शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

टी २० विश्वचषक फायनलः वेस्ट इंडिजने इंग्लंडला १५५ धावांवर रोखले

By admin | Updated: April 3, 2016 20:38 IST

गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोंलदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लडंला चांगलेच झुलवले, वेस्ट विंडिजच्या तगड्या गोंलदाजी पुढे निर्धारिती २० षटकात इंग्लंडला ९ बाद १५५ धावापंर्यंत मजल मारता आली.

ऑनलाइन लोकमत 
कोलकाता, दि. ३ - गोलंदाजांच्या शिस्तबद्ध गोंलदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लडंला चांगलेच झुलवले, वेस्ट विंडिजच्या तगड्या गोंलदाजी पुढे निर्धारिती २० षटकात इंग्लंडला ९ बाद १५५ धावापंर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिजतर्फे डेव्हेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी इंग्लंडच्या ३ फलंदाजांना बाद केले तर सॅम्युअल बद्रीने २ फंलदाजांची शिकार केली. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळला जात आहे. या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सॅमीने सलग दहाव्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. 
 
जो रूट (५४) आणि जोस बटलर (३६) यांच्या धमाकेदार खेळीच्या बळावर इंग्लंडने निर्धारित २० षटकात १५५ धावा केल्या. त्यामुळे टी २० विश्वचषक जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला १५६ धावांची गरज आहे. इंग्लंडची सुरवात आतिशय निराशजनक झाली, त्यांना सुरवातीच्या पहिल्या पाच षटकातच  तीन धक्के बसले. पाच षटकात इंग्लंडने तीन बाद २३ धावा केल्या होत्या. पहिल्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर शून्यावर इंग्लंडला पहिला धक्का बसला.
 
सलामीवीर रॉयच्या बद्रीने शून्यावर यष्टया वाकवल्या. उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रॉय इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्यानंतर हेल्सला एका धावेवर रसेलने बद्रीकरवी झेलबाद केले. कर्णधार मॉर्गनला ५ धावांवर बद्रीने गेलकरवी झेलबाद केले. रुट आणि बटलर यांनी चौथ्या गड्यासाठी ६.४ षटकात ६१ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या वेगाने वाढवली.
दोन्ही संघांनी अंतिम सामन्यासाठी उपांत्यफेरीतील विजेता संघ कायम ठेवला आहे. इंग्लंडने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला सात गड्यांनी धूळ चारली. वेस्ट इंडिजने दुसऱ्या उपांत्य सामन्यात जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला सात गड्यांनी पराभूत केले. 
 
१९७९ मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला पराजित करून विश्वविजेतेपद पटकाविले होते. या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास डॅरेन सॅमी आणि कॅरेबियन संघ प्रयत्नशील असेल. या स्पर्धेत एकाही संघाला दोन वेळा विजतेपद मिळविता आलेले नाही. परंतु आज इतिहास घडणार आहे. दोन्ही पैकी कोणताही संघ जिंकल्यास त्यांचे हे दुसरे विश्वविजेतेपद असणार आहे. इंग्लंडने २०१० मध्ये तर २०१२ मध्ये वेस्ट इंडीजने टी२० विश्वकरंडक पटकाविला होता.