शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

टीम इंडियाच लय भारी

By admin | Updated: February 16, 2015 03:03 IST

विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व यावेळीही कायम राखले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या

अ‍ॅडिलेड : विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व यावेळीही कायम राखले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव करीत विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. आजपर्यंत जे घडले नाही ते यावेळी घडणार, अशी आस ठेवून असणाऱ्या पाकिस्तानी चाहत्यांच्या पदरी या निकालामुळे पुन्हा एकदा निराशा पडली. भारताने विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध विजयाचा षट्कार ठोकला. १९९२ मध्ये आॅस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेपासून पाकिस्तानविरुद्ध प्रारंभ झालेली विजयाची मालिका यावेळीही भारताने कायम राखली. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने १२६ चेंडूंना सामोरे जाताना १०७ धावांची खेळी केली. शतकवीर कोहली व्यतिरिक्त सुरेश रैना (७४) आणि शिखर धवन (७३) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने ७ बाद ३०० धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानचा डाव ४७ षटकांत २२४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे मोहम्मद शमी (३५ धावांत ४ बळी), मोहित शर्मा (३५ धावांत २ बळी) आणि उमेश यादव (५० धावांत २ बळी) यांनी अचूक मारा करीत पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानतर्फे मिसबाह उल-हकने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. चौथ्या षटकांत अनुभवी युनूस खान (६) याला मोहम्मद शमीने तंबूचा मार्ग दाखविला. शहजाद व हॅरिस सोहेल (३६) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हॅरिस सुरुवातीपासून फॉर्मात असल्याचे दिसून येत होते; पण शहजाद मात्र संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. हॅरिसने यादवच्या एका षटकात तीन चौकार वसूल करीत आपला निर्धार स्पष्ट केला; पण फिरकीपटू अश्विनने हॅरिसचा अडथळा दूर करीत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. पाकिस्तानने २३ व्या षटकात धावसंख्येचे शतक पूर्ण केले. त्यानंतर धोनीने यादवला पुन्हा गोलंदाजीसाठी पाचारण केले. यादवने दुसऱ्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात शहजाद व शोएब मकसूद (०) यांना तीन चेंडूंच्या अंतरात माघारी परतवीत भारताला वर्चस्व मिळवून दिले. शहजादने यादवच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जडेजाला झेल दिला, तर मकसूदचा झेल स्लिपमध्ये तैनात रैनाने टिपला. जडेजाने त्यानंतरच्या षटकात उमर अकमलला (०) धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे पाकिस्तानची ५ बाद १०३ अशी अवस्था झाली. अकमलला मैदानावरील पंच रिचर्ड कॅटलब्रा यांनी नाबाद ठरविले होते; पण धोनीने रेफरलची मागणी केली आणि तिसऱ्या पंचांचा कौल भारतीय संघाच्या बाजूने मिळाला. पाकची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. शमीच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उडालेला झेल कोहलीने टिपला. आफ्रिदीने २२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. शमीने त्याच षटकात वहाब रियाज (४) याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर पाकिस्तानने ३३ व्या षटकात ह्यपॉवर प्लेह्ण घेण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पाच षटकांत पाकिस्तानने आफ्रिदी व रियाज यांच्या विकेट गमावीत ४४ धावा फटकाविल्या. दरम्यान, मिसबाहने कारकिर्दीतील ३९ वे अर्धशतक पूर्ण केले. मिसबाहने यासिर शाहच्या (१३) साथीने आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मोहितने यासिरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पाकला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी १०७ धावांची गरज होती. शमीने त्यानंतर मिसबाहला रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडत पाकला नववा धक्का दिला. मिसबाहने ८४ चेंडूंत नऊ चौकार व एक षट्कार ठोकला. मोहितने सोहेल खानला बाद करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघातर्फे कोहलीने आपल्या आवडीच्या अ‍ॅडिलेड ओव्हल मैदानावर शतक झळकावीत सूर गवसल्याचे सिद्ध केले. पाकिस्तानतर्फे युवा वेगवान गोलंदाज सोहेलने (५५ धावांत ५ बळी) डेथ ओव्हरमध्ये अचूक मारा केल्यामुळे भारताला अखेरच्या पाच षटकांत केवळ २७ धावा फटकाविता आल्या. कोहलीने २२ वे शतक झळकाविताना सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली. (वृत्तसंस्था)

 

> हा माझ्या करिअरमधील स्पेशल दिवसांपैकी एक आहे. पाकिस्तानसारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्याला नमवून विश्वचषकात ‘विनिंग स्टार्ट’ करणे अविस्मरणीय आहे. आमच्याप्रमाणेच पाकसाठीही ही लढत महत्वाची होती. या संघाने चांगली झुंज दिली. मागील काही सामन्यांतील कामगिरी बघता एक-दोन दिवसांपासून मी थोडा नर्व्हस होतो. विपरित परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडून आम्ही विश्वचषक मोहिमेचा प्रारंभ जोरात केला, याचे विशेष समाधान आहे. दुसºया बाजूने फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपे जावे यासाठी एक बाजू लावून धरणे, माझ्याकडून अपेक्षित होते. यात मी यशस्वी ठरलो. शिखर आणि रैना यांनी मोलाची साथ दिल्यामुळेच आम्ही तीनशेची मजल मारू शकलो. हे विजयी अभियान संपूर्ण स्पर्धेत कायम राहील, अशी अपेक्षा आहे. - विराट कोहली, सामनावीर

 

> कॅ प्टन खुश हुआ ! या संस्मरणीय विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला जाते. पाकविरुद्धचा हा मोठा विजय म्हणजे ‘परफेक्ट टीम वर्क’चे उत्तम उदाहरण आहे. फलंदाजांच्या कामगिरीबाबत मी विशेष आनंदी आहे. अ‍ॅडलेड ओव्हलच्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे सोपे नसते. सामन्याच्या प्रारंभी चेंडू नीट बॅटवर येत नव्हता. शिवाय चेंडूचा टप्पा पडल्यावर वेगाचा अंदाज येत नव्हता. या परिस्थितीचा फलंदाजांनी संयमाने सामना केला. नंतर विराट, शिखर, रैना यांनी आपला रंग दाखवला. या तिघांच्या फलंदाजीचे विजयात खचितच मोलाचे योगदान आहे. अशा मोठ्या सामन्यात मी भावनांवर नियंत्रण ठेवत नाही. माझ्या चेहºयांवररून ते ओळखू येत नाही इतकेच. खास या सामन्यासाठी भारतातून खूप मोठ्या प्रमाणावर चाहते येथे आले. येथे येऊन आमचे मनोबल वाढवल्याबद्दल थँक्स! - महेंद्रसिंह धोनी, कर्णधार, भारत

 

> भारत चांगला खेळला या सामन्यात आम्हालाही विजयाची संधी होती. मात्र, शतकी वेस ओलांडल्यावर ३ महत्वाचे फलंदाज झटपट गमावल्याची किंमत आम्हाला पराभवाच्या रुपात मोजावी लागली. टीम इंडियाने सर्वच आघाड्यांवर आमच्यापेक्षा सरस खेळ केला, हे मान्य करावेच लागेल. अवघड खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली आणि प्रभावी गोलंदाजी करून आम्हाला रोखले. आघाडीचे आणि मध्यफळीतील फलंदाज चांगले खेळले असते तर विजय मिळवता आला असता. मात्र, दोघा-तिघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांनी केवळ खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. ही लढत गमावली असली तरी, उर्वरित सामन्यांत आम्ही कामगिरी उंचावू. पुढील सामन्यात कमबॅक करण्यावर आता आम्ही संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. - मिसबाह-उल-हक, कर्णधार, पाकिस्तान