शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

ईशांतच्या आक्रमकतेचे विराटकडून समर्थन

By admin | Updated: September 2, 2015 23:45 IST

तब्बल २२ वर्षांनंतर श्रीलंकेला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीत पराभूत करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ईशांत शर्माच्या आक्रमकतेचे समर्थन केले आहे

कोलंबो : तब्बल २२ वर्षांनंतर श्रीलंकेला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीत पराभूत करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ईशांत शर्माच्या आक्रमकतेचे समर्थन केले आहे. गोलंदाजांनी आक्रमक असणे ही कोणत्याही कर्णधारासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे त्याने म्हटले आहे.श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ईशांत शर्माने खूप चांगली कामगिरी केली; मात्र यजमान संघाच्या खेळाडूंबरोबर वाद घातल्यामुळे त्याच्यावर दोनदा कारवाई करण्यात आली. मात्र, विराट कोहलीने त्याचे समर्थनच केले आहे. गोलंदाजांनी आक्रमकच असायला हवे, ही आक्रमकताच विरुद्ध संघाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आवश्यक असते, असे विराटचे म्हणणे आहे.विराट म्हणाला, ‘‘ईशांतने झोकून देऊन गोलंदाजी केली. त्यामुळेच महत्त्वाच्या वेळी आम्हाला बळी मिळविता आले. आपल्या संघात आक्रमक गोलंदाज असणे हे कोणत्याही कर्णधाराला सुखावणारी गोष्ट असते.’ विराटने यावेळी मालिकावीर आर. अश्विनचीही स्तुती केली. आश्विनने मालिकेत कमालीची गोलंदाजी केली. त्याने मोक्याच्या वेळी बळी घेतले.(वृत्तसंस्था)