शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

तमिळनाडूला नमवत भारत ब अंतिम फेरीत

By admin | Updated: March 27, 2017 01:04 IST

मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड

विशाखापट्टणम : मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत विजय हजारे करंडक स्पर्धेतील विजेत्या तमिळनाडूला ३२ धावांनी नमवत देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत ब संघाने ५0 षटकांत ८ बाद ३१६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून मनीष पांडेने ११0 चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह १0४ धावांची खेळी केली. तसेच याआधीच्या सामन्यातील शतकवीर शिखर धवनने ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५0 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मनीष पांडेने अक्षर पटेल याच्या साथीने ५ व्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी करताना भारत ब संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. अक्षर पटेलने ४३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. तमिळनाडूकडून आर. साई. किशोरने ६0 धावांत ४ गडीबाद केले.प्रत्युत्तरात तामिळनाडूचा संघ सलामीवीर कौशिक गांधीच्या शतकानंतरही ४८.४ षटकांत २८४ धावांत सर्वबाद झाला. कौशिक गांधीने १३४ चेंडूंत ९ चौकारांसह १२४ धावांची खेळी केली. एन. जगदीशन याने ५ चौकार, ३ षटकारांसह ५६ चेंडूंत ६४ धावा केल्या. भारत ब संघाकडून धवल कुलकर्णीने ४५ धावांत तर अक्षर पटेलने ५३ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. चमा मिलिंद आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.भारत ब संघाने सलामीच्या लढतीत भारत अ संघाचा पराभव केला होता आणि सलग दुसरा विजय आणि आठ गुणांसह त्यांनी अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारत अ आणि तामिळनाडू यांच्या लढतीतील विजयी ठरणाऱ्या संघासोबत त्यांचा सामना २९ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.