शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

टीम इंडिया झिम्बाब्वेत दाखल

By admin | Updated: June 10, 2016 03:49 IST

१६ सदस्यांचा भारतीय संघ ११ जूनपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी हरारेला पोहोचला आहे.

हरारे : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या १६ सदस्यांचा भारतीय संघ ११ जूनपासून झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी हरारेला पोहोचला आहे. गुरुवारपासून टीम इंडियाच्या सराव सत्रास सुरुवात झाली.या दौऱ्यासाठी राष्ट्रीय निवडकर्त्यांनी काही युवा व अननुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. उद्या, शनिवारपासून सुरू होणाऱ्या या झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत प्रत्येकी ३ एकदिवसीय व टी-२० सामने होणार असून, सर्व सामने हरारे येथे पार पडतील.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरवरून टीम इंडिया झिम्बाब्वेला पोहोचल्याची माहिती दिली. त्याव्यतिरिक्त बीसीसीआयने माहिती दिली की, ‘हरारे येथील स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये सकाळी साडेनऊ ते १२ वाजेपर्यंत टीम इंडिया सराव करेल.’ झिम्बाब्वे विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना ११ जूनला होणार असून, त्यानंतर १३ व १५ जूनला अनुक्रमे दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाईल. यानंतर १०, २० व २२ जूनला टी-२० सामना खेळविण्यात येईल. (वृत्तसंस्था) >संघात जागा निश्चित करणार : पांड्येझिम्बाब्वे दौऱ्यापासूनच आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या मनिष पांड्येने उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय व टी-२० मालिकेत चमकदार कामगिरी करून टीम इंडियामध्ये जागा निश्चित करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. हरारे येथेच गतवर्षी जुलैमध्ये पांड्येने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.पांड्येने सांगितले की, ‘हा दौरा माझ्यासाठी पुन्हा एकदा नवी सुरुवात असेल. गतवर्षी आम्ही येथे याच काळात आलो होतो आणि झिम्बाब्वेविरुद्धच मी पदार्पण केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देता येईल.’ त्याचप्रमाणे, ‘झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या सामन्यात केलेली खेळी खास होती. मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले होते. ही खूप चांगली सुरुवात होती आणि यामुळे माझा आत्मविश्वास वाढला,’ असेही पांड्येने सांगितले. >‘युवा ब्रिगेड’वर विशेष लक्ष : बांगरझिम्बाब्वे दौऱ्यात स्थानिक परिस्थितीशी एकरूप होण्याचे आमच्या युवा खेळाडूंपुढे आव्हान आहे. कमी वेळेत त्यांनी येथील परिस्थितीशी जुळवून घ्यावे, असे टीम इंडियाचे प्रमुख कोच संजय बांगर यांनी म्हटले आहे.भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी झिम्बाब्वे दौरा अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून ४३ वर्षांचे बांगर म्हणाले, ‘युवा खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीस सुरुवात होणार असल्याने चांगल्या कामगिरीचा दूरगामी परिणाम कारकिर्दीवर पडेल. संघात असलेले अनेक जण झिम्बाब्वेत कधीच खेळले नाहीत. कमीत कमी वेळेत परिस्थितीशी एकरूप होऊन कामगिरी करणे हे अवघड आव्हान असेल. आम्हाला थेट वन-डे खेळायचा आहे.’झिम्बाब्वेच्या या दौऱ्यात असलेल्या खेळाडूंपैकी केवळ पाचजण २०१५ मध्ये येथे येऊन गेले आहेत. भारताने ३-० ने मालिका जिंकली होती. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आल्याने अनेक नवख्या चेहऱ्यांना स्थान मिळाले. सर्वाधिक अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हाच आहे. त्याने २७५ वन-डे आणि ६८ टी-२० सामने खेळले आहेत. अन्य सदस्य मात्र एकूण ८३ वन-डे आणि २८ टी-२० सामने खेळले आहेत. यजुवेंद्र चहल, फैज फझल, मनदीपसिंग, करुण नायर आणि जयंत यादव हे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत. आमचे खेळाडू क्षेत्ररक्षणात तरबेज असून, फलंदाजी आणि गोलंदाजीही सरस असल्याचे बांगर यांचे मत आहे.