शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

T20 महिला वर्ल्ड कप - डकवर्थ लुईसनुसार पाकिस्तानचा 2 धावांनी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2016 19:40 IST

टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १९ - टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये शनिवारी झालेल्या भारत - पाकिस्तान सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. डकवर्थ लुईसनुसार पाकिस्तानला विजयी घोषीत करण्यात आलं आहे.  अटीतटीच्या या सामन्यात भारत कडवी झुंज देत असताना पावसामुळे भारत संघाच्या प्रयत्नावर पाणी फेरलं गेलं. फिरोजशहा कोटला मैदानावर सुरु असलेला भारत - पाकिस्तान सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता
 
भारताने पाकिस्तानला 7 विकेट गमावत 97 धावांचं लक्ष्य दिलं होतं.  पाकिस्तानने पाठलाग करताना 6 विकेट गमावत 77 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे सामना थांबवण्यात आला होता. शेवटी 'डकवर्थ लुईस' नियमानुसार पाकिस्तान संघाकडे असलेल्या 2 धावांच्या आघाडीमुळे पाकिस्तान संघाला विजेता घोषीत करण्यात आलं.
 
पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने पहिली बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावत 96 धावा केल्या होत्या. भारताकडून वेदा कृष्णमुर्तीने सर्वात जास्त 24 धावा केल्या होत्या.  मिताली राजला 1500 धावा पुर्ण करण्यासाठी 48 धावांची गरज होती. मात्र मिताली राज 16 धावांवरच बाद झाल्याने टी20मध्ये 1500 धावा करणारी पहिली आशियाई महिला खेळाडू होण्याचा विक्रम हुकला. पाकिस्तानकडून सिदरा अमीनने सर्वात जास्त 26 धावा केल्या. अनम अमीनला प्लेअर ऑफ द मॅच घोषीत करण्यात आलं.