शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

तमिळनाडू उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 24, 2015 23:52 IST

राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला.

बंगळुरू : राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र लक्ष्मीपती बालाजी आणि रविचंद्रन आश्विन या अनुभवी गोलंदाजांनी टीच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने उत्तर प्रदेशचा डाव ४८.२ षटकांत १६८ धावांत गुंडाळला. तमिळनाडू सहज बाजी मारेल, असे चित्र होते. परंतु, उत्तर प्रदेशने देखील कडवा प्रतिकार करताना अखेरपर्यंत तमिळनाडूला विजयासाठी झुंजविले.लक्ष्याचा पाठलाग करताना तमिळनाडूला पहिल्याच षटकात धक्का बसला. दिनेश कार्तिक भोपळाही न फोडता परतल्यानंतर लगेच सलामीवीर अभिनव मुकुंदही परतला. यामुळे बॅकफूटवर आलेल्या तमिळनाडूवर उत्तर प्रदेशने जबरदस्त दडपण टाकले आणि त्यांचा अर्धा संघ ८१ धावांवर परतला. या वेळी बाबा इंद्रजीत (४८) आणि विजय शंकर (२२) यांनी सहाव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकरला पीयूष चावलाने बाद केल्यानंतर इंद्रजित अर्धशतकापासून केवळ २ धावा दूर असताना धावबाद झाला. या वेळी उत्तर प्रदेशचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र सतीशने अखेरपर्यंत टिकून राहताना तमिळनाडूला नाट्यमय विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमार आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना उत्तर प्रदेशला विजयाच्या समीप आणले होते. मात्र सतीशने त्यांच्या हातातील सामना हिसकावला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अडखळत्या सुरुवातीनंतर रिंकू सिंगने केलेल्या शानदार ६० धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने १६८ धावांची मजल मारली. विशेष म्हणजे ७ बाद १४५ अशी अवस्था झाल्यावर उत्तर प्रदेशने १६० चा टप्पा पार केला. संक्षिप्त धावफलक : उत्तर प्रदेश : ४८.२ षटकांत सर्व बाद १६८ धावा (रिंकू सिंग ६०, पीयूष चावला २९; लक्ष्मीपती बालाजी ३/३२, रविचंद्रन आश्विन २/२७).तमिळनाडू : ४१.३ षटकांत ९ बाद १६९ धावा (बाबा इंद्रजित ४८, आर. सतीश नाबाद ३४, मुरली विजय ३३; भुवनेश्वर कुमार ३/२५, पीयूष चावला ३/४५)