शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

३५0 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी तिसऱ्यांदा पाठलाग

By admin | Updated: January 16, 2017 05:16 IST

भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला

पुणे- भारताने तिसऱ्यांदा ३५0 पेक्षा जास्त लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला आणि योगायोगाने तिन्ही वेळेस कोहलीने शतक ठोकले. याआधी २0१३ मध्ये भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध जयपूर आणि नागपूर येथे ३५0 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करीत विजय मिळविला.१६ आॅक्टोबर २0१३ मध्ये भारताने जयपूर येथील सामन्यात आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ३६0 धावांचे लक्ष्य ४३.३ षटकांत १ बाद ३६२ धावा करीत पूर्ण केले. या सामन्यात रोहित शर्माने १४१ आणि विराट कोहलीने १00 धावा केल्या होत्या.त्याचप्रमाणे नागपूर येथे ३0 आॅक्टोबर २0१३ मध्ये आॅस्ट्रेलियाने दिलेले ३५१ धावांचे टार्गेट भारताने ४९.३ षटकांत पूर्ण केले होते. या लढतीत विराट कोहलीने ११५ व शिखर धवनने १00 धावा केल्या होत्या.वनडे इतिहासात सर्वांत जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेने १२ मार्च २00६ मध्ये आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ४३५ धावांचे आव्हान ४९.५ षटकांत ९ गडी गमावून ४३८ धावा करीत पूर्ण केले.>हा विजय अविस्मरणीय आहे. आम्ही साडेतीनशे धावा दिल्या आणि ६३ धावांत आमचे ४ फलंदाज बाद झाले होते. खरं तर त्यावेळीही मी सामना जिंकण्याचा विचार करीत होतो. आम्ही केदारची क्षमता यापूर्वीही पाहिली आहे. तो चांगले फटके मारत होता. मी त्याला सांगितले फक्त आपण फक्त १५0 पर्यंत टिकलो तर विरोधी संघ डगमगेल. केदारने अतिशय उत्तम खेळी केली. मी त्या धावांसाठी खूप पळवले. प्रतिस्पर्धी संघाला आम्हाला दाखवून द्यायचे होते की, आमच्यात विजयाचा विश्वास आहे. - विराट कोहली, कर्णधार भारत>इतकी मोठी धावसंख्या उभी करुनही पराभूत होणे निराशाजनक आहे. ४ बाद ६३ धावा असताना आम्ही वरचढ होतो. पण केदार-विराटने सामना खेचून घेतला, म्हणूनच हा पराभव पचवणे जड जात आहे. -इयोन मोर्गंन, कर्णधार इंग्लंड>देशासाठी विजयी कामगिरी करणे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. विशेषत: माझ्या शहरात ही कामगिरी झाली. आज या सामन्यासाठी माझे आई, बाबा, पत्नी आणि मुलगी उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीने आज हे घडले. कर्णधार कोहलीने मोठया लक्ष्याचा पाठलाग करताना कसे खेळावे याचे उदाहरण अनेकदा घालून दिले आहे. विराटची फलंदाजी नॉन स्ट्रायकर एंडवरुन पाहण्याची संधी मी अनेकदा गमावली आहे. त्याच्यासोबत पळणे खूपच मुश्किल आहे. परंतु यापुढे तयार असेन. -केदार जाधव, सामनावीर>३३८ ही इंग्लंडची भारताविरुध्द सर्वोच्च धावसंख्या होती. २0११ मध्ये बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही धावसंख्या त्यांनी उभारली होती. हा सामना टाय झाला होता.१0५ धावांचा पाऊस इंग्लंडने रविवारी शेवटच्या आठ षटकांत पाडला. यामुळे ५ बाद २४५ वरून इंग्लंडची धावसंख्या ७ बाद ३५0 अशी पोहोचली. ३३ चेंडूंत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने अर्धशतक केले. भारताविरुध्द इंग्लिश फलंदाजाने केलेले हे सर्वांत जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी हा विक्रम ओवेश शहा आणि अँड्र्यू फ्लिंटॉपच्या नावावर होता. त्यांनी ३५ चेंडूत अर्धशतक केले होते.