शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कर्णधाराचा आदर्श घ्यावा

By admin | Updated: August 13, 2014 01:30 IST

कटू आठवणी बरोबर घेत भारतीय संघाने मंगळवारी जेव्हा मँचेस्टर शहर सोडले, तेव्हा तेथील वातावरण कुंद आणि थंड होते

लंडन : कटू आठवणी बरोबर घेत भारतीय संघाने मंगळवारी जेव्हा मँचेस्टर शहर सोडले, तेव्हा तेथील वातावरण कुंद आणि थंड होते. पण लंडनला मात्र उल्हासदायक वातावरणाने त्यांचे स्वागत केले. हॉटेलमध्ये आराम करता -करता धोनी ब्रिगेडला ४८ तासांहून जास्त वेळ आपल्या कामगिरीचे विवेचन करण्यास मिळाला आहे.लॉर्ड्सवर अनपेक्षितपणे मिळालेल्या विजयाने भारताला १-0 अशी स्वप्नवत आघाडी मिळाली. पण साउथॅम्पटन आणि मँचेस्टरला भारताचे हे स्वप्न मोडले आणि त्याची जागा १-२ अशी दु:स्वप्नाने घेतली. आता या ओझ्याखालून मालिका बरोबरीत आणण्याची जबाबदारी भारतीय संघाची आहे. पण, पुन्हा मूळ प्रश्न समोर उभा राहतो, भारतीय फलंदाज खेळपट्टीवर उभे राहून चांगली कामगिरी करणार का? आमचे तळाचे फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत, पण आमच्या आघाडीच्या फलंदाजांना त्यांच्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करता येत नाही. एखाद्या खेळाडूचा बॅड पॅच समजू शकतो; परंतु सर्वच जण अपयशी ठरत असतील तर आम्हाला फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे, असे दिसते, असे मत कर्णधार धोनीने चौथ्या कसोटीनंतर म्हंटले होते. तिसऱ्या कसोटीनंतर भारतीय गोलंदाजांना मायकेल होल्डींग यांच्याबरोबर जेवण करण्याचा योग आला. यावेळी त्याने सांगितलेले ‘अनुभवाचे बोल’ भारताचे नशीब बदलू शकले नाहीत. विराट कोहलीसुध्दा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनबरोबर डिनरला गेला होता. त्यानेही आपल्या फलंदाजीतील उणिवांबद्दल वॉनकडून टिप्स घेतल्या. पण त्याचा त्याला काहीच उपयोग झाला नाही. भक्कम सलामी ही मोठ्या धावसंख्येचा पाया असतो, पण दुर्दैवाने भारताच्या गेल्या आठ कसोटी सामन्यात एकदाही अर्धशतकी सलामी मिळालेली नाही. मुरली विजय थोड्या फार आत्मविश्वासाने फलंदाजी करीत आहे, पण शिखर धवनने तीन कसोटीतील ६ डावात २0.३३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. चौथ्या कसोटीत त्याच्याऐवजी गौतम गंभीरला खेळविण्यात आले. परंतु दोन्ही डावात तो फेल गेला, शिवाय तो इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसत होता. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील परिपूर्ण फलंदाज म्हणून ज्याला गणले जात होते, तो उपकर्णधार विराट कोहलीने तर साफ निराशा केली. या मालिकेत तो जेम्स अ‍ॅडरसनचा बकरा ठरला आहे. अँडरसनने विराटला ३0 बॉल टाकले आणि यात तो ४ वेळा बाद झाला. ८ डावात १३.५0 च्या सरासरीमुळे त्याच्या तंत्रावर मोठे प्रश्नचिन्ह लावले आहे. कोहलीप्रमाणेच पुजाराकडूनही मोठा भ्रमनिरास झाला आहे. शेवटच्या २ कसोटीत त्याने २४, २, 0 आणि ७ अशा धावा केल्या आहेत. त्याचे तंत्र भक्कम असले तरी त्याच्याकडे एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे चांगल्या सुरवातीनंतरही मोठी खेळी करण्यास त्याला अपयश आले आहे. या सर्वात उजवा ठरतो तो कर्णधार धोनी. त्याच्याकडे भलेही तंत्र नसेल, त्याच्याकडे कसोटीच्या दर्जाचे फटके नसतील, पण त्याच्याकडे आहे फायटींग स्पिरीट. आघाडी फळी ढासळत असताना एकाकी योध्द्याप्रमाणे तो लढत होता. ३ अर्धशतकांसह मालिकेत २६७ धावा करणाऱ्या धोनीचे ३३.३७ ची सरासरी इतरांपेक्षा सरस ठरते.