शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

स्टोक्सने रोखली मुंबई एक्स्प्रेस!

By admin | Updated: April 25, 2017 06:45 IST

टी-२० म्हणजे तडकून फलंदाजी. हे समीकरण मुंबई इंडियन्स-रायझिंग पुणे सुपरजायंट्स या सामन्याने पुन्हा मोडून काढलं.

सचिन कोरडे /ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - टी-२० म्हणजे तडकून फलंदाजी. हे समीकरण मुंबई इंडियन्स-रायझिंग पुणे सुपरजायंट्स या सामन्याने पुन्हा मोडून काढलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीवर सोमवारी गोलंदाजी चमकली. पुणे संघाचे ६ बाद १६० धावांचे सहज वाटणारे लक्ष्य मुंबईसाठी कठीण होत गेले होते. शेवटच्या षटकापर्यंतची लढाई अखेर पुण्याने जिंकली. अवघ्या ३ धावांनी हा सामना जिंकत त्यांनी मुंबईची सलग ६ विजयांची मालिका ‘ब्रेक’ केली. बेन स्टोक्सचा मारा, इमरान ताहीरची फिरकी आणि सुंदरने पार्थिवच्या रुपात घेतलेला बळी लक्षवेधी ठरला. टी-२० क्रिकेटमधील हरभजनच्या २०० बळींच्या विक्रमाचा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करणयाची मुंबईकरांची संधी हुकली. या विजयानंतर पुणे संघ चौथ्या क्रमांकावर पोहचला. निश्चितच, याचे श्रेय पुण्याच्या गोलंदाजांना जाते.मुंबईला १२ चेंडूंत २४ धावांची गरज होती. मैदानावर कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दीक पांड्या होते. अशा स्थितीत मुंबई हा सामना जिंकणार असेही वाटत होते. मात्र बेन स्ट्रोकचा मारा मुंबईचे फलंदाज सहज पेलू शकले नाही. त्याने केवळ ७ धावा दिल्या. पांड्या बाद झाल्यानंतर रोहितने एक षटकार लगावत रंगत आणली. त्यानंतर ३ चेंडूंत ११ धावांची गरज असताना रोहित बाद झाला आणि सामना पुण्याकडे झुकला. भज्जीने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला मात्र तोपर्यंत सामना पुण्याने जिंकला होता. मुंबईला सहज वाटणारे हे लक्ष्य पुण्याच्या गोलंदाजांनी आव्हानात्मक केले. पार्थिव (३३) बाद झाल्यानंतर मुबईचे फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद झाले. रोहितची ३९ चेंडूंत ५८ धावांची खेळी वाया गेली. त्याआधी, आक्रमक सुरुवात केलेल्या पुणेकरांना मोक्याच्या वेळी धक्के देत त्यांच्या धावगतीला लगाम घालण्यात मुंबईकरांना यश आले होते. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही रायझिंग पुणे सुपरजायंट्सने निर्धारित २० षटकात ६ बाद १६० धावांची मजल मारली होती. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबई कर्णधार रोहित शर्माने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत धावांचा पाठलाग करण्यास पसंती दिली. कारण धावांचा पाठलाग करताना मुंबईने सामने जिंकले होते. दुसरीकडे रहाणे - राहुल त्रिपाठी या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही दाद न देता दमदार अर्धशतकी सलामी दिली. मिशेल जॉन्सन, मिशेल मॅक्क्लेनघन, यंदाच्या मोसमात पहिलाच सामना खेळत असलेला कर्ण शर्मा, हुकमी जसप्रीत बुमराह व अनुभवी हरभजनसिंग असे सर्वजण धावा रोखण्यात अपयशी ठरत होते. परंतु, अखेर कर्ण शर्मानेच मुंबईला यश मिळवून देत धोकादायक रहाणेला तंबूचा रस्ता दाखवला. अजिंक्य ३२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारांसह ३८ धावा करून परतला. यानंतर राहुल त्रिपाठीने सूत्रे आपल्याकडे घेत ३१ धावांत ३ चौकार व २ षटकारांसह ४५ धावा काढल्या. मात्र, कर्णधार स्टिव्ह स्मिथ (१७), गतसामन्यात निर्णयक फटकेबाजी करणारा महेंद्रसिंह धोनी (७), अष्टपैलू बेन स्टोक्स (१७) अपयशी ठरल्याने पुण्याची धावसंख्या मर्यादित राहिली होती.