शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

टी-२० ने सर्व अंदाज चुकीचे ठरविले

By admin | Updated: April 26, 2017 01:15 IST

आयपीएलमध्ये महागडे आणि स्टार खेळाडू यशस्वी होतात, असे निश्चित नाही. मुळात अशा वेगवान क्रिकेटमध्ये समतोल संघ

आयपीएलमध्ये महागडे आणि स्टार खेळाडू यशस्वी होतात, असे निश्चित नाही. मुळात अशा वेगवान क्रिकेटमध्ये समतोल संघ, कल्पक नेतृत्व आणि प्रचंड दबावाला सामोरे जाण्याची खेळाडूंची क्षमता हे महत्त्वाचे ठरते. सध्या टी-२० क्रिकेट सातत्याने खेळले जात असून त्याची लोकप्रियता वाढत आहे. सामन्यांचा नाट्ययमयरीत्या निकाल लागत आहे. अप्रतिम गोलंदाजीकौशल्य, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्वांमुळे सामन्याचे चित्र पालटण्यास वेळ लागत नाही. दरम्यान, सुरुवातीला टी-२० क्रिकेट हे मुख्यत्वे फलंदाजांसाठी तयार करण्यात आलेला प्रकार समजला जात होता, ज्यात गोलंदाजांना खूप काही सहन करावे लागणार होते. खासकरून फिरकी गोलंदाजांना, त्यांच्यासाठी हे क्रिकेट मारक ठरणार, अशीच समज होत होती. मात्र, गेल्या एक दशकामध्ये हे सर्व समज चुकीचे ठरले आहेत. सध्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावण्याच्या क्रमवारीत हाशिम आमला आघाडीवर आहे. मुळात तो या वेगवान क्रिकेटच्या प्रकारात बसत नाही. परंतु, क्षेत्ररक्षकांच्या मधली जागा हेरून फटके मारणे, उत्कृष्ट टायमिंग साधण्याची कला आणि आपल्या दीर्घ अनुभवाचा मोक्याच्या वेळी फायदा घेण्याच्या वृत्तीमुळे तो सध्या यशस्वी झाला आहे. त्याचप्रमाणे, न्यूझीलंडचा युवा फलंदाज केन विल्यम्सनही याच पठडीतला. तोदेखील दमदार बचावात्मक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळण्यास थोडा वेळ जास्त घेतला. मात्र, जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केले. त्याने अतिआक्रमकपणा टाळताना डोळेबंद फटके न मारता उत्कृष्ट तंत्रशुद्ध फटके मारत आपला दर्जा सिद्ध केला. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने सर्वांनाच प्रभावित केले. तो अतिवेगाने चेंडू टाकत नाही, मात्र चेंडू स्विंग करण्यात असलेला हातखंडा आणि मोक्याच्या वेळी यॉर्कर टाकण्याची असलेली कला या जोरावर त्याने वर्चस्व निर्माण केले. त्याचप्रमाणे, तो जेवढा चांगला मारा डावाच्या सुरुवातीला करतो, त्याच उच्च क्षमतेचा मारा तो डेथओव्हर्समध्येही करतो. तसेच, सध्या अव्वल पाच स्थानांवर वेगवान गोलंदाजांनी जरी कब्जा केला असला, तरी काही फिरकीपटूंनीही सातत्याने बळी घेत आपली चमक दाखवली आहे. यामध्ये राशिद खान, इम्रान ताहिर, यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांची नावे घ्यावी लागतील. या स्लो बॉलर्सनी त्यांचे कौशल्य अचूकपणे वापरताना सर्वोत्तम फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. याचे मुख्य कारण म्हणजे, या सर्वच फिरकीपटूंनी धावा वाचवण्यापेक्षा बळी मिळवण्यास प्राधान्य दिले. मुळात वेगवान असो की फिरकी, तेच गोलंदाज यशस्वी झालेत, ज्यांनी फलंदाजांच्या योजना ओळखण्यात यश मिळवले. पण, हे सर्व एकट्याच्या जोरावर झाले नसून यामध्ये सांघिक यशही तेवढेच मोलाचे आहे. कर्णधाराची मन:स्थितीही खूप महत्त्वाची ठरत आहे. त्याला केवळ खेळाडूंवर विश्वास ठेवून चालत नाही, तर सामन्याच्या परिस्थितीनुसार उपलब्ध खेळाडूंचा योग्य वापर कसा करावा, हे मुख्य काम त्याला करावे लागत आहे. यामध्ये गौतम गंभीरने इडनगार्डनवर आरसीबीविरुद्ध खेळताना सर्वोत्कृष्ट नेतृत्वाचे उदाहरण दिले. आक्रमक ख्रिस लिन दुखापतीमुळे आयपीएलबाहेर गेल्यानंतर गंभीरने मोठा जुगार खेळताना हुकमी फिरकी गोलंदाज असलेल्या सुनील नरेनला सलामीला खेळविण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजच्या या खेळाडूकडे फारसे फटके नाहीत, परंतु जे फटके आहेत ते त्याने चांगल्या प्रकारे खेळताना लक्षवेधी कामगिरी केली. यानंतर मर्यादित धावसंख्येचे रक्षण करताना गंभीरने आक्रमक क्षेत्ररक्षण लावताना स्वत: शॉर्टलेगला उभा राहिला. तसेच वेगवान गोलंदाजांना आक्रमक मारा करण्यास सांगताना तीन स्लीपचे क्षेत्ररक्षकही उभे केले. याचा जबरदस्त परिणाम पाहायला मिळाला आणि कोहली, डीव्हीलियर्स व गेल अशी तगडी फलंदाजी असलेल्या आरसीबीचा डाव ४९ धावांत गुंडाळला गेला. या सामन्यात टी-२० क्रिकेटमधील असलेला उच्च दर्जाचा दबावही सिद्ध केला. कोलकाताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला १-२ षटके जरी हलकी टाकली असती तर आरसीबीच्या फलंदाजांना जम बसवण्यास वेळ लागला नसता. दुसरीकडे आरसीबीचे फलंदाज सामना वेगात संपविण्यास उत्सुक होते. मात्र, याच आक्रमकतेच्या नादात त्यांचा बळी गेला आणि जेव्हा जाणीव झाली तेव्हा फार उशीर झालेला होता. -अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार.