शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सुशील की नरसिंग! रिओला जाणार कोण?

By admin | Updated: May 11, 2016 02:43 IST

रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीच्या फ्री स्टाईल प्रकारात ७४ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंग यादव दावा करीत आहे

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये कुस्तीच्या फ्री स्टाईल प्रकारात ७४ किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नरसिंग यादव दावा करीत आहे. दुसरीकडे दोन आॅलिम्पिक पदकाचा मानकरी सुशीलकुमारने आॅलिम्पिकला सर्वोत्कृष्ट मल्ल पाठविण्यासाठी चाचणी घेण्याची मागणी केली आहे. अनुभवी सुशील की नरसिंग याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाला घ्यावा लागेल. त्यासाठी चाचणी घ्यायची की नाही हेदेखील ठरवायचे आहे.सुशील म्हणाला, ‘‘मी केवळ चाचणीसाठी बोलतो आहे. रिओला मला पाठवा असे म्हणत नाही. माझ्यात व नरसिंग यांच्यात जो मल्ल उत्कृष्ट असेल त्याला रिओला पाठवा इतकेच माझे म्हणणे आहे. कोटा देशाला मिळतो, एखाद्या व्यक्तीला नव्हे. त्यामुळेच दोन चांगले दावेदार असतील तर त्यापैकी सर्वोत्कृष्ट एका मल्लाला संधी मिळायला हवी.’’तो पुढे म्हणाला, ‘‘सध्याचा विश्वविजेता आणि आॅलिम्पिक चॅम्पियन जॉर्डन बरोग यालादेखील अमेरिकेच्या संघात स्थान मिळविण्यासाठी चाचणीतून जावे लागले. प्रत्येक देशात असेच होते.’’ भारतीय कुस्ती महासंघाने अद्याप चाचणीचा निर्णय घेतला नसल्याने ७४ किलो वजन गटाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर सुशील म्हणतो, ‘‘साई आणि सरकारने माझ्या तयारीवर वारेमाप खर्च केला. याचा लाभ मला झाला किंवा नाही हे आता सिद्ध करण्याची माझी तयारी असेल.’’२००८च्या बीजिंग आॅलिम्पिकचे कांस्य आणि २०१२च्या लंडन आॅलिम्पिकचे रौप्य पटकविणारा ३२ वर्षांचा सुशील पुढे म्हणाला, ‘‘रिओत स्वत:ला पदकविजेता बनविणे ही माझी जबाबदारी आहे. चाचणी होईल किंवा नाही, याचा निर्णय महासंघाने घ्यावा. माझी तयारी नसती तर चाचणी घ्या असे म्हणण्याचे धाडस केलेच नसते. मी यासाठी बोलतो आहे कारण पूर्णपणे फिट आहे. मी रिओत पदक जिंकू शकतो असा विश्वासदेखील आहे.’’ नरसिंग यादवने गतवर्षी विश्व चॅम्पियनशिपमध्ये ७४ किलो वजन गटात कांस्य जिंकून भारताला या गटाचा आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला होता. तेव्हापासून महाराष्ट्राचा हा मल्ल या स्थानासाठी दावेदारी करीत आहे. पण माजी विश्वविजेता सुशीलकुमारचा युक्तिवाद असा, की ‘‘एका वजन गटासाठी अनेक दावेदार असताना आधीदेखील चाचणी झाली आहे. १९९२ आणि १९९६च्या आॅलिम्पिकपूर्वीदेखील चाचणी झाली होती. मागच्या आॅलिम्पिकच्या वेळी स्पर्धा नसल्यामुळे चाचणी घेण्याची गरज भासली नसेल. माझ्या वजनगटात प्रतिस्पर्धी नव्हता पण यंदा परिस्थिती वेगळी आहे.’’सुशीलने ६६ किलो फ्री स्टाईल प्रकारात दोनदा आॅलिम्पिक पदके जिंकली, पण ७४ किलो वजनगटात दाखल झाल्यापासून त्याने २०१४ मध्ये केवळ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात सुवर्णपदकही जिंकले. सध्या तो सोनिपतमध्ये सराव करीत आहे. (वृत्तसंस्था)मी आधी तीन आॅलिम्पिकला जाऊन आलो. त्यापैकी दोन वेळा पदके जिंकली. भारताला आणखी एक पदक जिंकून देण्याचे लक्ष्य आखले आहे.- सुशीलकुमार, मल्ल