत नव्हता. या परिस्थितीचा फलंदाजांनी संयमाने सामना केला. नंतर विराट, शिखर, रैना यांनी आपला रंग दाखवला. या तिघांच्या फलंदाजीचे विजयात खचितच मोलाचे योगदान आहे. अशा मोठ्या सामन्यात मी भावनांवर नियंत्रण ठेवत नाही. माझ्या चेहºयांवररून ते ओळखू येत नाही इतकेच. खास या सामन्यासाठी भारतातून खूप मोठ्या प्रमाणावर चाहते येथे आले. येथे येऊन आमचे मनोबल वाढवल्याबद्दल थँक्स! - महेंद्रसिंह धोनी, कर्णधार, भारत

 

> भारत चांगला खेळला या सामन्यात आम्हालाही विजयाची संधी होती. मात्र, शतकी वेस ओलांडल्यावर ३ महत्वाचे फलंदाज झटपट गमावल्याची किंमत आम्हाला पराभवाच्या रुपात मोजावी लागली. टीम इंडियाने सर्वच आघाड्यांवर आमच्यापेक्षा सरस खेळ केला, हे मान्य करावेच लागेल. अवघड खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली आणि प्रभावी गोलंदाजी करून आम्हाला रोखले. आघाडीचे आणि मध्यफळीतील फलंदाज चांगले खेळले असते तर विजय मिळवता आला असता. मात्र, दोघा-तिघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी केवळ खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. ही लढत गमावली असली तरी, उर्वरित सामन्यांत आम्ही कामगिरी उंचावू. पुढील सामन्यात कमबॅक करण्यावर आता आम्ही संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. - मिसबाह-उल-हक, कर्णधार, पाकिस्तान