शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
4
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
7
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
8
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
9
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
10
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
11
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
12
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
13
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
14
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
15
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
16
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
17
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
18
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
19
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
20
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल

टीम इंडियाची कोरियावर मात

By admin | Updated: June 15, 2016 05:20 IST

एस. व्ही. सुनील आणि निकीन तिमय्या यांनी नोंदविलेल्या गोलमुळे एशियाडच्या सुवर्णविजेत्या भारतीय संघाने कोरियाचे कडवे आव्हान मोडीत काढून मंगळवारी २-१ ने विजयासह एफआयएच

लंडन : एस. व्ही. सुनील आणि निकीन तिमय्या यांनी नोंदविलेल्या गोलमुळे एशियाडच्या सुवर्णविजेत्या भारतीय संघाने कोरियाचे कडवे आव्हान मोडीत काढून मंगळवारी २-१ ने विजयासह एफआयएच चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे आगेकूच केली आहे.चार सामन्यांत भारताचा हा दुसरा विजय असून, सात गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोरियाचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव होता. कोरियाचा संघ फायनलच्या चढाओढीतून बाहेर पडला. कोरियाच्या खात्यात तीन गुण आहेत. भारताच्या शानदार विजयात सुनीलने ३९व्या आणि तिमय्याने ५७व्या मिनिटाला गोल केला. कोरियाकडून एकमेव गोल किम जुहून याने ५७व्या मिनिटालाच केला. फायनलच्या चढाओढीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. मागच्या सामन्यात बेल्जियमने भारताला २-१ ने पराभूत केले होते; पण कोरियाविरुद्ध साजरा केलेला विजय विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी संजीवनी ठरणार आहे. आजच्या सामन्यात आशियातील दोन्ही संघ पहिल्या दोन्ही क्वार्टरमध्ये एकमेकांची बचाव फळी भेदण्यासाठी डावपेच आखत राहिले. अखेर मनप्रीतने सुनीलला डी मध्ये पास दिला व त्याने प्रतिस्पर्धी बचाव फळी भेदून गोल केला. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला एकूण तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण ते तिन्ही वाया गेले. ५७व्या मिनिटाला भारताची बचाव फळी भेदून किमने गोल करताच बरोबरी झाली. पण, पुढच्याच क्षणी तिमय्याने गोल नोंदवून संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. अखेरच्या दोन मिनिटांत आकाशदीपकडे चांगली संधी होती; पण संधीचे सोने करण्यात तो चुकल्याने भारताची आघाडी २-१ अशीच राहिली.(वृत्तसंस्था)