शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बांगलादेशच्या कॅप्टनने पराभवासाठी तमीम इक्बाल, मुशीफिकूरला धरले जबाबदार

By admin | Updated: June 16, 2017 09:30 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ अजून पूर्णपणे तयार झाला नसल्याचे कर्णधार मशरफी मुर्तजाने काल मान्य केले.

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 16 - आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा संघ अजून पूर्णपणे तयार झाला नसल्याचे कर्णधार मशरफी मुर्तजाने काल मान्य केले. आमच्याकडे कौशल्य आहे, शारीरीकदृष्टया  सक्षम आहोत पण मोठया सामन्यांसाठी लागणारी मानसिक कणखरता आमच्याकडे नाहीय अशी कबुली मुर्तजाने काल सामन्यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत दिली. 
भारताने गुरुवारी बांगलादेशवर 9 विकेटने दणदणीत विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
या सामन्यापूर्वी बलाढय भारतीय संघाला आपण रोखू शकतो असा बांगलादेशी क्रिकेट चाहत्यांचा समज झाला होता. पण टीम इंडियाने आपला क्लास आणि क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली. भारताकडून झालेल्या पराभवासाठी कर्णधार मुर्तजाने तमीन इक्बाल आणि मुशाफीकूर रहिमला जबाबदार धरले. या दोघांनी तिस-या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी करुन चांगला जम बसवला होता. 
 
आणखी वाचा 
विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
विराटनं सोडलं शतकावर पाणी, तरीही रचला वनडे इतिहासातला मोठा रेकॉर्ड
 
भारतावर दबाव वाढवण्याच्या स्थितीमध्ये असताना या दोघांनी आपल्या विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या असे मुर्तजा म्हणाला. या पराभवानंतर मुर्तजा कर्णधारपदी कायम राहण्याची शक्यताही धुसर झाली आहे. आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती. आम्ही 330 ते 340 धावा करायला हव्या होत्या. पण तमीम, मुशाफीकूर आणि शाकीबच्या विकेटमुळे आम्हाला फटका बसला. 
 
ज्यूनियर क्रिकेटपटूंनी अशा महत्वाच्या सामन्यांमध्ये मोठी कामगिरी केली पाहिजे आणि तेच आमच्यासमोरचे आव्हान आहे असे मुर्तजा म्हणाला. आमच्या पराभवाने बांगलादेशी क्रिकेट चाहते नक्कीच निराश झाले आहेत पण पुढे गेले पाहिजे. आगामी मालिकांमध्ये या पराभवाला मागे सोडून चांगला खेळ केला पाहिजे असे मुर्तजा म्हणाला. 
 
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली.
 
तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.