शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

सुपरफास्ट अश्विन! 45 कसोटीत टिपले 250 बळी

By admin | Updated: February 12, 2017 12:10 IST

भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये अजून एका विक्रमाची नोंद केली आहे.

ऑनलाइन लोकमत  

हैदराबाद, दि. 12 - भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने  250 बळी टिपण्याचा विक्रमावर आपले नाव कोरले आहे. याआधी झटपट 200 बळी पूर्ण करणाऱ्या  अश्विनने केवळ 45 कसोटीमध्येच 250 बळींचा टप्पा ओलांडत डेनिस लिलींचा विक्रम मोडीत काढला. लिलींनी 48 कसोटीत 250 बळी टिपले होते. 
बांगलादेशविरुद्ध हैदराबाद येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीच्या चौथ्या दिवशी आज अश्विनने बांगलादेशचा कर्णधार मुशफिकूर रहिमची विकेट काढत कसोटी कारकीर्दीतील 250 बळींचा टप्पा ओलांडला. अश्विनने 250 बळी मिळवण्यासाठी केवळ 45 खेळले. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 250 बळी टिपण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या नावावर होता. लिलींनी 48 कसोटीत 250 बळी टिपले होते.  तर भारताकडून अनिल कुंबळेने 55 कसोटीत 250 बळी टिपले होते. 
डेनिस लिली (48 कसोटी), डेल स्टेन (49 कसोटी), अॅलन डोनाल्ड (50 कसोटी) मुथय्या मुरलीधरन (51 कसोटी), वकार युनिस (51 कसोटी), रिचर्ड हेडली (53 कसोटी), माल्कम मार्शल (53 कसोटी) आणि अनिल कुंबळे (55 कसोटी), इम्रान खान (55 कसोटी) या दिग्गजांना पछाडत अश्विनने हा विक्रम आपल्या नावे केला.