शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

T-20 वर्ल्ड कप, १९ मार्चला रंगणार भारत पाकिस्तान मुकाबला

By admin | Updated: December 11, 2015 14:42 IST

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असून त्यांच्यात १९ मार्च रोजी धरमसाला येथे सामना रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - पुढील वर्षी ८ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान भारतात रंगणा-या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत व पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असून त्यांच्यात १९ मार्च रोजी धरमसाला येथे सामना रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे. आयसीसीने या संदर्भात आज सविस्तर माहिती दिली आहे. राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांशी क्रिकेट मालिका खेळतील की नाही याबाबत संभ्रम असला तरी आता वर्ल्डकपमध्ये ते एकमेकांना नक्की भिडतील हे स्पष्ट झाले आहे. 
भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी १५ मार्च रोजी नागपूरला तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २७ मार्च रोजी मोहाली येथे रंगणार आहे. या वर्ल्डकपमध्ये एकूण ५८ सामने होणार असून यामध्ये ३५ पुरुषांचे तर २३ महिलांचे सामने आहेत. बेंगळुरू, चेन्नई, धरमसाला, कोलकाता, मोहाली, मुंबई, दिल्ली व नागपूर येथे सामने होणार आहेत. 
नवी दिल्ली व मुंबई येथे अनुक्रमे ३० मार्च व ३१ मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून ३ एप्रिल रोजी कोलकात्यात ईडन गार्डनमध्ये अंतिम सामना होणार आहे. भारतामध्ये क्रिकेट हा धर्म असून भारताइतकं क्रिकेटवेड क्वचितच अन्य देशात बघायला मिळेल अशी टिप्पणी आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ या वर्ल्ड कपचे अत्यंत यशस्वीपणे आयोजन करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महिलांचे सामने संपल्यानंतर पुरूषांचे सामने सुरू होणार आहेत. पुरूष वर्ल्डकपसाठी एकूण ५.६ दशलक्ष डॉलर्सची बक्षीसे आहेत तर महिलांच्या वर्ल्ड कपसाठी ४ लाख डॉलर्सची बक्षीसे आहेत.