शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

तमिळनाडूला नमवत भारत ब अंतिम फेरीत

By admin | Updated: March 27, 2017 01:04 IST

मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड

विशाखापट्टणम : मनीष पांडेचे शतक आणि अक्षर पटेलच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारत ब संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत विजय हजारे करंडक स्पर्धेतील विजेत्या तमिळनाडूला ३२ धावांनी नमवत देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली.प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत ब संघाने ५0 षटकांत ८ बाद ३१६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून मनीष पांडेने ११0 चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह १0४ धावांची खेळी केली. तसेच याआधीच्या सामन्यातील शतकवीर शिखर धवनने ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५0 धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मनीष पांडेने अक्षर पटेल याच्या साथीने ५ व्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी करताना भारत ब संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. अक्षर पटेलने ४३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. तमिळनाडूकडून आर. साई. किशोरने ६0 धावांत ४ गडीबाद केले.प्रत्युत्तरात तामिळनाडूचा संघ सलामीवीर कौशिक गांधीच्या शतकानंतरही ४८.४ षटकांत २८४ धावांत सर्वबाद झाला. कौशिक गांधीने १३४ चेंडूंत ९ चौकारांसह १२४ धावांची खेळी केली. एन. जगदीशन याने ५ चौकार, ३ षटकारांसह ५६ चेंडूंत ६४ धावा केल्या. भारत ब संघाकडून धवल कुलकर्णीने ४५ धावांत तर अक्षर पटेलने ५३ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. चमा मिलिंद आणि कुलवंत खेजरोलिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.भारत ब संघाने सलामीच्या लढतीत भारत अ संघाचा पराभव केला होता आणि सलग दुसरा विजय आणि आठ गुणांसह त्यांनी अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारत अ आणि तामिळनाडू यांच्या लढतीतील विजयी ठरणाऱ्या संघासोबत त्यांचा सामना २९ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.