शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडू उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 24, 2015 23:52 IST

राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला.

बंगळुरू : राजगोपाल सतीश याने केलेल्या झुंजार नाबाद ३४ धावांच्या जोरावर तमिळनाडूने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठताना उत्तर प्रदेश विरुद्ध अवघ्या एका धावाने नाट्यमयरीत्या विजय मिळविला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र लक्ष्मीपती बालाजी आणि रविचंद्रन आश्विन या अनुभवी गोलंदाजांनी टीच्चून केलेल्या माऱ्याच्या जोरावर तमिळनाडूने उत्तर प्रदेशचा डाव ४८.२ षटकांत १६८ धावांत गुंडाळला. तमिळनाडू सहज बाजी मारेल, असे चित्र होते. परंतु, उत्तर प्रदेशने देखील कडवा प्रतिकार करताना अखेरपर्यंत तमिळनाडूला विजयासाठी झुंजविले.लक्ष्याचा पाठलाग करताना तमिळनाडूला पहिल्याच षटकात धक्का बसला. दिनेश कार्तिक भोपळाही न फोडता परतल्यानंतर लगेच सलामीवीर अभिनव मुकुंदही परतला. यामुळे बॅकफूटवर आलेल्या तमिळनाडूवर उत्तर प्रदेशने जबरदस्त दडपण टाकले आणि त्यांचा अर्धा संघ ८१ धावांवर परतला. या वेळी बाबा इंद्रजीत (४८) आणि विजय शंकर (२२) यांनी सहाव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकरला पीयूष चावलाने बाद केल्यानंतर इंद्रजित अर्धशतकापासून केवळ २ धावा दूर असताना धावबाद झाला. या वेळी उत्तर प्रदेशचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र सतीशने अखेरपर्यंत टिकून राहताना तमिळनाडूला नाट्यमय विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमार आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी ३ बळी घेताना उत्तर प्रदेशला विजयाच्या समीप आणले होते. मात्र सतीशने त्यांच्या हातातील सामना हिसकावला. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अडखळत्या सुरुवातीनंतर रिंकू सिंगने केलेल्या शानदार ६० धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने १६८ धावांची मजल मारली. विशेष म्हणजे ७ बाद १४५ अशी अवस्था झाल्यावर उत्तर प्रदेशने १६० चा टप्पा पार केला. संक्षिप्त धावफलक : उत्तर प्रदेश : ४८.२ षटकांत सर्व बाद १६८ धावा (रिंकू सिंग ६०, पीयूष चावला २९; लक्ष्मीपती बालाजी ३/३२, रविचंद्रन आश्विन २/२७).तमिळनाडू : ४१.३ षटकांत ९ बाद १६९ धावा (बाबा इंद्रजित ४८, आर. सतीश नाबाद ३४, मुरली विजय ३३; भुवनेश्वर कुमार ३/२५, पीयूष चावला ३/४५)