शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

खेळपट्टीबाबत चर्चा निरर्थक : कोहली

By admin | Updated: November 25, 2015 00:00 IST

खेळपट्टीवरून होणारी चर्चा निरर्थक आणि डोक्याबाहेरची असल्याने मी द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अशा चर्चेपासून स्वत:ला हेतुपुरस्सर दूर ठेवल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.

नागपूर : खेळपट्टीवरून होणारी चर्चा निरर्थक आणि डोक्याबाहेरची असल्याने मी द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत अशा चर्चेपासून स्वत:ला हेतुपुरस्सर दूर ठेवल्याचे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.पत्रकारांशी बोलताना विराट म्हणाला,‘भारतात विकेटवरून इतके स्तोम का माजविले जाते हे कळायला मार्ग नाही. क्रिकेटला अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर उभय संघ खेळायला तयार नसतील तर ती बातमी होऊ शकते. पण माझा संघ खेळपट्टीच्या स्थितीवर चर्चा करीत नाही. ज्यांना करायची असेल त्यांनी खुशाल चर्चा करावी. खेळपट्टीच्या आधारे संघाची निवडही करीत नाही. पाच दिवसांच्या खेळात कोणत्या दिवशी पिचचे स्वरूप कसे असेल हे लक्षात घेत नाही.’जामठा स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने सामना सुरू होण्याआधी अंतिम अकरा खेळाडू निवडण्याचे संकेत कोहलीने दिले. कसोटीत परिस्थितीनुसार दोन अष्टपैलू खेळाडू असावेत. त्यातील एक अष्टपैलू फिरकीपटू तसेच दुसरा वेगवान गोलंदाज असलेला अष्टपैलू खेळाडू हवा. यामुळे संयोजन फिट बसते. पण मी मात्र संघातील संयोजनाचा खुलासा उद्याच करेन, असे कोहलीने हसून सांगितले.पाच वर्षांआधी द. आफ्रिकेचा कर्णधार हशिम अमला याने याच मैदानावर २५३ धावा ठोकल्या होत्या. याविषयी विचारताच कोहली म्हणाला,‘ आम्ही कुठल्या एका खेळाडूला टार्गेट करणार नाही. एखाद्या मालिकेत विरोधी संघ कर्णधाराला टार्गेट करते कारण तो डावपेच आखतो. आम्ही देखील असे केले आहे. पण यावेळी करणार नाही. महत्त्वाचे खेळाडू मालिकेत धावा काढू शकले नाहीत, हे या मालिकेत स्पष्ट झाले.’ (क्रीडा प्रतिनिधी)वर्षभरात आॅफ स्पिनर रवींद्रन अश्विन यशस्वी ठरण्याचे कारण काय असे विचारताच कोहली म्हणाला, ‘तो बेसिक्सवर अधिक लक्ष देतो, खूप प्रयोग करीत नाही. लंकेत त्याने यशस्वी कामगिरी केली शिवाय सध्या सर्वाधिक प्रभावी मारा करीत आहे. तो ‘कॅरम बॉल’ अभावानेच टाकतो. अश्विन नैसर्गिक गोलंदाजीला चिकटून राहतो. चेंडू टाकतेवेळी ताकद लावत असल्याने ज्या खेळपट्टीवर इतर गोलंदाज संघर्ष करतात त्या खेळपट्टीवर देखील अश्विनचे चेंडू उसळी घेऊ शकतात.’